शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पावसामुळे जिल्ह्यातील ६४० हेक्टर भातपीक-फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. यात आतापर्यंत सहा जणांपेक्षा अधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. यात आतापर्यंत सहा जणांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, जिल्ह्यातील ६३९.६० हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये भातपिकांसह फळबागा आणि शेतजमीन वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हाभरात साडेपाच हजार रहिवाशांना शाळा, समाजमंदिर, सभागृह आदी ठिकाणच्या सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा अजून झालेला नाही. नदी, नाल्यांना आलेला पूर आणि त्यात खाडीला आलेल्या भरतीमुळे नदीच्या पुराचे पाणी खाडीत न गेल्यामुळे ते आहे त्या ठिकाणी साचले. त्यामुळे निवासी भागात पाणी शिरल्यामुळे ते दुकाने, घरांमध्ये घुसले. त्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांना काही काळ घराच्या छतावर, पत्र्यांवर राहावे लागले.

या दरम्यान जिल्ह्यात तैनात केलेल्या एनडीआरएफच्या जवानांसह टीडीआरएफच्या जवानांनी या निवासी भागातील आपत्तीग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. मात्र, जिल्ह्यातील ६४० हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाल्यामुळे शेतक-यांना त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यात भातलागवडीची कामे सुरू आहेत. त्यासाठी वाढवलेली भातरोपेही वाहून गेली. भुसभुशीत शेतजमीनही वाहत्या पाण्यात वाहून गेली आहे. तर, काही ठिकाणच्या फळबागांमधील आंबा, फणस, काजू, सीताफळे आदींची फळझाडे उन्मळून पडली, तर काही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.

------