शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

आरटीईच्या विद्यार्थ्यांची दैना; पालकांची पोलीस ठाण्यात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:37 IST

शुल्क मागितल्याने संताप

कल्याण : शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २५ टक्के प्रवेश आरक्षित आहेत. या आरक्षणांतर्गत विविध शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खाजगी शाळा पैशांची मागणी करत असून, सोयी-सुविधाही नाकारत आहेत. याविरोधात संतप्त पालकांनी मंगळवारी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी केडीएमसीचे शिक्षणाधिकारी जे. जे. तडवी यांच्याशी संपर्क साधून तोडगा न काढल्यास प्रशासनासह शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली. त्यानंतर पालकांनी मुख्यालयातील शिक्षण मंडळ कार्यालयात जाऊ न तडवी यांची भेट घेतली. याबाबत दोन दिवसांत शाळांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.शिक्षण आरोग्य अधिकार मंचाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन धुळे यांनी शिक्षण हक्क कायद्यासाठी लढा सुरू केला आहे. यासाठी त्यांनी महापालिकेविरोधात मोर्चाही काढला होता. पालकांनी तक्रारी केल्यानंतर पालकांसह धुळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पालक रुपाली बोरड, संगीता गुप्ता, दीपाली साळवी, जयश्री पगारे, जया धात्रक, सुजाता ढवळे, निवेदिता पवार, सुजाता चव्हाण आणि आयेशा शेख यांच्यासह ५० पालक उपस्थित होते.शिक्षणहक्क कायद्याला शाळा जुमानत नाहीत. या कायद्यानुसार विद्यार्थ्यांची सरकारकडून फी मिळणार आहे; मात्र शाळा विद्यार्थ्यांकडे त्याची मागणी करत आहेत. ही फसवणूक असून केडीएमसीचा शिक्षण विभाग आणि शाळांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आरटीईचे अनुदान शासनाकडून नियमीत स्वरूपात मिळत नसल्याने शैक्षणिक सोयी सुविधा देता येत नसल्याचे स्पष्टीकरण शाळांनी दिले आहे.केडीएमसीच्या हद्दीत आरटीई प्रवेशांसाठी दोन हजार ६३५ आॅनलाइन अर्ज आले होते. ८१ शाळांमध्ये पहिलीच्या वर्गासाठी एक हजार ४९६ आणि नर्सरीसाठी एकच शाळा असून त्यात १३ प्रवेशक्षमता आहे. पहिल्या फेरीत ७२३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी ४९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर अपेक्षित शाळेत प्रवेश न मिळाल्याने निवड होऊनही २२६ प्रवेश घेतला नाही. दुसरी फेरी सुरू असून दोन दिवसांत किती प्रवेश होतात, याचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी तडवी यांनी यासंदर्भात दिली.मुलाला चड्डी-बनियानवर पाठवले शाळेतकल्याण पूर्वेतील रिक्षाचालक मनोज वाघमारे यांचा मुलगा मयूर याने ‘आरटीई’अंतर्गत आनंद ग्लोबल स्कूलमध्ये प्रवेश मिळाला आहे. शाळेने त्याला गणवेश नाकारल्याने वाघमारे यांच्या पत्नी भाग्यश्री यांनी मयूरला चड्डी-बनियानवर शाळेत पाठवून निषेध केला आहे. यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाकडे संपर्क साधला असता प्रभारी मुख्याध्यापक सुनील मोगरे म्हणाले की, मयूरचे पालक आले होते; मात्र त्यांचा शाळेच्या संचालकांशी संपर्क झाला नाही. नियमाप्रमाणे त्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेश दिला जाणार आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा