शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

सुमधुर हापूसकडे ग्राहकांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 02:48 IST

गतवर्षीच्या तुलनेत दर कमी; महागाईमुळे आंबा झाला चैनीची वस्तू, आवकही झाली कमी

ठाणे : उन्हाळा सुरू होताच फळांचा राजा बाजारात दाखल झाला खरा, पण आंब्याचे मार्केट घसरल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. आंब्याची आवक कमी, दरही गतवर्षीच्या तुलनेत घसरलेले आणि ग्राहकांचा प्रतिसादही कमी अशी यंदाची परिस्थिती असल्याची खंत आंबाविक्रेत्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.उन्हाळी सुटी सुरू झाली की, आंब्याच्या खरेदीची लगबग सुरू होते. आंबे फस्त करण्यास लहानगे आणि तरुणांमध्ये स्पर्धाच सुरू होते. कोकणचा राजा म्हणून ओळख असलेल्या हापूस आंब्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहतात. मधुर रसाळ आंबा आबालवृद्धांपासून सर्वांनाचा हवाहवासा वाटतो. वाशीच्या घाऊक बाजारात आंब्याची पहिली पेटी आली की, त्याच्या महागड्या दराची ‘बातमी’ होते. गेल्या काही वर्षांपासून आंब्याचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. गेल्यावर्षी ओखी वादळ, अवकाळी पाऊस, मध्येच प्रचंड ऊन तर कधी थंड हवामान या वातावरणातील बिघाडीचा फटका आंब्याला बसला होता. परिणामी, आंब्याचे दर दुपटीपेक्षा अधिक होते. ७०० ते १५०० रुपये प्रतिडझन या दरांनी गतवर्षी आंब्यांची विक्री झाली होती. मे महिन्यात आंब्याची चांगलीच विक्री झाली होती. दिवसाला ५० ते ६० हजार रुपये कमावले होते. यंदा मात्र परिस्थिती उलट आहे. दिवसाला २० हजार रुपये मिळणे कठीण झाले असल्याचे आंब्याचे विक्रेते कुशल सुळे यांनी सांगितले. यंदा आंब्याचे दर घसरले आहेत. ३०० ते १२०० रुपयांपर्यंत आंब्याचे दर असले, तरी ग्राहक आंब्याची खरेदी करण्याकरिता खिशात हात घालत नाही, असे आंब्याचे विक्रेते सचिन मोरे यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आंबेविक्रीसाठी बाजारपेठेत आले असले, तरी खरेदीला मात्र एप्रिल महिन्यापासून सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात अगदी तुरळक खरेदी झाली. मे महिन्यात चांगली खरेदी होईल, अशी आशा उत्तरा मोरे यांनी व्यक्त केली. आंबा सुरुवातीला आला की, दोन महिने तरी खरेदी फारशी होत नसते.दैनंदिन जेवणातील भाज्या ३० ते ३५ रुपये पाव किलो इतक्या महागल्या आहेत. याखेरीज, अन्य जिन्नस चढ्या दराने विकले जात आहेत. शाळा, कॉलेज, क्लासच्या फी वाढीची टांगती तलवार जूनमध्ये आहेच. सुटीत फिरायला जायचे तर रेल्वे, विमानाची तिकिटे कडाडली आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय हापूस आंब्यांची खरेदी करताना चारवेळा विचार करत असल्याचे विक्रेत्यांनी मान्य केले. रत्नागिरी हापूस ३०० ते ९०० रुपये प्रतिडझन, देवगड हापूस ४०० ते १००० रुपये प्रतिडझन, पायरी ५०० ते ८०० रुपये प्रतिडझन, वनराज आंबा १२०० रुपये प्रतिडझन, केसर आंबा ४०० ते ६०० रुपये प्रतिडझन या दराने आंब्यांची विक्री सुरू आहे.मे महिन्यात वाढेल विक्रीउन्हाच्या तडाख्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आंब्याची खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर आहे. एप्रिल महिन्यात आंब्याकडे ग्राहक फारसे फिरले नाही. त्यामुळे अद्याप समाधानकारक खरेदी झाली नसल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले;मात्र मे महिन्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात आंब्याची खरेदी पुरेशी होईल, अशी आशा विक्रेत्यांना आहे.

टॅग्स :Mangoआंबा