शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

ठाणे जिल्ह्यात वीजेच्या धक्याने दोघांचा मृत्य; धरणातील पाणी साठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 16:55 IST

ठाणे : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या दरम्यान रात्रभरातील वीजेच्या धक्याच्या दुर्घटनेत अंबरनाथसह ठाण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला. तर काही ...

ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी १९०.९४ मिमी.सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २५० मिमी.१७१ मिमी. सर्वाधिक पाऊस बारवी धरणात

ठाणे : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या दरम्यान रात्रभरातील वीजेच्या धक्याच्या दुर्घटनेत अंबरनाथसह ठाण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला. तर काही उल्हासनगरमधील मार्केटमध्ये पाणी साचले. जिल्ह्यात सरासरी १९०.९४ मिमी. पडल्याची नोंद झाली असून धरणांच्या पाणी साठ्यात दीड ते सव्वा दोन टक्केने वाढ झाली आहे.       येथील पश्चिमेकडील शिरोर पाडा येथे वीजेच्या तारावर झाडाची फांदी पडली. त्याव्दारे वीजेचा धक्का बसून नागेश मलअप्पा निरंगे (४६) यांचा मृत्यू झाला. या प्रकारची दुर्घटना आंबरनाथ रेल्वे स्टेशनबाहेरील परिसरात झाडाच्या फांदीमुळे वीजेचा धक्का लागून स्टँडवर उभ्या असलेल्या रिक्षातील चालक विश्न नामक व्यक्तीचा मृत्यू झाला. तर येथील कामगार नाक्याजवळी इंदिरा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यात रात्री झाड पडल्याची घटना घउली. या दुर्दैवी घटने व्यतिरिक्त जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचे दिसून येत आहे.        जिल्ह्यात एक हजार ३३६ मिमी पाऊस पउला. यामध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २५० मिमी. तर या खालोखाल कल्याणला २३८ मिमी, ठाणेला २२८, उल्हासनगरला २०८, अंबरनाथला १८७, शहापूरला १७० मिमी. पाऊस पडला. सर्वात कमी पाऊस मुरबाड तालुक्यात ५५ मिमी पाऊस पडला. आहे.जिल्ह्यात सरासरी १९०.९४ मिमी. पाऊस मागील २४ तासात पडल्याची नोंद करण्यात आली आहे.याप्रमाणेच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढलेला असल्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.        भातसा धरणात १७० मिमी. तर मोडकसागरमध्ये ११९, तानसात १२७ मिमी पाऊस पडला आहे. याप्रमाणेच बारवी धरणातील पाणी साठ्यातही वाढ झाल्याचे आढळून आले. या धरणात रात्रभरात सब्बा दोन टक्के पाणी साठा वाढला असून तो आता १५.२० टक्के आहे. या धरणात १७१ मिमी. सर्वाधिक पाऊस पडला. या बारवी धरणातील पाणलोटक्षत्रापैकी खानीवरे परिसरात १६२ मिमी, कानहोल परिसरात १६१ मिमी. पाटगाव क्षेत्रात १८४ आणि ठाकूरवाडी परिसरात १३१ मिमी पाऊस या पाणलोट क्षेत्रात पडल्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेdam tourismधरण पर्यटन