शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

निर्णय परिस्थितीनिहाय योग्य; पण तितकासा परिपूर्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाणार आहे आणि ज्या अकरावी प्रवेशाची चिंता होती, तेही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाणार आहे आणि ज्या अकरावी प्रवेशाची चिंता होती, तेही वैकल्पिक सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेऊन दिले जाणार, हे सरकारने घेतलेले दोन्ही निर्णय परिस्थितीनिहाय योग्यच आहेत; पण तितकेसे परिपूर्णही नाहीत. आता त्याची नेमकी अंमलबजावणी कशी होते, कधी होते, त्याबाबतच्या निर्णयात जास्त काळ जाता कामा नये, असे संमिश्र सूर उमटले आहेत ते ठाण्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्थाचालकांमधून. दहावीचा निकाल आणि अकरावीचे प्रवेश याबाबतचे धोरण ठरवून त्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिली.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने आधीच जाहीर केला आहे. मात्र, दहावीचा निकाल आणि अकरावीचे प्रवेश कोणत्या निकषांवर करणार, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्याबाबत सर्वसमावेशक असे धोरण तयार करण्यासाठी विविध बैठका घेतल्या गेल्या आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदानाबाबत धोरण ठरवले. शुक्रवारी याची माहिती दिली गेली. कोरोनाकाळात आपल्या सुरक्षिततेपेक्षा दुसरे काहीही मुलांना आणि त्यांच्या पालकांना महत्त्वाचे वाटत नाही. या पार्श्वभूमीवर या निर्णयाबाबत अनेक विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच काही शिक्षकांनी हा निर्णय योग्य आहे, असे म्हटले असले तरी काहींनी मात्र हा निर्णय अधिक परिपूर्ण हवा होता, असेही मत व्यक्त केले आहे. तर संस्थाचालकांनी हा निर्णय योग्य असून सीईटी कशा रीतीने घेतात ते पाहावे लागेल, असे म्हटले आहे.

----------

यंदा आरोग्य महत्त्वाचे असल्याने परीक्षेचा निकाल जो येईल तो मान्य असेल; पण आता प्रवेश परीक्षा कशी घेतात, त्याचे मूल्यांकन कसे करतात, हे बघावे लागेल. त्यात जास्त काळ गेला तर पुन्हा प्रवेशाला विलंब होईल.

- संकिर्णा बर्वे, विद्यार्थिनी

----------

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे; पण ९ वीच्या गुणांचाही आधार दहावीच्या अंतिम निकालात घेतला तर त्याचा परिणाम टक्केवारीवर नक्कीच होईल. दहावीला आम्ही जास्त अभ्यास केला होता. पुन्हा प्रवेश परीक्षा कशी घेणार, हेपण शासनाने स्पष्ट करायला हवे होते.

- ओमकार दवे, विद्यार्थी

-------------

शासनाने दहावीचा निकाल आणि प्रवेशाबाबत जो निर्णय घेतला तो याेग्य आहे. मात्र, तितकासा परिपूर्ण नाही. कारण विद्यार्थी ९ वीपेक्षा दहावीत अधिक अभ्यास करतात. ९ वीचे गुण निकालासाठी ग्राह्य धरले तर निकालावर परिणाम होईल. तसेच निकालाच्या मूल्यांकनात अधिक वेगळ्या दृष्टीने विचार करता आला असता. तसेच ११ वी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार पण ती ऑनलाइन की ऑफलाइन होणार हे महत्त्वाचे. परीक्षा रद्द म्हटल्यामुळे अनेक मुलांनी अभ्यास थोडासा बाजूला ठेवला होता. आता पुन्हा सीईटी म्हटल्यावर त्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने मुलांचा गोंधळ उडेल.

- चंद्रकांत जाधव, मुख्याध्यापक, शेठ ब. मा. पडवळ विद्यालय

-------------

या वर्षी जो निकाल येईल तो विद्यार्थी, पालकांनी मान्य करायला हवा. निकाल आणि प्रवेशाबाबत शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. पण आता त्याची अंमलबजावणी योग्य झाली पाहिजे. ज्या मुलांना मोठ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे आहेत त्यांचीच सीईटी घ्यावी. ज्या शाळांची कनिष्ठ महाविद्यालये आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश घ्यायचे आहेत, त्यांची सीईटी घेतली नाही तरीही चालू शकते. जिथे महानगरांमध्ये सेंट्रलाईज पद्धतीने प्रवेश होतात, तिथेच सीईटी घ्यावी. तसेच ती फॅकल्टीनिहायच घेता येईल.

- सुरेंद्र दिघे, संस्थापक, अध्यक्ष, मराठी शाळा संस्थाचालक संघ