शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

निलगाईंकडून भेंडी, कारली, हरभरा, काकडीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहापूर, मुरबाड या परिसरातील भेंडी, कारली, मूग, हरभरा, काकडी यासारख्या नगदी पिकांचे निलगाईंच्या चार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शहापूर, मुरबाड या परिसरातील भेंडी, कारली, मूग, हरभरा, काकडी यासारख्या नगदी पिकांचे निलगाईंच्या चार ते पाच कळपांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेकडो एकरांवरील पिकांचे आतापर्यंत नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या भागातील भेंड्यांना जागतिक बाजारपेठेत स्थान आहे. या परिसरात समूह शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी यंदाही भेंडी, कारल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यासाठी काही कंपन्यांकडून त्यांनी कर्ज घेऊन बियाणे उपलब्ध केले आहे. शहापूर, मुरबाडच्या वेशीवरील किन्हवली परिसरातील जंगलात निलगाईंचे वास्तव्य आहे. तानसा, शेजारील रायगडमधील कर्नाळा अभयारण्यातून या निलगाई थेट शहापूर, मुरबाड तालुक्यातील शेतांमध्ये घुसून रब्बी पिके फस्त करीत आहेत. अगोदरच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना, निलगाईंकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे.

किन्हवलीच्या कानवा नदी काठावरील या शेतीवर ताव मारणाऱ्या निलगाईंनी भेंडी, कारली, मूग, हरभरा, काकडी, दुधी भोपळा तसेच पालेभाज्या फस्त केल्या आहेत. या परिसरात तब्बल चार ते पाच कळप मोकाट फिरत आहेत. एका कळपात किमान २५ ते ५० निलगाईंचा समावेश असल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले. फोफोडी, खरोड, कानवा, आपटे, मळेगाव, बेडीसगाव या गावांच्या हद्दीतील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वनविभागाने या गाईंना पकडून तानसा अभयारण्य किंवा अन्य जंगलात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

............

आमच्या शेतातील २०० आंब्यांच्या झाडांसह सोनचाफ्याची ५०० झाडे निलगाईंनी फस्त केली. वन विभागाने आम्हाला नुकसानभरपाई दिली पाहिजे. आम्ही पशूपक्षी, वन्यजीवप्रेमी आहोत. निलगाईंना मारहाण करणे आम्हाला शक्य नाही. त्यामुळे वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावून या निलगाईंना पकडण्याची गरज आहे.

- गजानन विशे, बेडीसगाव, किन्हवली, शहापूर

.............

वाचली