शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दत्तारामभाऊ कोयंडेचे कार्य प्रेरणादायी- लोकमत दिनविशेष

By admin | Updated: August 9, 2014 00:37 IST

मीठ सत्याग्रहातील देशातील पहिला हुतात्मा

आचरा : मालवण, मिठबाव आणि शिरोड्यात मिठाच्या सत्याग्रहींना आवरणे ब्रिटीश सरकारला कठीण झाले होते. अनेक लोक गोळीबारांनी रक्तबंबाळ झाले. सरकारने शेकडो सत्याग्रहींना पकडून तुरूंगात टाकले. याचवेळी कराची बंदरकिनारीही मिठाचा सत्याग्रह सुरू झाला. या सत्याग्रहात जयरामदास, दौलतराम, नारायण दास आनंदजी, नसरबाणजी जमशेठजी आदी कराचीतील लोकनेते सामील झाले. अशावेळी हुतात्मा दत्तारामभाऊ कोयंडे हा ‘कोकणी’ वीरही या सत्याग्रहात सामील झाला आणि हुतात्मा झाला.महात्मा गांधींनी दांडी येथे पदयात्रेने जाऊन तेथील समुद्र काठावरील मुठभर मीठ उचलून सरकारचा कायदा मोडला. त्यांनी सुरू केलेल्या या मिठाच्या सत्याग्रहाचे लोण हा हा म्हणता देशभर पसरले होते. या आंदोलनात दत्ताराम भाऊंचे कार्य प्रेरणादायी असेच आहे. वीर दत्तारामभाऊ कोयंडे यांचा जन्म मालवण तालुक्यातील संस्थानकालीन आचरा पिरावाडी येथे १५ जुलै १९०७ रोजी झाला. दुर्दैवाने त्यांचे मातृछत्र वयाच्या पाचव्या वर्षी हरपले. त्यांचे वडील लक्ष्मण कोयंडे त्याचवेळी पोट भरण्यासाठी कराची केमारी येथे कस्टम खात्यात नोकरीला होते. त्यांनी मुलांचे संगोपन उत्तमप्रकारे केले. दत्तारामचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण केमारी येथे झाले. मिठाच्या सत्याग्रहात पकडलेल्या सत्याग्रहींवर १६ एप्रिल १९३० रोजी कोर्टात खटल्याची सुरूवात झाली. कोर्टातील या खटल्याची बातमी अगोदरच लोकांना कळल्याने आवार फुलून गेले होते. सकाळी १० वाजल्यापासून लोक गटागटाने येत होते. आपल्या आवडत्या नेत्यावर अन्याय होत आहे, या भावनेने जमाव कोर्टाच्या दिशेने सरकत होता. गांधीचा जयजयकार करीत होते. कोर्टाच्या दिशेने दगड-विटांचे वर्षाव होत होते. जमाव मागे हटण्याची चिन्हे दिसत नव्हती. बंदुकीच्या फैरी झडू लागल्या. बेफाम झालेला जमाव मागे हटविण्यासाठी वीर दत्ताराम जमावासमोर जाऊन त्यांना मागे हटविण्याचा प्रयत्न करीत होता. इतक्यात कोर्टाच्या गच्चीवरून ३ गोळ््या दत्तारामच्या छातीत आणि डोक्यामध्ये घुसल्या आणि वीर दत्ताराम हुतात्मा झाला. (वार्ताहर)मीठ सत्याग्रहातील देशातील पहिला हुतात्मामिठाच्या सत्याग्रहातील दत्ताराम देशातील पहिला हुतात्मा झाला. कराची मिठाच्या सत्याग्रहात दत्ताराम शहीद झाल्याचे कळताच कराचीतील सारा समाज हळहळला. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने लोक सामील झाले. हुतात्मा दत्तारामच्या नावाने महाराष्ट्रात उल्हासनगर येथे तसेच त्यांच्या जन्मगावी आचरा येथे स्मारक आहे. तसेच मुंबई येथे माजगाव येथे एका रस्त्याला दत्ताराम यांचे नाव दिलेले आहे. शासनाने आचरा गावी हमरस्त्यावर त्यांचे स्मारक उभारले आहे. त्यांच्या आठवणींना दरवर्षी उजाळा दिला जातो. त्यादिवशी विविध कार्यक्रम होतात.