शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

धोकादायक भाग कोसळला

By admin | Updated: July 2, 2017 06:04 IST

ग्रामपंचायतीने धोकादायक इमारत म्हणून जाहीर केलेल्या इमारतीचा काही भाग शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात कोसळला. अशा स्थितीत

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : ग्रामपंचायतीने धोकादायक इमारत म्हणून जाहीर केलेल्या इमारतीचा काही भाग शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात कोसळला. अशा स्थितीत उरलेल्या इमारतीच्या काही भागात दोन कुटुंबे राहत आहेत. शहराजवळ खाडीपार-खोणी ग्रामपंचायत हद्दीत एकता चौकामध्ये आरफात शेख यांच्या मालकीची दोन मजली इमारत आहे. या इमारतीस ग्रामपंचायतीने धोकादायक जाहीर करूनही मालकाने ती पाडली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने इमारतीला धोका निर्माण झाला होता. शुक्रवारी रात्रीच्या वेळी इमारतीत पाणी घुसून पहिल्या मजल्यावरील काही भाग व भिंत अचानक कोसळली. रात्रीच्या वेळी इमारतीच्या तळमजल्यावरील दुकाने बंद असल्याने जीवितहानी टळली. इमारतीत पागडीने राहत असलेल्या दोन कुटुंबांची पर्यायी व्यवस्था केली. परंतु, दुसऱ्या मजल्यावरील दोन कुटुंबांनी अद्याप आपल्या खोल्या सोडलेल्या नाहीत. धोकादायक इमारत असूनही इमारतीत वीजपुरवठा सुरू असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. या दुर्घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलाने अथवा संबंधित पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना तसेच ग्रामीण आपत्ती व्यवस्थापनास न दिल्याने महसूल विभागाला तीन तासांनी माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचली.भिवंडीतील धोकादायक इमारतींचा विषय दरवर्षी पावसाळ््यात समोर येतो आणि नंतर त्यावर काहीही कारवाई होत नाही. गेल्यावर्षीही दोन इमारती कोसळल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला होता. यंदा मे महिन्यातच राज्य सरकराने अशा इमारतींची वर्गवारी करून त्या तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे या घटनेतून समोर आले. मालकाने ही इमारत न तोडल्याने आणि त्यासाठी पंचायतीने त्याच्याकडे आग्रह न धरल्याने मोठी दुर्घटना होता होता वाचली. पण त्यातून शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्नही समोर आला आहे.