शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी झाल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST

डोंबिवली : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने निराश झालेल्या प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवली पूर्वेत ...

डोंबिवली : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने निराश झालेल्या प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवली पूर्वेत एका व्यापाऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना सोमवारी घडली. एकापाठोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे व्यापारीवर्गातून चिंता व्यक्त होत आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेकांवर बेकारीचे संकट कोसळले असताना व्यापारीही यात भरडले गेले आहेत. कल्याण पूर्वेतील बंडू पांडे या प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे व्यवसाय डबघाईला आल्याने पांडे आर्थिक संकटात सापडले होते. दरम्यान, डोंबिवली पूर्वेत सुरज सोनी यांनादेखील लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद करावा लागला. गेल्या दीड वर्षात उपजीविकेसाठी अन्य नोकरीही न मिळाल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. दावडी परिसरात पत्नी आणि दोन लहान मुलांसह राहणाऱ्या सुरज यांचे डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात मोबाईलचे दुकान होते. ते नोटबंदी काळात बंद झाले. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर स्टॉल लावून मोबाईल विक्री आणि दुरूस्तीचे काम सुरू केले. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्यांचा हा व्यवसायदेखील बंद पडला. त्यांनी दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अपयश आले. उपजीविकेचे कोणतेच साधन नसल्याने घरची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. यात वीजबिल भरण्यासाठीदेखील सुरजकडे पैसे नव्हते. थकलेलं घरभाडं, वाढत चाललेली उसनवारी आणि त्यात कोसळलेले बेरोजगारीचे संकट या नैराश्येत त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांचे मेहुणे सुरेश सेठ यांनी दिली. या घटनेची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असतानाही निर्बंध कायम आहेत. त्यामुळे व्यापारी अडचणीत आले आहेत. तरीही सरकार निर्णय घेत नसेल तर आत्महत्येसारख्या घटना घडतच राहतील, अशा संतप्त भावना व्यापारीवर्गाकडून व्यक्त होत आहे.

-----------------

व्यवसायांवर संक्रांत

डिजिटल तसेच ऑनलाईनचा वापर वाढल्यामुळे प्रिंटिंग व्यवसाय डबघाईला आला आहे. राज्य सरकारच्या जाचक अटींमुळेही या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशातच लॉकडाऊनमुळे दीड ते दोन वर्षे व्यवसाय बंद आहे. डिजिटलचा वापर आपण समजू शकतो. परंतु सरकारने जाचक अटी रद्द कराव्यात, असे कल्याण - डोंबिवली प्रिंटिंग असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र पोपळे यांचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असल्याने आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे दुकानाचे तसेच घरभाडे कसे भरायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे काही व्यापारी तणावात आहेत, ही वस्तुस्थिती असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

----------------------