शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

औद्योगिक कॉरिडॉरसाठी कट

By admin | Updated: July 25, 2016 02:53 IST

केंद्र सरकार बड्या उद्योगांच्या भल्यासाठी पाच औद्योगिक कॉरिडोर सुरू करणार आहे. त्यासाठी देशातील ४३ टक्के जमीन संपादित होणार आहे.

भार्इंदर : केंद्र सरकार बड्या उद्योगांच्या भल्यासाठी पाच औद्योगिक कॉरिडोर सुरू करणार आहे. त्यासाठी देशातील ४३ टक्के जमीन संपादित होणार आहे. त्यात सिंचनाखाली असलेल्या सुपीक जमिनी उद्योजकांच्या घशात घालायचे कटकारस्थान दिल्लीत शिजत असल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ समाजसेविका उल्का महाजन यांनी उत्तन-गोराई येथील नियोजित पर्यटन व मनोरंजन क्षेत्राच्या निषेधार्थ बाप्टिष्टा चौकात झालेल्या आंदोलनावेळी केला.दिल्ली-मुंबई, अमृतसर-कोलकाता, चेन्नई-बंगळुरू, मुंबई-बंगळुरू व विशाखापट्टणम-चेन्नई या औद्योगिक कॉरिडोरचा समावेश आहे. केंद्र व राज्य सरकारने विविध योजना व प्रकल्पांसाठी आतापर्यंत संपादित केलेल्या जमिनी बाधितांपैकी केवळ सात टक्केच नागरिकांना रोजगार मिळाल्याचे ‘कॅग’च्या अहवालात स्पष्ट केले आहे. येथील पर्यटन विकास आराखड्यातही स्थानिकांच्या रोजगारावर गंडांतर आणले आहे. कॉरिडोरचा स्मार्ट सिटीत समावेश होणार असल्याने ही क्षेत्रे प्रभावित होणार आहेत. यातून शेतकरी, कष्टकरी व आदिवासींचा विकास मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्षित केला असून केवळ श्रीमंतांचाच विचार करण्यात आला आहे. मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवत महाजन यांनी देशात महागाई पेटली असल्याचे सांगितले. अशातच शेतीप्रधान देशातील शेती औद्योगिक क्षेत्राखाली आणून परदेशांतून धान्य मागवले जाणार आहे. परदेशी धान्याऐवजी देशी धान्यच नागरिकांना द्या. वर्षानुवर्षे समुद्रकिनाऱ्यांची देखभाल करणाऱ्या मच्छीमारांना मात्र खाजगी मालकांकडून उद्ध्वस्त केले जाणार आहे. या खाजगी मालकांचे दलाल असलेल्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांसोबत यावे, अन्यथा त्यांनाही त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला. सरकारने पाणी आणि जमिनीचा व्यवसाय सुरू केला असून त्याचा लाभ सामान्यांऐवजी धनदांडग्यांना दिला जात आहे. एमएमआरडीएने तयार केलेला विकास आराखडा त्यावर स्थानिकांनी घेतलेल्या हरकतींचा विचार न करताच मंजूर करण्यात आला आहे. हा आराखडा स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर नागरिकांच्या मान्यतेसाठी जोपर्यंत ठेवला जाणार नाही, तोपर्यंत जनशक्तीच्या जोरावर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सेझ जसा परतवून लावला, तसाच हा आराखडा परतवून लावू. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महाजन यांनी शेवटी सांगितले. यावेळी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी होमाबाई, जोसेफ घोन्सालवीस, नेव्हील डिसोझा, शिरीष मेंढी, मुक्त श्रीवास्तव, निकलस अल्मेडा, फादर जो बोर्जिस, फादर बोनावेन्चर नूनीस यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.