शहरं
Join us  
Trending Stories
1
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
2
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
3
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
4
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
5
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
6
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
7
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
8
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
9
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
10
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
11
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
12
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
13
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
14
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
15
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
16
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
17
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
18
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
19
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
20
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल

कर्जबाजारी झाल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST

डोंबिवली : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने निराश झालेल्या प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवली पूर्वेत ...

डोंबिवली : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने निराश झालेल्या प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवली पूर्वेत एका व्यापाऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना सोमवारी घडली. एकापाठोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे व्यापारीवर्गातून चिंता व्यक्त होत आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेकांवर बेकारीचे संकट कोसळले असताना व्यापारीही यात भरडले गेले आहेत. कल्याण पूर्वेतील बंडू पांडे या प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे व्यवसाय डबघाईला आल्याने पांडे आर्थिक संकटात सापडले होते. दरम्यान, डोंबिवली पूर्वेत सुरज सोनी यांनादेखील लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद करावा लागला. गेल्या दीड वर्षात उपजीविकेसाठी अन्य नोकरीही न मिळाल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. दावडी परिसरात पत्नी आणि दोन लहान मुलांसह राहणाऱ्या सुरज यांचे डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात मोबाईलचे दुकान होते. ते नोटबंदी काळात बंद झाले. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर स्टॉल लावून मोबाईल विक्री आणि दुरूस्तीचे काम सुरू केले. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्यांचा हा व्यवसायदेखील बंद पडला. त्यांनी दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अपयश आले. उपजीविकेचे कोणतेच साधन नसल्याने घरची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. यात वीजबिल भरण्यासाठीदेखील सुरजकडे पैसे नव्हते. थकलेलं घरभाडं, वाढत चाललेली उसनवारी आणि त्यात कोसळलेले बेरोजगारीचे संकट या नैराश्येत त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांचे मेहुणे सुरेश सेठ यांनी दिली. या घटनेची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असतानाही निर्बंध कायम आहेत. त्यामुळे व्यापारी अडचणीत आले आहेत. तरीही सरकार निर्णय घेत नसेल तर आत्महत्येसारख्या घटना घडतच राहतील, अशा संतप्त भावना व्यापारीवर्गाकडून व्यक्त होत आहे.

-----------------

व्यवसायांवर संक्रांत

डिजिटल तसेच ऑनलाईनचा वापर वाढल्यामुळे प्रिंटिंग व्यवसाय डबघाईला आला आहे. राज्य सरकारच्या जाचक अटींमुळेही या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशातच लॉकडाऊनमुळे दीड ते दोन वर्षे व्यवसाय बंद आहे. डिजिटलचा वापर आपण समजू शकतो. परंतु सरकारने जाचक अटी रद्द कराव्यात, असे कल्याण - डोंबिवली प्रिंटिंग असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र पोपळे यांचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असल्याने आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे दुकानाचे तसेच घरभाडे कसे भरायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे काही व्यापारी तणावात आहेत, ही वस्तुस्थिती असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

----------------------