शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

निर्बंधांमुळे घटणार गोविंदा पथकांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:26 IST

दहीहंडी उत्सवातील आयोजकांवर आलेल्या निर्बंधामुळे उत्सव साजरा करणाºया आयोजकांची संख्या यंदा आणखी कमी होण्याची भीती सध्या गोविंदा पथकांना भेडसावते आहे

ठाणे : दहीहंडी उत्सवातील आयोजकांवर आलेल्या निर्बंधामुळे उत्सव साजरा करणाºया आयोजकांची संख्या यंदा आणखी कमी होण्याची भीती सध्या गोविंदा पथकांना भेडसावते आहे. भविष्यात ही संख्या कमी कमी होत गेल्यास दहीकाला उत्सव साजरा करण्याची परंपरा लयास जाईल, अशी चिंता गोविंदा पथकांना सतावत असल्याचे ठाण्यातील दहीहंडी समन्वय समितीच्या सदस्यांनी सांगितले.दहीहंडी उत्सवात न्यायालयाने आणलेल्या १८ वर्षांच्या मर्यादेची बंदी आणि २० फुटापर्यंतच्या उंचीच्या निर्बंधाबाबत १ आॅगस्टला निर्णय होणार आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाने गोविंदा पथकांविरोधात निर्णय दिल्यास सरकार अध्यादेश काढून गोविंदा पथकांच्या बाजूने निर्णय देईल, असा विश्वास गोविंदा पथकांना वाटतो. परंतु गोविंदा पथकांवरील अटी-निर्बंध शिथील झाले आणि आयोजकांवरील अटी कायम राहिल्यास छोट्या प्रमाणात उत्सव आयोजन करणाºयांची संख्या नगण्य होईल. याचा अर्थातच परिणाम पथकांच्या सहभागावरही होण्याची शक्यता आहे. गोविंदा पथकांवर २०१४ साली आलेल्या निर्बंधांपासून पथकांची संख्या कमी होत चालली आहे. आता ठाण्यात २०० गोविंदा पथक सहभागी होतात. तसेच, छोट्या प्रमाणात उत्सव साजरा करणारे आयोजक १०० ते १५० च्या आसपास आहेत.सुरक्षा, आवाजाची मर्यादा यांसारख्या विविध अटींमुळे आयोजकांवर आलेल्या बंधनांमुळे हंडीच्या आयोजनाचे प्रमाण कमी होईल, असे समन्वय समितीचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने जवळपास ४० टक्के आयोजक बॅकफूटवर गेले होते. यंदाही त्यांच्यावरील अटी कायम राहिल्या, तर अनेक छोटे आयोजक उत्सवाचे आयोजन करणार नाहीत, असे महाराष्ट्र गोविंदा पथक समन्वय समितीचे सचिव समीर पेंढारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पारंपरिक उत्सव साजरा करा!जशी गोविंदा पथकांवर आलेल्या अटींमुळे पथकांची संख्या कमी होत आहे तशीच आयोजकांवर आलेल्या निर्बंधामुळे छोट्या प्रमाणात आयोजन करणाºयांची संख्याही कमी होत असल्याची नाराजी गोविंदा पथकांनी व्यक्त केली. बक्षिसाच्या रकमेसाठी गोविंदा पथके उत्सवात सहभागी होत असतात, असे सामान्यांना वाटत असते. पण याच रकमेतून आम्ही वर्षभर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित असतो, याकडे पेंढारे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे छोट्या आयोजकांनी मागे न हटता किमान पारंपरिक पद्धतीने उत्सवाचे आयोजन तरी करावे, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.