शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

‘दिव्या’खालचा अंधार दूर होणार

By admin | Updated: March 22, 2017 01:27 IST

महापालिका निवडणुकीत मुख्य आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या दिव्याच्या विकास कामांचा नारळ अखेर पहिल्याच महासभेत फुटला आहे.

ठाणे : महापालिका निवडणुकीत मुख्य आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या दिव्याच्या विकास कामांचा नारळ अखेर पहिल्याच महासभेत फुटला आहे. शिवसेनेने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केल्याचे यातून दिसत असून त्याची ही सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. अनधिकृत बांधकामांचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिवा गावात मूलभूत सोयीसुविधांच्या नावाने मात्र बोंबच असल्याचे दिसते आहे. पाणी नाही, वेळेत वीज नाही, रस्ते नाहीत, वेळेवर रिक्षा नाहीत, डंपिंगची दुर्गंधी अशा वातावरणात येथील रहिवाशांना राहावे लागत आहे. विशेष म्हणजे या गावात मराठमोळ्या नागरिकांचे प्राबल्य आहे. त्यामुळेच येथील नगरसेवकांच्या ११ जागांचा विचार करु न महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिवा गावात सभा घेऊन दिव्याच्या विकासाचे आश्वासन दिले होते. परंतु, या दोन्ही पक्षाला येथे प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान शिवसेनेने येथे केवळ विभागीय मेळावे घेऊन दिव्याच्या विकासाचा दावा केला होता. त्यानुसार सत्तेत आल्यानंतर याच विकास कामांचा नारळ पहिल्याच महासभेत फोडण्यात आला आहे. यामध्ये पोलीस स्टेशन, बस स्टँड, मार्केट, संप व इएसआर, प्रभाग कार्यालय, हॉस्पीटल, १५ मीटर रु ंद रस्ता, पार्कींग आणि अग्निशमन केंद्राचा समावेश आहे. याच बरोबर रेल्वेने या आगासन येथील सेक्टर १० मधील १३.८७ हेक्टरचे आरक्षण ताब्यात न घेतल्याने महापालिकेने अखेर या ठिकाणीही दिव्याच्या विकासासाठी योग्य ठरतील अशा प्रकल्पाच्या नारळ फोडण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील फेरबदलाचा प्रस्ताव २० मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला असता त्याला एकमताने मंजुरी मिळाल्याने आता दिव्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)