शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

दांडीबहाद्दर नगरसेवकांचे प्रश्न घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:15 IST

ठाणे : सर्वसाधारण सभेत लेखी प्रश्न देऊन प्रश्नोत्तराच्या तासांत अनुपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचे यापुढे प्रश्न पुन्हा न घेण्याचा निर्णय ...

ठाणे : सर्वसाधारण सभेत लेखी प्रश्न देऊन प्रश्नोत्तराच्या तासांत अनुपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचे यापुढे प्रश्न पुन्हा न घेण्याचा निर्णय महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जाहीर केला आहे. नगरसेवक प्रश्न विचारतात. मात्र, त्यांची उत्तरे घेण्यासाठी हजरच राहत नसल्याने लोकप्रतिनिधींबाबत संशयाचे वातावरण निर्माण केले जात असून, त्यामुळे अशा दांडीबहाद्दरांचे प्रश्न पुन्हा घेऊ नयेत, असे आदेश त्यांनी सर्वसाधारण सभेत दिले.

सर्वसाधारण सभेचा सुरुवातीचा एक तास हा लोकप्रतिनिधींनी लेखी स्वरूपात दिलेल्या प्रश्नांची अधिकाऱ्यांकडून उत्तरे मिळावीत यासाठी राखीव ठेवला जातो. यामध्ये अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती समाधानकारक नसल्यास यावर नगरसेवकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळते. मात्र, गेल्या काही महासभांत लोकप्रतिनिधी प्रश्न विचारतात; परंतु त्यांची उत्तरे घेण्यासाठी सभागृहात उपस्थितच राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाल्याने अखेर महापौरांनी जे नगरसेवक प्रश्न विचारून सभागृहात उपस्थित राहणार नाहीत, त्यांचे प्रश्न यापुढे न घेण्याचे जाहीर करून टाकले.

तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी बहुतांश महापालिका अधिकारी हजर नसायचे. त्यावेळी तत्कालीन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक केले होते. मात्र, आता प्रश्न विचारून काही लोकप्रतिनिधीच हजर राहत नसल्याने म्हस्के यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.