शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

खिचडीच्या कंत्राटाचा निर्णय पडला लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:09 IST

२३ पैकी पाच जणांना मिळणार काम; १० दिवसांत अंतिम निर्णय अपेक्षित

कल्याण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शालेय पोषण आहाराचे काम सेंट्रलाइज्ड किचन योजनेअंतर्गत देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे हे काम देण्यासाठी केडीएमसीत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीपुढे २३ प्रस्ताव आले होते. त्यापैकी पाच जणांना खिचडी वाटपाचे काम देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, त्यावर अंतिम निर्णय न झाल्याने खिचडी वाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. येत्या १० दिवसांत त्यावर निर्णय होणे अपेक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.महापालिकेच्या ६९ शाळांमध्ये १० हजार तर, १७६ खाजगी अनुदानित शाळांमध्ये जवळपास ३५ हजार आहेत. सरकारच्या नव्या नियमानुसार खाजगी अनुदानित व महापालिकेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत खिचडी दिली जाते. यापूर्वी खिचडी वाटपाचे काम महिला बचत गट, महिला मंडळे आणि सामाजिक संस्थांना देण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानुसार, हे काम सेंट्रलाइज्ड किचन योजनेंतर्गत देण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने खिचडी वाटपासाठी प्रस्ताव मागविले होेते. त्याकरिता २३ जणांनी कंत्राटासाठी अर्ज केले होते. त्यापैकी पाच जणांची निवड झाली आहे. एकाने किमान १० हजार विद्यार्थ्यांना खिचडी पुरवावी, अशी या योजनेत अट आहे. त्यानुसार पाच जणांना ४५ हजार विद्यार्थ्यांना खिचडी पुरविण्याचे काम विभागून दिले गेले आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. आयुक्तांकडे या संदर्भात मंगळवारी बैठक होणार होती. मात्र, ती झालेली नाही. त्यामुळे खिचडी वाटपाच्या कामावर अंतिम निर्णय होऊन ते १० दिवसांत सुरू होईल, असा दावा शिक्षण मंडळाने केला आहे.सरकारने यापूर्वी देखील ही योजना आणली होती. मात्र, त्यावेळी २५ हजार विद्यार्थ्यांना एक पुरवठादार ही अट होती. त्यामुळे त्यास महिला बचत गटांचा विरोध होता. मुंबईतील महिला बचत गटांनी सेंट्रलाइज्ड किचन योजनेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी ही योजना रद्द करण्यात आली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानेच सेंट्रलाइज्ड किचन योजना राबविण्याचे आदेश दिल आहेत. त्यामुळे सरकारने ही योजना राबविण्याचे ठरविले आहे. परंतु, आता एका पुरवठादारास १० हजार विद्यार्थ्यांनाच खिचडी पुरवण्याची अट असल्याने त्याला महिला बचत गटांचा विरोध नाही.वाटपात खंड नाहीसेंट्रलाइज्ड किचन योजनेमुळे यापूर्वी महिला मंडळे, संस्थांना दिलेले खिचडी वाटपाचे काम रद्द करण्यात आले आहे. मात्र, जोपर्यंत सेंट्रलाइज्ड किचन योजनेअंतर्गत नव्या नियमानुसार नव्या पुरवठादारांकडून कामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत स्थानिक पातळीवर मंडळांकडून खिचडी शिजवून घेऊन तिचे वाटप करावे. त्या काळातील खिचडीचे पैसे सरकारकडून दिले जातील. खिचडी वाटपात खंड पडणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका