शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पावसामुळे जिल्ह्यातील ६४० हेक्टर भातपीक-फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. यात आतापर्यंत सहा जणांपेक्षा अधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. यात आतापर्यंत सहा जणांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, जिल्ह्यातील ६३९.६० हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये भातपिकांसह फळबागा आणि शेतजमीन वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हाभरात साडेपाच हजार रहिवाशांना शाळा, समाजमंदिर, सभागृह आदी ठिकाणच्या सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा अजून झालेला नाही. नदी, नाल्यांना आलेला पूर आणि त्यात खाडीला आलेल्या भरतीमुळे नदीच्या पुराचे पाणी खाडीत न गेल्यामुळे ते आहे त्या ठिकाणी साचले. त्यामुळे निवासी भागात पाणी शिरल्यामुळे ते दुकाने, घरांमध्ये घुसले. त्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांना काही काळ घराच्या छतावर, पत्र्यांवर राहावे लागले.

या दरम्यान जिल्ह्यात तैनात केलेल्या एनडीआरएफच्या जवानांसह टीडीआरएफच्या जवानांनी या निवासी भागातील आपत्तीग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. मात्र, जिल्ह्यातील ६४० हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाल्यामुळे शेतक-यांना त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यात भातलागवडीची कामे सुरू आहेत. त्यासाठी वाढवलेली भातरोपेही वाहून गेली. भुसभुशीत शेतजमीनही वाहत्या पाण्यात वाहून गेली आहे. तर, काही ठिकाणच्या फळबागांमधील आंबा, फणस, काजू, सीताफळे आदींची फळझाडे उन्मळून पडली, तर काही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.

------