शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धोकादायक इमारती स्ट्रक्चरल ऑडिटविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 00:27 IST

संरचनात्मक अभियंतापद रिक्त : जीव मुठीत घेऊन राहत आहेत नागरिक

सदानंद नाईक

उल्हासनगर : महापालिकेने १५० पेक्षा जास्त धोकादायक इमारती जाहीर केल्या असून संरचनात्मक अभियंताविना इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट रखडले आहे. हजारो नागरिक अशा इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहत आहेत. धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर २० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे महापालिकेने सुचविले. तसेच आॅडिट करण्यासाठी नाखवा नावाच्या संस्थेची निवड केली. मात्र, किती जुन्या व धोकादायक इमारतींचे आॅडिट झाले, आदींची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, शहरातील २००५ पूर्वीची बेकायदा बांधकामे व धोकादायक इमारती सरकारी अध्यादेशानुसार नियमित करण्यासाठी काही अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य सरकारने कोरोनापूर्वी नगररचनाकार विभागात केली. मात्र, त्यापैकी बहुतांश अधिकाऱ्यांनी महापालिकेत येणे पसंत केले नाही. बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेसाठी तंत्र समितीसह कंत्राटी पद्धतीने एका संरचनात्मक अभियंता यांची नियुक्ती केली होती. मात्र, शहरातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून धोकादायक इमारतींचे आॅडिट झाले नसल्याचे उघड झाले आहे. शहरातील धोकादायक इमारतींचे आॅडिट करण्यासाठी संरचनात्मक अभियंता यांची आवश्यकता आहे. तसेच महापालिका नगररचना विभागाने बहुतांश शहरातील संरचनात्मक अभियंता यांच्या परवान्याचे नूतनीकरण वर्षानुवर्षे केले नसल्याने बांधकाम परवानगी, बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया व धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट रखडले आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी व नवनियुक्त नगररचनाकार अरुण गुडगुडे यांच्या निर्णयाकडे शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे.अभियंत्याच्या परवान्याचे नूतनीकरण करामहापालिका नगररचनाकार विभागाला गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी नगररचनाकार न मिळाल्याने विभागाचे काम ठप्प झाले होते. अरुण गुडगुडे यांच्या रूपाने नगररचनाकार मिळाल्याने, एका संरचनात्मक अभियंत्याची नियुक्ती करून शहरातील संरचनात्मक अभियंत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केल्यास शहर विकासाला चालना मिळेल, अशी माहिती प्रसिद्ध वास्तुविशारद अतुल कुलकर्णी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे