शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील ५६६ घरांसह २३८ हेक्टरवरील आंबा-काजू, भाजीपाल्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तौक्ते चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला. जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी रात्रभर झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : तौक्ते चक्रीवादळाचा फटका ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला. जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सोमवारी रात्रभर झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे तिघांच्या मृत्यूसह आठजण गंभीर जखमी झाले आहेत. एवढेच नव्हे तर ५६६ घरांचे कमीअधिक नुकसान झाले. २३८ हेक्टरवरील आंबा, काजू, भात आणि भाजीपाल्याचे नुकसान होऊन गेल्या ४८ तासांत तब्बल १६४ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे.

चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पावसासह वादळी वारा ताशी ९० ते १०० किमी वेगाने वाहत होता. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या २४ तासांत सरासरी ५३ मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सात शाळांचे काहीअंशी नुकसान होऊन सात घरांचे पूर्णपणे नुकसान झाले. ५५९ घरांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान होऊन त्यावरील पत्रे उडाले, काही घरांच्या भिंती पडल्या, तर काहींना तडे गेले आहेत. घरांच्या या नुकसानीचा फटका तब्बल एक हजार ३०० रहिवाशांना बसला आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी २२ विजेचे खांब पडले आहेत. यापैकी शहापूरला १५ व कल्याणला सात खांब पडले. याशिवाय ९४३ झाडे ठिकठिकाणी उन्मळून पडले आहेत. यामध्ये अंबरनाथला सर्वाधिक २९३ झाडांचा समावेश आहे. ठाण्यातील २७९ झाडं, मीरा भाईंदरमधील १२७, उल्हासनगरमधील १२२, कल्याणमधील ७६, भिवंडीतील २८ आणि शहापूरच्या १२ झाडांना चक्रीवादळाने उपटून काढले. या व्यतिरिक्त हजारो झाडांच्या फांद्या तुटल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यादरम्यान तिघांच्या मृत्यूसह आठजण गंभीर जखमी झाले. यापैकी सहाजण ठाणे शहरातील असून, भिवंडी आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

--------