शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुरबाडमधील उद्योगांना उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:49 IST

मुरबाड तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागांतील उद्योगांना उतरती कळा लागली आहे.

- प्रकाश जाधव मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागांतील उद्योगांना उतरती कळा लागली आहे. या भागातील ६० टक्के कारखाने बंद पडले असून त्यामुळे स्थानिकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवले जाते. या कंत्राटदारांकडून कष्टकरी कामगारांचे शोषण होत असून त्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नाही.शहरालगत ग्रामीण तरु णांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी ऐंशीच्या दशकात तत्कालीन महसूलमंत्री शांताराम घोलप यांच्या प्रयत्नातून मुरबाड येथे औद्योगिक वसाहतीची निर्मिती करण्यात आली. आजमितीला या क्षेत्रातील जवळपास ६० टक्के उद्योग बंद पडल्यामुळे स्थानिक तरुणांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. ज्या मोजक्या कंपन्या सुरू आहेत, तिथे कंत्राटी पद्धत असल्यामुळे कामगारांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते.मुरबाड औद्योगिक क्षेत्रासह कुडवली, धानिवली येथील अतिरिक्त क्षेत्रांत पूर्वी विविध प्रकारचे उत्पादन करणाऱ्या शंभरपेक्षा जास्त कंपन्या होत्या. ऐंशीच्या दशकात जवळपास १० वर्षे या कंपन्या सुस्थितीत होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती. कालांतराने कामगार युनियन आणि कंपनी व्यवस्थापनात वाद झाल्यामुळे अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले. शिवाय, अनेक कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धत अस्तित्वात आल्याने अनेकांना रोजगार गमवावा लागला.मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगारपद्धती आहे. या कंत्राटी कामगारांना किमान वेतनसुद्धा दिले जात नाही. आठ ते १२ तास काम करून दिवसाचे अवघे दीडशे ते २०० रु पये पगार मिळत असल्याने कामगारवर्गाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होते आहे. त्यामुळे उरलेसुरले उद्योगही येथून जाण्याच्या मार्गावर आहेत.>परप्रांतीय कामगारांचा भरणाऔद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये मुख्यत्वे परप्रांतीय कामगारांचा भरणा आहे. तुटपुंज्या पगारावर हे कामगार १२-१२ तास काम करतात. त्यामुळे ठेकेदार त्यांनाच प्राधान्य देतात. परिणामी, स्थानिक कामगारांना कामाची संधी मिळत नाही.>सुरक्षितता नाहीऔद्योगिक कारखान्यांमधील कामगारांची व्यवस्थापन कोणतीही काळजी घेत नाही. सुरक्षिततेअभावी बºयाचदा लहानमोठे अपघात होतात. त्यामध्ये कामगारांचे बळी जातात. याशिवाय, कंत्राटी पद्धतीने काम करणाºया कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधीची तरतूद केली जात नाही. परप्रांतीय कामगारांची नोंदही ठेकेदारांकडे नसल्याने एखाद्या अपघातात कामगाराचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना भरपाईदेखील मिळत नाही.>कामगार संघटनांमध्ये राजकीय वादयेथील अनेक कंपन्यांच्या कामगार संघटनांवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या मातब्बर नेत्यांचे वर्चस्व आहे. यातून कंपनी व्यवस्थापन आणि युनियनमध्ये बºयाचदा संघर्ष होतो. कामगार संघटनांमध्ये राजकारण शिरल्याने कामगारांमध्ये आपसात द्वेष निर्माण होतात. त्यामुळे आपसात वाद होऊन अनेक कामगारांना रोजगार गमवावा लागला आहे.>कामगार कायद्यानुसार कोणत्याही कारखान्यात शंभरपेक्षा जास्त कामगार असतील तर तो कारखाना किंवा कंपनी बंद करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. परंतु, मुरबाडमधील अ‍ॅरो फार्मा ही कंपनी मालकाने कामगारांना विश्वासात न घेता बंद केली असल्याने कामगार न्यायालयात गेले. कंपनी बंद झाल्यापासून त्यांना पगार तसेच इतर हिशेब मिळावा, अशी मागणी आहे. त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार.- डॉ. डी.एल. कराड, अध्यक्ष, कामगार संघटनाकंपनीचा उत्पादित माल हा मार्केटमध्ये वेळेवर गेला तर कामगारांच्या मागण्यांवर व्यवस्थापन विचार करते. त्यामुळे कामगार वर्गात थोडीफार नाराजी असते. परंतु, व्यवस्थापन कामगारांची कोणत्याही प्रकारे पिळवणूक करत नाही.- रामनुज भूतडा, व्यवस्थापक ओरिएंटल कंटेनर लि., मुरबाडस्थानिक कामगार हे कायम असले तरी प्रामाणिकपणे काम करत नाहीत. त्यामुळे व्यवस्थापन आणि कामगार यांमध्ये समन्वय साधला जात नाही. परिणामी, कंपनीचे मालक हे कंपनी बंद करतात आणि कायम कामगार देशोधडीला लागतात.- हर्षकुमार अढाईगे, उपाध्यक्ष, ओरिएंटल कामगार एकता.