शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

धोकादायक भाग कोसळला

By admin | Updated: July 2, 2017 06:04 IST

ग्रामपंचायतीने धोकादायक इमारत म्हणून जाहीर केलेल्या इमारतीचा काही भाग शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात कोसळला. अशा स्थितीत

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : ग्रामपंचायतीने धोकादायक इमारत म्हणून जाहीर केलेल्या इमारतीचा काही भाग शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात कोसळला. अशा स्थितीत उरलेल्या इमारतीच्या काही भागात दोन कुटुंबे राहत आहेत. शहराजवळ खाडीपार-खोणी ग्रामपंचायत हद्दीत एकता चौकामध्ये आरफात शेख यांच्या मालकीची दोन मजली इमारत आहे. या इमारतीस ग्रामपंचायतीने धोकादायक जाहीर करूनही मालकाने ती पाडली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने इमारतीला धोका निर्माण झाला होता. शुक्रवारी रात्रीच्या वेळी इमारतीत पाणी घुसून पहिल्या मजल्यावरील काही भाग व भिंत अचानक कोसळली. रात्रीच्या वेळी इमारतीच्या तळमजल्यावरील दुकाने बंद असल्याने जीवितहानी टळली. इमारतीत पागडीने राहत असलेल्या दोन कुटुंबांची पर्यायी व्यवस्था केली. परंतु, दुसऱ्या मजल्यावरील दोन कुटुंबांनी अद्याप आपल्या खोल्या सोडलेल्या नाहीत. धोकादायक इमारत असूनही इमारतीत वीजपुरवठा सुरू असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. या दुर्घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलाने अथवा संबंधित पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना तसेच ग्रामीण आपत्ती व्यवस्थापनास न दिल्याने महसूल विभागाला तीन तासांनी माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचली.भिवंडीतील धोकादायक इमारतींचा विषय दरवर्षी पावसाळ््यात समोर येतो आणि नंतर त्यावर काहीही कारवाई होत नाही. गेल्यावर्षीही दोन इमारती कोसळल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला होता. यंदा मे महिन्यातच राज्य सरकराने अशा इमारतींची वर्गवारी करून त्या तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे या घटनेतून समोर आले. मालकाने ही इमारत न तोडल्याने आणि त्यासाठी पंचायतीने त्याच्याकडे आग्रह न धरल्याने मोठी दुर्घटना होता होता वाचली. पण त्यातून शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्नही समोर आला आहे.