शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

खिचडीच्या कंत्राटाचा निर्णय पडला लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:09 IST

२३ पैकी पाच जणांना मिळणार काम; १० दिवसांत अंतिम निर्णय अपेक्षित

कल्याण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शालेय पोषण आहाराचे काम सेंट्रलाइज्ड किचन योजनेअंतर्गत देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे हे काम देण्यासाठी केडीएमसीत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीपुढे २३ प्रस्ताव आले होते. त्यापैकी पाच जणांना खिचडी वाटपाचे काम देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, त्यावर अंतिम निर्णय न झाल्याने खिचडी वाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. येत्या १० दिवसांत त्यावर निर्णय होणे अपेक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.महापालिकेच्या ६९ शाळांमध्ये १० हजार तर, १७६ खाजगी अनुदानित शाळांमध्ये जवळपास ३५ हजार आहेत. सरकारच्या नव्या नियमानुसार खाजगी अनुदानित व महापालिकेच्या शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत खिचडी दिली जाते. यापूर्वी खिचडी वाटपाचे काम महिला बचत गट, महिला मंडळे आणि सामाजिक संस्थांना देण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानुसार, हे काम सेंट्रलाइज्ड किचन योजनेंतर्गत देण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने खिचडी वाटपासाठी प्रस्ताव मागविले होेते. त्याकरिता २३ जणांनी कंत्राटासाठी अर्ज केले होते. त्यापैकी पाच जणांची निवड झाली आहे. एकाने किमान १० हजार विद्यार्थ्यांना खिचडी पुरवावी, अशी या योजनेत अट आहे. त्यानुसार पाच जणांना ४५ हजार विद्यार्थ्यांना खिचडी पुरविण्याचे काम विभागून दिले गेले आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. आयुक्तांकडे या संदर्भात मंगळवारी बैठक होणार होती. मात्र, ती झालेली नाही. त्यामुळे खिचडी वाटपाच्या कामावर अंतिम निर्णय होऊन ते १० दिवसांत सुरू होईल, असा दावा शिक्षण मंडळाने केला आहे.सरकारने यापूर्वी देखील ही योजना आणली होती. मात्र, त्यावेळी २५ हजार विद्यार्थ्यांना एक पुरवठादार ही अट होती. त्यामुळे त्यास महिला बचत गटांचा विरोध होता. मुंबईतील महिला बचत गटांनी सेंट्रलाइज्ड किचन योजनेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी ही योजना रद्द करण्यात आली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानेच सेंट्रलाइज्ड किचन योजना राबविण्याचे आदेश दिल आहेत. त्यामुळे सरकारने ही योजना राबविण्याचे ठरविले आहे. परंतु, आता एका पुरवठादारास १० हजार विद्यार्थ्यांनाच खिचडी पुरवण्याची अट असल्याने त्याला महिला बचत गटांचा विरोध नाही.वाटपात खंड नाहीसेंट्रलाइज्ड किचन योजनेमुळे यापूर्वी महिला मंडळे, संस्थांना दिलेले खिचडी वाटपाचे काम रद्द करण्यात आले आहे. मात्र, जोपर्यंत सेंट्रलाइज्ड किचन योजनेअंतर्गत नव्या नियमानुसार नव्या पुरवठादारांकडून कामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत स्थानिक पातळीवर मंडळांकडून खिचडी शिजवून घेऊन तिचे वाटप करावे. त्या काळातील खिचडीचे पैसे सरकारकडून दिले जातील. खिचडी वाटपात खंड पडणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका