शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

टोलमुक्तीसाठी भाजपा नगरसेवकाची घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:34 IST

राज्यात भाजपा आणि शिवसेनेची सत्ता असतानासुद्धा स्थानिकांना मुलुंड येथील टोल बंद करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपाच्या नगरसेवकाने आंदोलन केले.

ठाणे : राज्यात भाजपा आणि शिवसेनेची सत्ता असतानासुद्धा स्थानिकांना मुलुंड येथील टोल बंद करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपाच्या नगरसेवकाने आंदोलन केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने नगरसेवक भरत चव्हाण यांनी या टोलनाक्यावर आंदोलन केले. यावेळी आपल्याच सरकारविरोधात त्यांनी नागरिकांच्या मदतीने घोषणाबाजीही केली.सत्तेत येण्यापूर्वी कोपरीकरांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे, असा आग्रह धरणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे एमएसआरडीसी खाते स्वत:कडे असतानादेखील याविषयी आता मूग गिळून का गप्प बसले आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी केला.ठाणे शहरात येण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर टोलनाके ओलांडावेच लागतात. त्यात कोपरी, आनंदनगर येथील टोलनाका म्हणजे स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. टोलपासून १० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना टोल माफ असल्याचा अध्यादेश असतानासुद्धा स्थानिक नागरिकांकडून जबरदस्तीने टोल वसूल केला जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. कोपरी, पाचपाखाडी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे व विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षात असताना त्यांनी कोपरीकरांना टोलमुक्ती देऊ, अशी घोषणा केली होती. कोपरीकरांनी त्यांच्या या आश्वासनाला भुलून त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. निवडून येताच ठाण्यातील सर्व आमदारांनी टोल न भरता मुंबईत शपथविधीसाठी प्रयाण करत याच टोलनाक्यावर मोठी स्टंटबाजी केली होती. परंतु, सत्तेत येताच एमएसआरडीसी खाते ताब्यात येऊनही कोपरीकरांचे टोलमुक्तीचे स्वप्न पालकमंत्र्यांनी अपुरे ठेवल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला.>साडेचार वर्षांत निराशाकाही दिवसांपूर्वी या टोलमुक्तीसाठी चव्हाण यांनी महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर, आता हे आंदोलन करण्यात आले. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात लोकांच्या पदरी निराशा आल्याने कोपरीकरांनी हे आंदोलन केले.