शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ठाणे जिल्ह्यातील ५६६ घरांसह २३८ हेक्टरवरील आंबा-काजू, भाजीपाल्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तौक्ते चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला. जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी रात्रभर झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तौक्ते चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला. जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी रात्रभर झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे तिघांच्या मृत्यूसह आठजण गंभीर जखमी झाले आहेत. एवढेच नव्हे तर ५६६ घरांचे कमीअधिक नुकसान झाले. २३८ हेक्टरवरील आंबा, काजू, भात आणि भाजीपाल्याचे नुकसान होऊन गेल्या ४८ तासांत तब्बल १६४ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे.

चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पावसासह वादळी वारा ताशी ९० ते १०० किमी वेगाने वाहत होता. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या २४ तासांत सरासरी ५३ मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सात शाळांचे काहीअंशी नुकसान होऊन सात घरांचे पूर्णपणे नुकसान झाले. ५५९ घरांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान होऊन त्यावरील पत्रे उडाले, काही घरांच्या भिंती पडल्या, तर काहींना तडे गेले आहेत. घरांच्या या नुकसानीचा फटका तब्बल एक हजार ३०० रहिवाशांना बसला आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी २२ विजेचे खांब पडले आहेत. यापैकी शहापूरला १५ व कल्याणला सात खांब पडले. याशिवाय ९४३ झाडे ठिकठिकाणी उन्मळून पडले आहेत. यामध्ये अंबरनाथला सर्वाधिक २९३ झाडांचा समावेश आहे. ठाण्यातील २७९ झाडं, मीरा भाईंदरमधील १२७, उल्हासनगरमधील १२२, कल्याणमधील ७६, भिवंडीतील २८ आणि शहापूरच्या १२ झाडांना चक्रीवादळाने उपटून काढले. या व्यतिरिक्त हजारो झाडांच्या फांद्या तुटल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यादरम्यान तिघांच्या मृत्यूसह आठजण गंभीर जखमी झाले. यापैकी सहाजण ठाणे शहरातील असून, भिवंडी आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

--------