शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

एसटीच्या आरक्षित जागांवर ‘अवजड’ पार्किंग

By admin | Updated: November 17, 2016 06:55 IST

ठाण्यातील आपले आरक्षित असलेले भूखंड एसटी महामंडळाने ताब्यात न घेतल्याने पालिकेने आता या भूखंडांवर अवजड वाहनांसाठीचे

ठाणे : ठाण्यातील आपले आरक्षित असलेले भूखंड एसटी महामंडळाने ताब्यात न घेतल्याने पालिकेने आता या भूखंडांवर अवजड वाहनांसाठीचे पार्किंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यासंदर्भातील फेरबदलाचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.ठाणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. परंतु, पालिकेच्या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नसल्याने वाहनचालक शहरात कुठेही आणि कशीही आपले वाहने उभी करताना दिसत आहेत. यामुळे यावर उपाय म्हणून शहरातील आरक्षित आणि मोकळे भूखंड ताब्यात घेऊन त्यावर पार्किंग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार, एसटीच्या आरक्षित भूखंडांकडे पालिकेने आपली वक्रदृष्टी वळवून ते ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचे खोपट, कळवा येथे वर्कशॉप असून खोपट येथील वर्कशॉपच्या जागेचे बीओटी तत्त्वावर पुनर्निर्माण केले आहे. हे पुनर्निर्माण करताना एकूण भूखंडांच्या क्षेत्रफळापैकी काही भागांवर वाणिज्य वापरासाठी परवानगी देऊन वर्कशॉपची जागा कमी केली आहे. याचाच अर्थ एसटी महामंडळाकडे ठाण्यात पुरेशी जागा आहे, असा कयास पालिकेने बांधला आहे. त्यामुळेच महामंडळाने बाळकुम येथील २.२५ हेक्टरचा आरक्षित भूखंड अद्यापही ताब्यात घेतलेला नाही. शिवाय, नौपाडा येथील भूखंडदेखील याच पद्धतीने अद्यापही एसटीने ताब्यात घेतलेला नाही. याचाच अर्थ एसटी महामंडळाला आता शहरात जागेची आवश्यकता नसल्याचेच दिसून येत आहे. दरम्यान, दुसरीकडे शहरात दरदिवशी ट्रक, टेम्पो, बस आदी अवजड वाहनांची वर्दळ वाढली असून त्यांना पार्किंगसाठी जागा नसल्याने ती रस्त्याच्या कडेला उभी राहताना दिसत आहेत. त्यामुळे काही भागांत वाहतूककोंडीदेखील होत आहे. त्यामुळे या वाहनांच्या पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी पालिकेने ही नामी शक्कल लढवली आहे. त्यानुसार, बाळकुम आणि नौपाडा भागातील एसटीच्या आरक्षित भूखंडावर अवजड वाहनांचे पार्किंग असा फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा फेरबदलाचा प्रस्ताव पुढे आणताना पालिकेने यासंदर्भात सूचना व हरकतीदेखील मागवल्या आहेत. पालिकेने घेतलेल्या सुनावणीमध्ये १८ हरकतदार उपस्थित होते. त्यांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात सादर करण्यास १५ दिवसांचा कालावधी दिला होता. परंतु, १५ दिवसांत कोणीही लेखी निवेदनाव्यतिरिक्त कोणतीही लेखी हरकत दिलेली नाही. तसेच या सुनावणीत भूखंडधारकास आरक्षणामधील २० टक्के पार्किंगचे आरक्षण द्यावे, अशी मागणी सुनावणीदरम्यान करण्यात आली होती. परंतु, २० टक्के आरक्षण देणे शक्य नसल्याने या हरकती फेटाळल्या. यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय अभियंता मु.भ. मेराजी हे सुनावणीदरम्यान उपस्थित होते. त्यांनीदेखील लेखी अथवा तोंडी म्हणणे न मांडता एक महिन्याची मुदत मागितली होती. त्यांना १५ दिवसांची मुदत दिली होती. परंतु, या कालावधीत त्यांनी कोणतीही हालचाल केली नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. एकूणच महामंडळाने १९९९ पासून या आरक्षित भूखंडांचा विकास केला नाहीच, शिवाय ते ताब्यातही घेतले नाहीत. त्यामुळेच आता हा फेरबदलाचा प्रस्ताव पुढे आणल्याचा पालिकेचा दावा आहे. त्यानुसार, या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)