शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महावितरणच्या उद्दीष्टपूर्तीचा ग्राहकांना ‘करंट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:25 IST

वीजेचे चालू बिल न भरल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.

कल्याण : वीजेचे चालू बिल न भरल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी यांनी मुख्य अभियंता रामराव मुंडे यांना निवेदन देऊन ग्राहकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधले आहे. थकबाकी असल्यास वीज पुरवठा खंडीत केला जातो हे मान्य आहे. परंतु, चालू बिलाची अंतिम तारीख उलटताच वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याची कारवाई चुकीची असल्याचे दळवी यांचे म्हणणे आहे. मार्च अखेरीच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी हा प्रताप सुरू आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.महावितरणच्या एजन्सीमार्फत वाटप केली जाणारी वीज बिले वेळेवर मिळत नसल्याची तक्रारही ग्राहक करतात. बिल अंतिम तारखेला अथवा दोन-तीन दिवस आधी मिळते. एखादे बील वेळेत नाही भरले तर वीज कर्मचारी वीज खंडीत करण्याची यादी घेऊन दारात येतात आणि कधी कधी ग्राहक घरी नसताना देखील त्यांचा वीज पुरवठा खंडीत करून जातात. याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे थकीत बिलावर वीज पुरवठा खंडीत करण्याच्या कारवाईच्या आधी १५ दिवसांची नोटीस ग्राहकांना देणे बंधनकारक आहे पण तसे होताना दिसत नाही. महावितरणकडून काहीवेळा चुकीच्या रिडींगची भरमसाठी बिले ग्राहकांना पाठविली जातात. त्यात दुरूस्ती करावी, यासाठी ग्राहकांकडून अर्ज केले जातात. परंतु, दुरूस्ती वेळेत होत नसल्याने ग्राहकाचे नाव वीज थकबाकी यादीत येते. त्याचा नाहक त्रास ग्राहकाला सोसावा लागत असल्याचे दळवी यांचे म्हणणे आहे.बिल दुरूस्ती होईपर्यंत संबंधित बिलावर ‘नो डिस्कनेक्ट’ असा शिक्का मारून देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. वीज बिलावर मराठीमधील नाव आणि पत्ता चुकीचा लिहिला जातो, याबाबत विचारणा केली असता मराठी शब्द दुरूस्ती सॉफ्टवेअर आमच्याकडे नाही असे उत्तर मिळत असल्याकडेही दळवी यांनी लक्ष वेधले आहे.