शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

दत्तारामभाऊ कोयंडेचे कार्य प्रेरणादायी- लोकमत दिनविशेष

By admin | Updated: August 9, 2014 00:37 IST

मीठ सत्याग्रहातील देशातील पहिला हुतात्मा

आचरा : मालवण, मिठबाव आणि शिरोड्यात मिठाच्या सत्याग्रहींना आवरणे ब्रिटीश सरकारला कठीण झाले होते. अनेक लोक गोळीबारांनी रक्तबंबाळ झाले. सरकारने शेकडो सत्याग्रहींना पकडून तुरूंगात टाकले. याचवेळी कराची बंदरकिनारीही मिठाचा सत्याग्रह सुरू झाला. या सत्याग्रहात जयरामदास, दौलतराम, नारायण दास आनंदजी, नसरबाणजी जमशेठजी आदी कराचीतील लोकनेते सामील झाले. अशावेळी हुतात्मा दत्तारामभाऊ कोयंडे हा ‘कोकणी’ वीरही या सत्याग्रहात सामील झाला आणि हुतात्मा झाला.महात्मा गांधींनी दांडी येथे पदयात्रेने जाऊन तेथील समुद्र काठावरील मुठभर मीठ उचलून सरकारचा कायदा मोडला. त्यांनी सुरू केलेल्या या मिठाच्या सत्याग्रहाचे लोण हा हा म्हणता देशभर पसरले होते. या आंदोलनात दत्ताराम भाऊंचे कार्य प्रेरणादायी असेच आहे. वीर दत्तारामभाऊ कोयंडे यांचा जन्म मालवण तालुक्यातील संस्थानकालीन आचरा पिरावाडी येथे १५ जुलै १९०७ रोजी झाला. दुर्दैवाने त्यांचे मातृछत्र वयाच्या पाचव्या वर्षी हरपले. त्यांचे वडील लक्ष्मण कोयंडे त्याचवेळी पोट भरण्यासाठी कराची केमारी येथे कस्टम खात्यात नोकरीला होते. त्यांनी मुलांचे संगोपन उत्तमप्रकारे केले. दत्तारामचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण केमारी येथे झाले. मिठाच्या सत्याग्रहात पकडलेल्या सत्याग्रहींवर १६ एप्रिल १९३० रोजी कोर्टात खटल्याची सुरूवात झाली. कोर्टातील या खटल्याची बातमी अगोदरच लोकांना कळल्याने आवार फुलून गेले होते. सकाळी १० वाजल्यापासून लोक गटागटाने येत होते. आपल्या आवडत्या नेत्यावर अन्याय होत आहे, या भावनेने जमाव कोर्टाच्या दिशेने सरकत होता. गांधीचा जयजयकार करीत होते. कोर्टाच्या दिशेने दगड-विटांचे वर्षाव होत होते. जमाव मागे हटण्याची चिन्हे दिसत नव्हती. बंदुकीच्या फैरी झडू लागल्या. बेफाम झालेला जमाव मागे हटविण्यासाठी वीर दत्ताराम जमावासमोर जाऊन त्यांना मागे हटविण्याचा प्रयत्न करीत होता. इतक्यात कोर्टाच्या गच्चीवरून ३ गोळ््या दत्तारामच्या छातीत आणि डोक्यामध्ये घुसल्या आणि वीर दत्ताराम हुतात्मा झाला. (वार्ताहर)मीठ सत्याग्रहातील देशातील पहिला हुतात्मामिठाच्या सत्याग्रहातील दत्ताराम देशातील पहिला हुतात्मा झाला. कराची मिठाच्या सत्याग्रहात दत्ताराम शहीद झाल्याचे कळताच कराचीतील सारा समाज हळहळला. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने लोक सामील झाले. हुतात्मा दत्तारामच्या नावाने महाराष्ट्रात उल्हासनगर येथे तसेच त्यांच्या जन्मगावी आचरा येथे स्मारक आहे. तसेच मुंबई येथे माजगाव येथे एका रस्त्याला दत्ताराम यांचे नाव दिलेले आहे. शासनाने आचरा गावी हमरस्त्यावर त्यांचे स्मारक उभारले आहे. त्यांच्या आठवणींना दरवर्षी उजाळा दिला जातो. त्यादिवशी विविध कार्यक्रम होतात.