शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
2
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
3
₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
4
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
5
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
6
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
7
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
8
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
9
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
10
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
11
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
13
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
14
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
15
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
16
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
17
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
18
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
19
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!

भंगार गाड्यांमुळे काळ्या-पिवळ्या जीपचा धोका

By admin | Updated: May 3, 2017 05:42 IST

कल्याण-मुरबाड मार्गावर आरटीओच्या आशीर्वादाने दावणाऱ्या खाजगी काळया-पिवळ््या जीपपैकी अनेक भंगात निघालेल्या

कल्याण : कल्याण-मुरबाड मार्गावर आरटीओच्या आशीर्वादाने दावणाऱ्या खाजगी काळया-पिवळ््या जीपपैकी अनेक भंगात निघालेल्या असूनही त्यात क्षमतेपेक्षा अदिक प्रवासी कोंबले जात असल्याने हा प्रवास जीवघेणा होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. तक्रार करूनही कल्याण आरटीओ कार्यालयाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.कल्याण-मुरबाडदरम्यानचे अंतर ३० किलोमीटर आहे. त्या मार्गावर एसटी सोडल्या जातात. पण प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत त्या अफुऱ्या पडतात. अनेक बस वेळेवर धावत नाहीत. शिवायत्यातील अनेक गाड्या थेट मुरबाडला जात असल्याने मधील गावांत उतरणाऱ्यांची गैरसोय होते. शिवाय माळशेज घाटमार्गे नगर आणि अन्य लांबच्या प्रवासाला दर १५ मिनिटांनी जाणाऱ्या गाड्यांत या प्रवाशांना चढू दिले जात नाही. कंडक्टरकडून मुरबाडच्या प्रवाशांना मज्जाव केला जातो. तसेच मध्यल्या स्टॉपवर उतरणारे प्रवासी घेतले जात नाही. मुरबाडहून महाविद्यालयात शिक्षण घेणारे, कामानिमित्त कल्याण, मुंबई, ठाणे, नवी मुंबईला जाणारे अनेक कामगार, शेतकरी, व्यापारी येत असतात. त्यांना बस वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने प्रवासी बसऐवजी काळ््या-पिवळ््या जीपचा आधार घेतात. कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळून ज्या जीप सुटतात. एका जीपमध्ये चालक धरुन नऊ प्रवासी बसतात. त्यात एका प्रवाशाकडून ३५ ते ४० रुपयांचे भाडे घेतले जाते. तरीही जादा नफा कमावण्याच्या उद्देशाने जीप चालकांकडून जास्तीचे प्रवासी कोंबले जातात. अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक जीपला सिग्नलचे दिवे नाहीत. अनेक गाड्यांना नीट काचा नाहीत. गाड्यांचे पत्रे गंजलेले आहेत. बसण्यासाठी नीट सीट नाहीत. गाड्यांचे टायर घासून गुळगुळीत झालेले आहे. काही टायर तर शिलाई मारुन तसेच चालविले जात आहेत. प्रवासी राजू वाघमारे यांनी सांगितले, पैसे घेऊनही चांगल्या जीप चालविल्या जात नाही. त्यामुळे प्रवाशांना धोका आहे. (प्रतिनिधी)एकाचवेळी सर्व जीप बंद करणे कठीण१मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपच्या विरोधात तक्रारी येत आहेत. सात जीपगाड्यांविरोधात कारवाई केली आहे. त्यापैकी दोन जीपचालकांनी त्यांच्या परवान्यांचेही नुतनीकरण केलेले नसल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती आरटीओ अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली. २कारवाई केलेल्या जीप कल्याण बस डेपोत उभ्या करुन ठेवल्या आहेत. कल्याण-मुरबाड मार्गावर जवळपास २२ जीपचालक व्यवसाय करतात. या सगळ््या गाड्या बंद केल्यास प्रवाशांचीच गैरसोय होईल. एकाच वेळी कारवाई करणे शक्य नाही. पण सगळ््या गाड्यांचा तांत्रिक फिटनेस तपासला जाणार आहे, असे ते म्हणाले.भंगार जीपसाठी प्रवाशांना नुकसानभरपाई नाही!या जीपचालकांना किशोर, गोवेली, मामनोली या गावचे प्रवासीही मिळतात. तरी हव्यासापोटी जास्तीचे प्रवासी भरुन वाहतूक केली जाते. जीप चालकांकडून दर वर्षाला १२ हजार रुपयांचा विमा काढला जातो. जीपच्या धडकेत प्रवासी जखमी झाला, तर मोटार वाहन अपघात दाव्यानुसार संबंधित विमा कंपनीकडून प्रवाशाला अपघात नुकसानभरपाई मिळते अशा नियम असला तरी नुकसानभरपाई मिळालेली प्रकरणे दुर्मिळ आहेत. जीपची धडक लागणाऱ्या प्रवाशाला विमा मिळतो. भंगार जीपमधून प्रवास करताना त्याला अपघात झाला; त्याच्या जीवाचे बरेवाईट झाले, तर त्याला नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद नसल्याचे वाघमारे यांनी नमूद केले.