शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यातील जनावरांच्या जीवावर उठली संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:59 IST

चारा पाण्याच्या शोधात रानोमाळ हिंडणाऱ्या वन्यजीव, पशूपक्षांची जिल्ह्यातील अभयारण्यात मोठ्याप्रमाणात शिकार केली जात आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : लॉकडाउन काळात लागू केलेल्या संचारबंदीचा गैरफायदा घेऊन रखरखत्या उन्हात चारा पाण्याच्या शोधात रानोमाळ हिंडणाऱ्या वन्यजीव, पशूपक्षांची जिल्ह्यातील अभयारण्यात मोठ्याप्रमाणात शिकार केली जात आहे. शिवाय या शिकारींच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात जंगलांना वनवे लावून जनावरांचा जीव घेतला जात आहे. शनिवारी सकाळीच दबा धरून बसलेल्या शिकाऱ्यांनी एक हरणीचा जीव घेतला. तानसा अभयारण्यात घडलेल्या या घटनेसह एकापाठोपाठ तीन घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.वटवाघुळातील कोरोनापासून जीव वाचवता यावा, लागण होऊन कोणाचा नाहक बळी जाऊ नये, यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जंगलातील पशूपक्षांना या संसर्गाची लागण होऊ नये, यासाठी जंगलात जाण्यासही बंदी आहे. मात्र, या सक्तीच्या संचारबंदीला न जुमानता काहींनी जंगलातील पशूपक्षांच्या शिकारीची मनमानी सुरू केली आहे. शिकार करण्यासाठी जंगलात वणवे ही लावण्याच्या दुर्दैवी घटना जंगलात घडत आहेत.शनिवारी सकाळीच तानसा अभयारण्यात भेकर जातीच्या हरणाची शिकार केल्याची दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेची चाहूल लागताच वनाधिकारी व कर्मचाºयांनी शिकारींना शिताफीने अटक केली.याशिवाय लागोपाठ याच अभयारण्यात अन्यही शिकारीच्या दोन घटना घडल्याच्या वृत्तास वन परीक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने यांनी दुजोरा दिला.>लावा पक्ष्याचीही शिकारया हरणाच्या शिकारीतील अटक केलेले आरोपी शहापूर तालुक्यामधील मौजे टहारपूर, डिंभे येथील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी भिवंडीच्या सांगाव, देवचोळे येथील वनक्षेत्रात रानडुकराची शिकार करण्यात आली. या घटनेतील दोघांना ताब्यात घेतले. तर अन्य दहा ते पंधरा साथीदार फरार आहेत. याशिवाय शहापूर तालुक्यामधील उंबरखांड येथे तिघांना अटक केली आहे. तर अन्य तिघे फरार असून त्यांनी चार लावा पक्ष्यांची शिकार केल्याचे उघडकीस आले. या मृत लावा पक्ष्यासह त्यांच्याकडे शिकारीचे साहित्य आढळून आले असून ते जप्त केल्याचे चन्ने यांनी सांगितले. या शिकारींच्या घटनांच्या तुलनेत जिल्ह्यातील सर्वच जंगलात वणव्याच्या घटनांमध्ये वन्यजीव, पशूपक्षी किडेमकोडे आणि औषधी वनस्पती जळून खाक होत आहेत.>माळशेज घाटात आगीच्या सात घटनासध्या सुरू असलेल्या लॉकडाउनचा काळ स्वरक्षणाचा असल्याचे समजून काही महाभाग जंगलात जाऊन वन्यजीवांची हत्या करून पोटभरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माळशेज घाट परिसरातील जंगलात अद्याप शिकारीची घटना काही दिवसात घडली नाही. परंतु, आगीच्या पाच ते सात घटना घडल्या असून त्या वेळीच आटोक्यात आणल्याचा दावा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे यांनी केला आहे. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात शिकारीची व आग लागण्याची घटना घडली नसल्याचा दावा वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी केला आहे.