शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

अभयारण्यातील जनावरांच्या जीवावर उठली संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:59 IST

चारा पाण्याच्या शोधात रानोमाळ हिंडणाऱ्या वन्यजीव, पशूपक्षांची जिल्ह्यातील अभयारण्यात मोठ्याप्रमाणात शिकार केली जात आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : लॉकडाउन काळात लागू केलेल्या संचारबंदीचा गैरफायदा घेऊन रखरखत्या उन्हात चारा पाण्याच्या शोधात रानोमाळ हिंडणाऱ्या वन्यजीव, पशूपक्षांची जिल्ह्यातील अभयारण्यात मोठ्याप्रमाणात शिकार केली जात आहे. शिवाय या शिकारींच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात जंगलांना वनवे लावून जनावरांचा जीव घेतला जात आहे. शनिवारी सकाळीच दबा धरून बसलेल्या शिकाऱ्यांनी एक हरणीचा जीव घेतला. तानसा अभयारण्यात घडलेल्या या घटनेसह एकापाठोपाठ तीन घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.वटवाघुळातील कोरोनापासून जीव वाचवता यावा, लागण होऊन कोणाचा नाहक बळी जाऊ नये, यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जंगलातील पशूपक्षांना या संसर्गाची लागण होऊ नये, यासाठी जंगलात जाण्यासही बंदी आहे. मात्र, या सक्तीच्या संचारबंदीला न जुमानता काहींनी जंगलातील पशूपक्षांच्या शिकारीची मनमानी सुरू केली आहे. शिकार करण्यासाठी जंगलात वणवे ही लावण्याच्या दुर्दैवी घटना जंगलात घडत आहेत.शनिवारी सकाळीच तानसा अभयारण्यात भेकर जातीच्या हरणाची शिकार केल्याची दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेची चाहूल लागताच वनाधिकारी व कर्मचाºयांनी शिकारींना शिताफीने अटक केली.याशिवाय लागोपाठ याच अभयारण्यात अन्यही शिकारीच्या दोन घटना घडल्याच्या वृत्तास वन परीक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने यांनी दुजोरा दिला.>लावा पक्ष्याचीही शिकारया हरणाच्या शिकारीतील अटक केलेले आरोपी शहापूर तालुक्यामधील मौजे टहारपूर, डिंभे येथील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी भिवंडीच्या सांगाव, देवचोळे येथील वनक्षेत्रात रानडुकराची शिकार करण्यात आली. या घटनेतील दोघांना ताब्यात घेतले. तर अन्य दहा ते पंधरा साथीदार फरार आहेत. याशिवाय शहापूर तालुक्यामधील उंबरखांड येथे तिघांना अटक केली आहे. तर अन्य तिघे फरार असून त्यांनी चार लावा पक्ष्यांची शिकार केल्याचे उघडकीस आले. या मृत लावा पक्ष्यासह त्यांच्याकडे शिकारीचे साहित्य आढळून आले असून ते जप्त केल्याचे चन्ने यांनी सांगितले. या शिकारींच्या घटनांच्या तुलनेत जिल्ह्यातील सर्वच जंगलात वणव्याच्या घटनांमध्ये वन्यजीव, पशूपक्षी किडेमकोडे आणि औषधी वनस्पती जळून खाक होत आहेत.>माळशेज घाटात आगीच्या सात घटनासध्या सुरू असलेल्या लॉकडाउनचा काळ स्वरक्षणाचा असल्याचे समजून काही महाभाग जंगलात जाऊन वन्यजीवांची हत्या करून पोटभरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माळशेज घाट परिसरातील जंगलात अद्याप शिकारीची घटना काही दिवसात घडली नाही. परंतु, आगीच्या पाच ते सात घटना घडल्या असून त्या वेळीच आटोक्यात आणल्याचा दावा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे यांनी केला आहे. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात शिकारीची व आग लागण्याची घटना घडली नसल्याचा दावा वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी केला आहे.