शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

व्हेंटिलेटरसह ऑक्सिजनवरील ३ हजार ३८३ रुग्णांची १२ दिवसात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या या दुस-या लाटेला तोंड देण्यासाठी सध्या संचारबंदी सुरू आहे. संचारबंदीच्या या कालावधीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या या दुस-या लाटेला तोंड देण्यासाठी सध्या संचारबंदी सुरू आहे. संचारबंदीच्या या कालावधीत रुग्णसंख्या कमी होण्यासह व्हेंटिलेटरसह ऑक्सिजनवरील गंभीर रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे. गेल्या १२ दिवसांचा विचार करता तब्बल ३ हजार ३८३ ने गंभीर रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने समाधान व्यक्त केले आहे. यामुळे जिल्ह्यात सध्या ५ हजार २८२ गंभीर रुग्ण आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचे सध्या २१ हजार २६५ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांपैकी बरे होण्याचे प्रमाण शुक्रवारी ९४.३ टक्के झाले आहे. तर मृतांचे प्रमाण १.६८ टक्के आहे. या बारा दिवसांत रुग्णसंख्या १० हजारने कमी झाल्याचे समाधान या संचारबंदीत उघड झाले आहे. मात्र, या कालावधीत मृतांचे प्रमाण ०.०५ टक्क्याने किंचितसे वाढलेले दिसून येत आहे. शिवाय रुग्णवाढीचे प्रमाणही मोठ्या संख्येने कमी झाले आहे.

शहरनिहाय रुग्णांची संंख्या

गंभीर रुग्णांचा विचार करता जिल्ह्यात ५ हजार २८२ रुग्ण व्हेंटिलेटरसह ऑक्सिजनवर सध्या उपचार घेत आहे. यापैकी ५ हजार ७०८ रुग्ण ऑक्सिजनवर आहे. तर व्हेंटिलेटरवर ५७४ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रात ३ हजार ९७३ रुग्ण ऑक्सिजनवर असून ५२२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. यापैकी कल्याण डोंबिवली परिसरात १ हजार १८७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ६१ व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. या रुग्णसंख्येत मात्र शहरात २० रुग्णांची वाढ दिसून येत आहे. या खालोखाल नवी मुंबईत १ हजार १६८ ऑक्सिजनवर तर २०५ व्हेंटिलेटरवर आहे. यानंतर ठाणे मनपा क्षेत्रात ७८५ रुग्ण ऑक्सिजन आहे. यात तब्बल ७१४ रुग्णांची घट झाली आहे. तर १६७ व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहे. मीरा-भाईंदर महापालिका परिसरात ६२८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. यात ३५० रुग्णांची घट झाली असून व्हेंटिलेटरवर ६९ उपचार घेत आहेत. या तुलनेत भिवंडी परिसरात ११८ ऑक्सिजनवर असून १८ व्हेंटिलेटरवर आहेत. उल्हासनगरमध्ये ८७ जण ऑक्सिजनवर व दोन व्हेंटिलेटरवर आहेत. अंबरनाथला २६६ व बदलापूरला ३८२ जण ऑक्सिजनवर आहे. तर या शहरांमध्ये अनुक्रमे २९ व १८ जण व्हेंटिलेटरवर आहेत. याशिवाय ग्रामीण भागाच्या गावपाड्यातील ८७ रुग्ण ऑक्सिजन तर पाच जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.