शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

भंगार गाड्यांमुळे काळ्या-पिवळ्या जीपचा धोका

By admin | Updated: May 3, 2017 05:42 IST

कल्याण-मुरबाड मार्गावर आरटीओच्या आशीर्वादाने दावणाऱ्या खाजगी काळया-पिवळ््या जीपपैकी अनेक भंगात निघालेल्या

कल्याण : कल्याण-मुरबाड मार्गावर आरटीओच्या आशीर्वादाने दावणाऱ्या खाजगी काळया-पिवळ््या जीपपैकी अनेक भंगात निघालेल्या असूनही त्यात क्षमतेपेक्षा अदिक प्रवासी कोंबले जात असल्याने हा प्रवास जीवघेणा होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. तक्रार करूनही कल्याण आरटीओ कार्यालयाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.कल्याण-मुरबाडदरम्यानचे अंतर ३० किलोमीटर आहे. त्या मार्गावर एसटी सोडल्या जातात. पण प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत त्या अफुऱ्या पडतात. अनेक बस वेळेवर धावत नाहीत. शिवायत्यातील अनेक गाड्या थेट मुरबाडला जात असल्याने मधील गावांत उतरणाऱ्यांची गैरसोय होते. शिवाय माळशेज घाटमार्गे नगर आणि अन्य लांबच्या प्रवासाला दर १५ मिनिटांनी जाणाऱ्या गाड्यांत या प्रवाशांना चढू दिले जात नाही. कंडक्टरकडून मुरबाडच्या प्रवाशांना मज्जाव केला जातो. तसेच मध्यल्या स्टॉपवर उतरणारे प्रवासी घेतले जात नाही. मुरबाडहून महाविद्यालयात शिक्षण घेणारे, कामानिमित्त कल्याण, मुंबई, ठाणे, नवी मुंबईला जाणारे अनेक कामगार, शेतकरी, व्यापारी येत असतात. त्यांना बस वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने प्रवासी बसऐवजी काळ््या-पिवळ््या जीपचा आधार घेतात. कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळून ज्या जीप सुटतात. एका जीपमध्ये चालक धरुन नऊ प्रवासी बसतात. त्यात एका प्रवाशाकडून ३५ ते ४० रुपयांचे भाडे घेतले जाते. तरीही जादा नफा कमावण्याच्या उद्देशाने जीप चालकांकडून जास्तीचे प्रवासी कोंबले जातात. अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक जीपला सिग्नलचे दिवे नाहीत. अनेक गाड्यांना नीट काचा नाहीत. गाड्यांचे पत्रे गंजलेले आहेत. बसण्यासाठी नीट सीट नाहीत. गाड्यांचे टायर घासून गुळगुळीत झालेले आहे. काही टायर तर शिलाई मारुन तसेच चालविले जात आहेत. प्रवासी राजू वाघमारे यांनी सांगितले, पैसे घेऊनही चांगल्या जीप चालविल्या जात नाही. त्यामुळे प्रवाशांना धोका आहे. (प्रतिनिधी)एकाचवेळी सर्व जीप बंद करणे कठीण१मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपच्या विरोधात तक्रारी येत आहेत. सात जीपगाड्यांविरोधात कारवाई केली आहे. त्यापैकी दोन जीपचालकांनी त्यांच्या परवान्यांचेही नुतनीकरण केलेले नसल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती आरटीओ अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली. २कारवाई केलेल्या जीप कल्याण बस डेपोत उभ्या करुन ठेवल्या आहेत. कल्याण-मुरबाड मार्गावर जवळपास २२ जीपचालक व्यवसाय करतात. या सगळ््या गाड्या बंद केल्यास प्रवाशांचीच गैरसोय होईल. एकाच वेळी कारवाई करणे शक्य नाही. पण सगळ््या गाड्यांचा तांत्रिक फिटनेस तपासला जाणार आहे, असे ते म्हणाले.भंगार जीपसाठी प्रवाशांना नुकसानभरपाई नाही!या जीपचालकांना किशोर, गोवेली, मामनोली या गावचे प्रवासीही मिळतात. तरी हव्यासापोटी जास्तीचे प्रवासी भरुन वाहतूक केली जाते. जीप चालकांकडून दर वर्षाला १२ हजार रुपयांचा विमा काढला जातो. जीपच्या धडकेत प्रवासी जखमी झाला, तर मोटार वाहन अपघात दाव्यानुसार संबंधित विमा कंपनीकडून प्रवाशाला अपघात नुकसानभरपाई मिळते अशा नियम असला तरी नुकसानभरपाई मिळालेली प्रकरणे दुर्मिळ आहेत. जीपची धडक लागणाऱ्या प्रवाशाला विमा मिळतो. भंगार जीपमधून प्रवास करताना त्याला अपघात झाला; त्याच्या जीवाचे बरेवाईट झाले, तर त्याला नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद नसल्याचे वाघमारे यांनी नमूद केले.