शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

८० टक्के कलमांना पालवी

By admin | Updated: November 19, 2015 00:44 IST

बागायतदार चिंतेत : आंबा हंगाम लांबण्याची भीती

रत्नागिरी : आंबा पीक हे जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारे असून, यावर्षी पाऊस कमी झाला आहे. असे असतानाही ८० टक्के आंबा कलमांना पालवी आली आहे. त्यामुळे यावर्षी आंब्याचा हंगाम लांबण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. एक लाख १७ हजार १९६ मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन सरासरी उपलब्ध होते. परंतु, फयान वादळानंतर आंबा उत्पादनावर परिणाम होत आहे. सन २०१२मध्ये थ्रीप्समुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. सन २०१४मध्ये अवेळीच्या पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा अधिक आंबा पिकाचे नुकसान झाले. मात्र, यावर्षी पावसाळा सरासरीपेक्षा निम्मा झाला आहे. तरीदेखील मोठ्या प्रमाणावर कलमांना पालवी फुटली आहे. पालवी जून होईपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे किरकोळ २० टक्के झाडांनाच मोहोर आला आहे. पहाटे २४ अंश सेल्सियस, तर दिवसा ३४ अंश सेल्सियस इतके तापमान आहे. शिवाय मतलई वारे वाहू लागले आहेत. परंतु, असे हवामान आॅक्टोबरमध्ये असणे आवश्यक होते. थंडी ऊशीरा सुरू झाल्याने मोहोर प्रक्रिया हंगाम लांबणार हे निश्चित आहे. मध्येच ढगाळ वातावरण असल्यामुळे संबंधित हवामान हे तुडतुडावाढीस पोषक आहे. त्यामुळे किरकोळ मोहोराबरोबरच पालवीवर तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोहोराचे प्रमाण चांगले आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात कल्टार वापरलेल्या व न वापरलेल्या दोन्ही झाडांना पालवी आली आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून एकूण ४० हजार लीटर कल्टारचा वापर करण्यात आला. लवकर उत्पादन मिळावे, यासाठी कल्टारचा वापर करण्यात येतो. ६००० रुपये लीटरप्रमाणे शेतकऱ्यांनी कल्टारला पैसे मोजूनसुध्दा कलमांना आलेल्या पालवीमुळे शेतकरीवर्ग आर्थिक विवंचनेत सापडला आहे. लवकर उत्पादन मिळावे, यासाठी दरवर्षी शेतकरी हजारो रूपयांचे कल्टार वापरतात. परंतु, त्या तुलनेत शेतकऱ्यांना रिझल्ट मिळत नसल्यामुळे हा खर्च वाया जाईल, अशी भीती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी तर पालवी जून होण्यासाठी काही प्रतिबंधात्मक औषधांचा वापर सुरू केला आहे. मोहोर आल्यापासून फळे काढेपर्यंत टप्प्याटप्प्याने विविध कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे हंगामाच्या अखेरीस कीटकनाशक औषधांचे लाखो रुपयांचे बिल भरावे लागते. त्या तुलनेत उत्पादन न मिळाल्यास शेतकऱ्यांचा खर्च वाया जातो. गतवर्षी अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याची शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अद्याप ती न मिळाल्यामुळे शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंबा पिकावर परिणाम होत आहे. त्यामुळे यावर्षी मार्च महिन्यात आंब्याचे उत्पादन मिळण्याऐवजी त्यासाठी आता आंबा उत्पादन घेण्यासाठी तब्बल एप्रिल महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. (प्रतिनिधी) चिंता संपेना : वातावरणाची साथ मिळेना... रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंब्याला निसर्गाची आणि वातावरणाची साथच मिळेनासी झाली आहे. पोषक वातावरण नसल्याने हापूसचा दर्जा आणि हंगामही विस्कळीत झाला आहे. कलमांना मोहोर येण्याच्या काळातच पाऊस सुरु होतो आणि त्यानंतर हा पाऊस अधूनमधून पडतच राहतो. अशा विचित्र वातावरणामुळे गेली चार ते पाच वर्षे हापूस आंब्याचे हातातोंडाशी आलेले उत्पादनही तोट्यात जात आहे.