शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जागतिक सासू दिन, एक दिवस सासूचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 04:02 IST

सासू आणि सून हे नाते आई, बहिण, मावशी किंवा आजी यासारखे जन्मापासून जुळणारे नाते नाही.

- महापौर मीनाक्षी शिंदेसासू आणि सून हे नाते आई, बहिण, मावशी किंवा आजी यासारखे जन्मापासून जुळणारे नाते नाही. लग्नगाठ बांधली गेल्यावर हे नाते जुळते. सासू-सून या नात्याने अनेक कथा, कादंबºया, नाटक, चित्रपट यांना मसाला पुरवला आहे. सध्या छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये सासू-सून यांची जुगलबंदी तरी पाहायला मिळते किंवा ऋणानुबंध अनुभवायला मिळतात. त्यामुळे हे नाते वजा केले तर आपली करमणूक इंडस्ट्री कोसळून पडेल इतकी ताकद या नातेसंबंधात आहे. ‘जागतिक सासू दिना’निमित्त दोन सूनांनी आपल्या सासवांशी असलेल्या नातेसंबंधांचे उलगडलेले पदर...आपण आपल्या आई सोबत जसे वागतो तसेच आपण आपल्या सासू सोबत वागलो तर आई-मुलीचे नाते असते तसेच नाते सासु आणि सुनेचे होऊ शकेल. सुदैवाने मी स्वत:ला भाग्यवान समजते की मला अगदी आईसारख्या सासुबाई मिळाल्या आहेत. त्यांना तीन मुले असतांनाही त्या आपल्या सुनांना मुलींसारखाच जीव लावतात. त्यामुळेच आज माझ्या नगरसेवक ते महापौरपदापर्यंतच्या प्रवासात त्यांचा माझ्या दृष्टीने खूप मोठा व मोलाचा वाटा आहे.माझ्या लग्नाला आज २२ वर्षे झाली आहेत. परंतु आजही माझे आणि माझ्या सासूचे नाते दृढ आहे. माझा प्रेमविवाह असल्याने आम्ही लग्नानंतर वेगळे राहू लागलो. परंतु वेगळे राहत असतांना देखील माझ्या आणि सासुच्या नात्यात कधीच कटुता आलेली नाही. उलट त्या आजही माझी आणि माझ्या मुलांची काळजी घेत असतात. आज मी महापौर झाले असले तरी त्याचा जास्तीत जास्त आनंद त्यांना झालेला आहे. किंबहुना त्यांना याचा सार्थ अभिमान वाटतो. नगरसेविका झाल्यापासून कामाचा व्याप वाढलेला आहे. त्यामुळे मुलांकडे कोण बघणार, त्यांचे जेवणाचे काय होणार, याचा विचार मला कधीच करावा लागलेला नाही. कारण माझ्या सासुबाई नेहमीच माझ्या दोन्ही मुलींची काळजी घेत असतात. त्यांना सकाळी नाश्त्यापासून ते शाळेत सोडण्यापर्यंत जवळ जवळ सर्वच कामे त्या करीत असतात. माझी देखील आपल्या मुलीसारखी काळजी त्या करीत असतात. महापौर झाल्यावर माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे जेवणाच्या वेळा आणि घरी जाण्याच्या वेळांमध्ये बदल झाले आहेत. या धावपळीत आपल्या तब्येतीची काळजी घे, असे म्हणणाºया माझ्या सासुबाईच आहेत. मला त्यांच्याकडून आणखी काम करण्याची ऊर्जा आणि प्रोत्साहन नेहमीच मिळत असते. काही दिवसांपूर्वी दगदगीमुळे आजारी पडले तेव्हा त्या रुग्णालयात माझी काळजी घेण्यासाठी दिवस-रात्र हजर होत्या. आपल्या कामाच्या व्यापातून आपल्या मुलांवर संस्कार करणे गरजेचे असते. ते काम मला जमत नाही. परंतु, मी निश्चिंत आहे, कारण मला माझ्या सासुबाईंवर पूर्ण विश्वास आहे. त्या मुलांवर चांगले संस्कार करतील, याची पक्की खात्री आहे. आपल्या मुलांबरोबर, सुनांची आणि नातवंडाची काळजी कशी घ्यावी, त्यांना खायला काय हवे, काय नको, याची सर्वच माहिती त्यांना आहे. शिवाय माझ्या सुखात आणि दु:खात त्या नेहमी माझ्या सोबत सतत असतात.आता समाज बदलतो आहे, एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येऊन, विभक्त कुटुंबपध्दतीकडे लोकांचा कल राहिला आहे. परंतु माझ्या मते घरात एक तरी ज्येष्ठ व्यक्ती असावी. त्यांच्यामुळे आपल्यावर चांगले संस्कार घडतात. भांडणे कोणाच्या घरी होत नाहीत, घरोघरी मातीची चुली असतातच. परंतु आपण कसे वागावे हे आपल्या हातात असते. आपण जर आपल्या सासुला आईचे स्थान दिले आणि सासुने देखील सुनेला मुलीसारखे मानले तर मला वाटते की, भांड्याला भांडे लागणारच नाही.- शब्दांकन : अजित मांडके