शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

पावसामुळे जिल्ह्यातील ६४० हेक्टर भातपीक-फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. यात आतापर्यंत सहा जणांपेक्षा अधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. यात आतापर्यंत सहा जणांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, जिल्ह्यातील ६३९.६० हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये भातपिकांसह फळबागा आणि शेतजमीन वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हाभरात साडेपाच हजार रहिवाशांना शाळा, समाजमंदिर, सभागृह आदी ठिकाणच्या सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा अजून झालेला नाही. नदी, नाल्यांना आलेला पूर आणि त्यात खाडीला आलेल्या भरतीमुळे नदीच्या पुराचे पाणी खाडीत न गेल्यामुळे ते आहे त्या ठिकाणी साचले. त्यामुळे निवासी भागात पाणी शिरल्यामुळे ते दुकाने, घरांमध्ये घुसले. त्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांना काही काळ घराच्या छतावर, पत्र्यांवर राहावे लागले.

या दरम्यान जिल्ह्यात तैनात केलेल्या एनडीआरएफच्या जवानांसह टीडीआरएफच्या जवानांनी या निवासी भागातील आपत्तीग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. मात्र, जिल्ह्यातील ६४० हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाल्यामुळे शेतक-यांना त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यात भातलागवडीची कामे सुरू आहेत. त्यासाठी वाढवलेली भातरोपेही वाहून गेली. भुसभुशीत शेतजमीनही वाहत्या पाण्यात वाहून गेली आहे. तर, काही ठिकाणच्या फळबागांमधील आंबा, फणस, काजू, सीताफळे आदींची फळझाडे उन्मळून पडली, तर काही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.

------