शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

महावितरणच्या उद्दीष्टपूर्तीचा ग्राहकांना ‘करंट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:25 IST

वीजेचे चालू बिल न भरल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.

कल्याण : वीजेचे चालू बिल न भरल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी यांनी मुख्य अभियंता रामराव मुंडे यांना निवेदन देऊन ग्राहकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधले आहे. थकबाकी असल्यास वीज पुरवठा खंडीत केला जातो हे मान्य आहे. परंतु, चालू बिलाची अंतिम तारीख उलटताच वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याची कारवाई चुकीची असल्याचे दळवी यांचे म्हणणे आहे. मार्च अखेरीच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी हा प्रताप सुरू आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.महावितरणच्या एजन्सीमार्फत वाटप केली जाणारी वीज बिले वेळेवर मिळत नसल्याची तक्रारही ग्राहक करतात. बिल अंतिम तारखेला अथवा दोन-तीन दिवस आधी मिळते. एखादे बील वेळेत नाही भरले तर वीज कर्मचारी वीज खंडीत करण्याची यादी घेऊन दारात येतात आणि कधी कधी ग्राहक घरी नसताना देखील त्यांचा वीज पुरवठा खंडीत करून जातात. याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे थकीत बिलावर वीज पुरवठा खंडीत करण्याच्या कारवाईच्या आधी १५ दिवसांची नोटीस ग्राहकांना देणे बंधनकारक आहे पण तसे होताना दिसत नाही. महावितरणकडून काहीवेळा चुकीच्या रिडींगची भरमसाठी बिले ग्राहकांना पाठविली जातात. त्यात दुरूस्ती करावी, यासाठी ग्राहकांकडून अर्ज केले जातात. परंतु, दुरूस्ती वेळेत होत नसल्याने ग्राहकाचे नाव वीज थकबाकी यादीत येते. त्याचा नाहक त्रास ग्राहकाला सोसावा लागत असल्याचे दळवी यांचे म्हणणे आहे.बिल दुरूस्ती होईपर्यंत संबंधित बिलावर ‘नो डिस्कनेक्ट’ असा शिक्का मारून देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. वीज बिलावर मराठीमधील नाव आणि पत्ता चुकीचा लिहिला जातो, याबाबत विचारणा केली असता मराठी शब्द दुरूस्ती सॉफ्टवेअर आमच्याकडे नाही असे उत्तर मिळत असल्याकडेही दळवी यांनी लक्ष वेधले आहे.