शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

महावितरणच्या उद्दीष्टपूर्तीचा ग्राहकांना ‘करंट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:25 IST

वीजेचे चालू बिल न भरल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.

कल्याण : वीजेचे चालू बिल न भरल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी यांनी मुख्य अभियंता रामराव मुंडे यांना निवेदन देऊन ग्राहकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधले आहे. थकबाकी असल्यास वीज पुरवठा खंडीत केला जातो हे मान्य आहे. परंतु, चालू बिलाची अंतिम तारीख उलटताच वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याची कारवाई चुकीची असल्याचे दळवी यांचे म्हणणे आहे. मार्च अखेरीच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी हा प्रताप सुरू आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.महावितरणच्या एजन्सीमार्फत वाटप केली जाणारी वीज बिले वेळेवर मिळत नसल्याची तक्रारही ग्राहक करतात. बिल अंतिम तारखेला अथवा दोन-तीन दिवस आधी मिळते. एखादे बील वेळेत नाही भरले तर वीज कर्मचारी वीज खंडीत करण्याची यादी घेऊन दारात येतात आणि कधी कधी ग्राहक घरी नसताना देखील त्यांचा वीज पुरवठा खंडीत करून जातात. याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे थकीत बिलावर वीज पुरवठा खंडीत करण्याच्या कारवाईच्या आधी १५ दिवसांची नोटीस ग्राहकांना देणे बंधनकारक आहे पण तसे होताना दिसत नाही. महावितरणकडून काहीवेळा चुकीच्या रिडींगची भरमसाठी बिले ग्राहकांना पाठविली जातात. त्यात दुरूस्ती करावी, यासाठी ग्राहकांकडून अर्ज केले जातात. परंतु, दुरूस्ती वेळेत होत नसल्याने ग्राहकाचे नाव वीज थकबाकी यादीत येते. त्याचा नाहक त्रास ग्राहकाला सोसावा लागत असल्याचे दळवी यांचे म्हणणे आहे.बिल दुरूस्ती होईपर्यंत संबंधित बिलावर ‘नो डिस्कनेक्ट’ असा शिक्का मारून देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. वीज बिलावर मराठीमधील नाव आणि पत्ता चुकीचा लिहिला जातो, याबाबत विचारणा केली असता मराठी शब्द दुरूस्ती सॉफ्टवेअर आमच्याकडे नाही असे उत्तर मिळत असल्याकडेही दळवी यांनी लक्ष वेधले आहे.