शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाडमधील उद्योगांना उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:49 IST

मुरबाड तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागांतील उद्योगांना उतरती कळा लागली आहे.

- प्रकाश जाधव मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागांतील उद्योगांना उतरती कळा लागली आहे. या भागातील ६० टक्के कारखाने बंद पडले असून त्यामुळे स्थानिकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवले जाते. या कंत्राटदारांकडून कष्टकरी कामगारांचे शोषण होत असून त्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नाही.शहरालगत ग्रामीण तरु णांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी ऐंशीच्या दशकात तत्कालीन महसूलमंत्री शांताराम घोलप यांच्या प्रयत्नातून मुरबाड येथे औद्योगिक वसाहतीची निर्मिती करण्यात आली. आजमितीला या क्षेत्रातील जवळपास ६० टक्के उद्योग बंद पडल्यामुळे स्थानिक तरुणांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. ज्या मोजक्या कंपन्या सुरू आहेत, तिथे कंत्राटी पद्धत असल्यामुळे कामगारांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते.मुरबाड औद्योगिक क्षेत्रासह कुडवली, धानिवली येथील अतिरिक्त क्षेत्रांत पूर्वी विविध प्रकारचे उत्पादन करणाऱ्या शंभरपेक्षा जास्त कंपन्या होत्या. ऐंशीच्या दशकात जवळपास १० वर्षे या कंपन्या सुस्थितीत होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती. कालांतराने कामगार युनियन आणि कंपनी व्यवस्थापनात वाद झाल्यामुळे अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले. शिवाय, अनेक कंपन्यांमध्ये कंत्राटी पद्धत अस्तित्वात आल्याने अनेकांना रोजगार गमवावा लागला.मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगारपद्धती आहे. या कंत्राटी कामगारांना किमान वेतनसुद्धा दिले जात नाही. आठ ते १२ तास काम करून दिवसाचे अवघे दीडशे ते २०० रु पये पगार मिळत असल्याने कामगारवर्गाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होते आहे. त्यामुळे उरलेसुरले उद्योगही येथून जाण्याच्या मार्गावर आहेत.>परप्रांतीय कामगारांचा भरणाऔद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये मुख्यत्वे परप्रांतीय कामगारांचा भरणा आहे. तुटपुंज्या पगारावर हे कामगार १२-१२ तास काम करतात. त्यामुळे ठेकेदार त्यांनाच प्राधान्य देतात. परिणामी, स्थानिक कामगारांना कामाची संधी मिळत नाही.>सुरक्षितता नाहीऔद्योगिक कारखान्यांमधील कामगारांची व्यवस्थापन कोणतीही काळजी घेत नाही. सुरक्षिततेअभावी बºयाचदा लहानमोठे अपघात होतात. त्यामध्ये कामगारांचे बळी जातात. याशिवाय, कंत्राटी पद्धतीने काम करणाºया कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधीची तरतूद केली जात नाही. परप्रांतीय कामगारांची नोंदही ठेकेदारांकडे नसल्याने एखाद्या अपघातात कामगाराचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना भरपाईदेखील मिळत नाही.>कामगार संघटनांमध्ये राजकीय वादयेथील अनेक कंपन्यांच्या कामगार संघटनांवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या मातब्बर नेत्यांचे वर्चस्व आहे. यातून कंपनी व्यवस्थापन आणि युनियनमध्ये बºयाचदा संघर्ष होतो. कामगार संघटनांमध्ये राजकारण शिरल्याने कामगारांमध्ये आपसात द्वेष निर्माण होतात. त्यामुळे आपसात वाद होऊन अनेक कामगारांना रोजगार गमवावा लागला आहे.>कामगार कायद्यानुसार कोणत्याही कारखान्यात शंभरपेक्षा जास्त कामगार असतील तर तो कारखाना किंवा कंपनी बंद करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. परंतु, मुरबाडमधील अ‍ॅरो फार्मा ही कंपनी मालकाने कामगारांना विश्वासात न घेता बंद केली असल्याने कामगार न्यायालयात गेले. कंपनी बंद झाल्यापासून त्यांना पगार तसेच इतर हिशेब मिळावा, अशी मागणी आहे. त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार.- डॉ. डी.एल. कराड, अध्यक्ष, कामगार संघटनाकंपनीचा उत्पादित माल हा मार्केटमध्ये वेळेवर गेला तर कामगारांच्या मागण्यांवर व्यवस्थापन विचार करते. त्यामुळे कामगार वर्गात थोडीफार नाराजी असते. परंतु, व्यवस्थापन कामगारांची कोणत्याही प्रकारे पिळवणूक करत नाही.- रामनुज भूतडा, व्यवस्थापक ओरिएंटल कंटेनर लि., मुरबाडस्थानिक कामगार हे कायम असले तरी प्रामाणिकपणे काम करत नाहीत. त्यामुळे व्यवस्थापन आणि कामगार यांमध्ये समन्वय साधला जात नाही. परिणामी, कंपनीचे मालक हे कंपनी बंद करतात आणि कायम कामगार देशोधडीला लागतात.- हर्षकुमार अढाईगे, उपाध्यक्ष, ओरिएंटल कामगार एकता.