शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या आरक्षित जागांवर ‘अवजड’ पार्किंग

By admin | Updated: November 17, 2016 06:55 IST

ठाण्यातील आपले आरक्षित असलेले भूखंड एसटी महामंडळाने ताब्यात न घेतल्याने पालिकेने आता या भूखंडांवर अवजड वाहनांसाठीचे

ठाणे : ठाण्यातील आपले आरक्षित असलेले भूखंड एसटी महामंडळाने ताब्यात न घेतल्याने पालिकेने आता या भूखंडांवर अवजड वाहनांसाठीचे पार्किंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यासंदर्भातील फेरबदलाचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.ठाणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. परंतु, पालिकेच्या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नसल्याने वाहनचालक शहरात कुठेही आणि कशीही आपले वाहने उभी करताना दिसत आहेत. यामुळे यावर उपाय म्हणून शहरातील आरक्षित आणि मोकळे भूखंड ताब्यात घेऊन त्यावर पार्किंग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार, एसटीच्या आरक्षित भूखंडांकडे पालिकेने आपली वक्रदृष्टी वळवून ते ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचे खोपट, कळवा येथे वर्कशॉप असून खोपट येथील वर्कशॉपच्या जागेचे बीओटी तत्त्वावर पुनर्निर्माण केले आहे. हे पुनर्निर्माण करताना एकूण भूखंडांच्या क्षेत्रफळापैकी काही भागांवर वाणिज्य वापरासाठी परवानगी देऊन वर्कशॉपची जागा कमी केली आहे. याचाच अर्थ एसटी महामंडळाकडे ठाण्यात पुरेशी जागा आहे, असा कयास पालिकेने बांधला आहे. त्यामुळेच महामंडळाने बाळकुम येथील २.२५ हेक्टरचा आरक्षित भूखंड अद्यापही ताब्यात घेतलेला नाही. शिवाय, नौपाडा येथील भूखंडदेखील याच पद्धतीने अद्यापही एसटीने ताब्यात घेतलेला नाही. याचाच अर्थ एसटी महामंडळाला आता शहरात जागेची आवश्यकता नसल्याचेच दिसून येत आहे. दरम्यान, दुसरीकडे शहरात दरदिवशी ट्रक, टेम्पो, बस आदी अवजड वाहनांची वर्दळ वाढली असून त्यांना पार्किंगसाठी जागा नसल्याने ती रस्त्याच्या कडेला उभी राहताना दिसत आहेत. त्यामुळे काही भागांत वाहतूककोंडीदेखील होत आहे. त्यामुळे या वाहनांच्या पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी पालिकेने ही नामी शक्कल लढवली आहे. त्यानुसार, बाळकुम आणि नौपाडा भागातील एसटीच्या आरक्षित भूखंडावर अवजड वाहनांचे पार्किंग असा फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा फेरबदलाचा प्रस्ताव पुढे आणताना पालिकेने यासंदर्भात सूचना व हरकतीदेखील मागवल्या आहेत. पालिकेने घेतलेल्या सुनावणीमध्ये १८ हरकतदार उपस्थित होते. त्यांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात सादर करण्यास १५ दिवसांचा कालावधी दिला होता. परंतु, १५ दिवसांत कोणीही लेखी निवेदनाव्यतिरिक्त कोणतीही लेखी हरकत दिलेली नाही. तसेच या सुनावणीत भूखंडधारकास आरक्षणामधील २० टक्के पार्किंगचे आरक्षण द्यावे, अशी मागणी सुनावणीदरम्यान करण्यात आली होती. परंतु, २० टक्के आरक्षण देणे शक्य नसल्याने या हरकती फेटाळल्या. यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय अभियंता मु.भ. मेराजी हे सुनावणीदरम्यान उपस्थित होते. त्यांनीदेखील लेखी अथवा तोंडी म्हणणे न मांडता एक महिन्याची मुदत मागितली होती. त्यांना १५ दिवसांची मुदत दिली होती. परंतु, या कालावधीत त्यांनी कोणतीही हालचाल केली नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. एकूणच महामंडळाने १९९९ पासून या आरक्षित भूखंडांचा विकास केला नाहीच, शिवाय ते ताब्यातही घेतले नाहीत. त्यामुळेच आता हा फेरबदलाचा प्रस्ताव पुढे आणल्याचा पालिकेचा दावा आहे. त्यानुसार, या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)