शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

दत्तारामभाऊ कोयंडेचे कार्य प्रेरणादायी- लोकमत दिनविशेष

By admin | Updated: August 9, 2014 00:37 IST

मीठ सत्याग्रहातील देशातील पहिला हुतात्मा

आचरा : मालवण, मिठबाव आणि शिरोड्यात मिठाच्या सत्याग्रहींना आवरणे ब्रिटीश सरकारला कठीण झाले होते. अनेक लोक गोळीबारांनी रक्तबंबाळ झाले. सरकारने शेकडो सत्याग्रहींना पकडून तुरूंगात टाकले. याचवेळी कराची बंदरकिनारीही मिठाचा सत्याग्रह सुरू झाला. या सत्याग्रहात जयरामदास, दौलतराम, नारायण दास आनंदजी, नसरबाणजी जमशेठजी आदी कराचीतील लोकनेते सामील झाले. अशावेळी हुतात्मा दत्तारामभाऊ कोयंडे हा ‘कोकणी’ वीरही या सत्याग्रहात सामील झाला आणि हुतात्मा झाला.महात्मा गांधींनी दांडी येथे पदयात्रेने जाऊन तेथील समुद्र काठावरील मुठभर मीठ उचलून सरकारचा कायदा मोडला. त्यांनी सुरू केलेल्या या मिठाच्या सत्याग्रहाचे लोण हा हा म्हणता देशभर पसरले होते. या आंदोलनात दत्ताराम भाऊंचे कार्य प्रेरणादायी असेच आहे. वीर दत्तारामभाऊ कोयंडे यांचा जन्म मालवण तालुक्यातील संस्थानकालीन आचरा पिरावाडी येथे १५ जुलै १९०७ रोजी झाला. दुर्दैवाने त्यांचे मातृछत्र वयाच्या पाचव्या वर्षी हरपले. त्यांचे वडील लक्ष्मण कोयंडे त्याचवेळी पोट भरण्यासाठी कराची केमारी येथे कस्टम खात्यात नोकरीला होते. त्यांनी मुलांचे संगोपन उत्तमप्रकारे केले. दत्तारामचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण केमारी येथे झाले. मिठाच्या सत्याग्रहात पकडलेल्या सत्याग्रहींवर १६ एप्रिल १९३० रोजी कोर्टात खटल्याची सुरूवात झाली. कोर्टातील या खटल्याची बातमी अगोदरच लोकांना कळल्याने आवार फुलून गेले होते. सकाळी १० वाजल्यापासून लोक गटागटाने येत होते. आपल्या आवडत्या नेत्यावर अन्याय होत आहे, या भावनेने जमाव कोर्टाच्या दिशेने सरकत होता. गांधीचा जयजयकार करीत होते. कोर्टाच्या दिशेने दगड-विटांचे वर्षाव होत होते. जमाव मागे हटण्याची चिन्हे दिसत नव्हती. बंदुकीच्या फैरी झडू लागल्या. बेफाम झालेला जमाव मागे हटविण्यासाठी वीर दत्ताराम जमावासमोर जाऊन त्यांना मागे हटविण्याचा प्रयत्न करीत होता. इतक्यात कोर्टाच्या गच्चीवरून ३ गोळ््या दत्तारामच्या छातीत आणि डोक्यामध्ये घुसल्या आणि वीर दत्ताराम हुतात्मा झाला. (वार्ताहर)मीठ सत्याग्रहातील देशातील पहिला हुतात्मामिठाच्या सत्याग्रहातील दत्ताराम देशातील पहिला हुतात्मा झाला. कराची मिठाच्या सत्याग्रहात दत्ताराम शहीद झाल्याचे कळताच कराचीतील सारा समाज हळहळला. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने लोक सामील झाले. हुतात्मा दत्तारामच्या नावाने महाराष्ट्रात उल्हासनगर येथे तसेच त्यांच्या जन्मगावी आचरा येथे स्मारक आहे. तसेच मुंबई येथे माजगाव येथे एका रस्त्याला दत्ताराम यांचे नाव दिलेले आहे. शासनाने आचरा गावी हमरस्त्यावर त्यांचे स्मारक उभारले आहे. त्यांच्या आठवणींना दरवर्षी उजाळा दिला जातो. त्यादिवशी विविध कार्यक्रम होतात.