शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

सुसंस्कृत डोंबिवली शहराने मला मोठे केले!

By admin | Updated: January 15, 2017 02:41 IST

श्वास चित्रपटाच्या कथालेखिका माधवी घारपुरे यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यालयास भेट दिली. साहित्य संमेलनात आपले कथाकथन ठेवावे, अशी सूचना त्यांनी

डोंबिवली : श्वास चित्रपटाच्या कथालेखिका माधवी घारपुरे यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यालयास भेट दिली. साहित्य संमेलनात आपले कथाकथन ठेवावे, अशी सूचना त्यांनी आयोजन समितीला केली आहे. विविध सूचनांमुळे कार्यक्रमांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनात संधी देता आली नाही, तर पुढील वर्षी आगरी महोत्सवात कथाकथनाचा कार्यक्रम घेण्याचा मानस आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी व्यक्त केला आहे. आयोजन समितीने घारपुरे यांचा हृद्य सत्कार केला. तेव्हा, डोंबिवलीने मला मोठे केले, अशी भावना घारपुरे यांनी व्यक्त केली. साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणुकीच्या मतदारयादीत घारपुरे यांचे नाव नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आयोजक आगरी युथ फोरमने घारपुरे यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर, रविवारी सायंकाळी घारपुरे यांनी संमेलन कार्यालयास भेट दिली. घारपुरे यांनी सांगितले, आताच्या काळात मी डोंबिवलीत हवे होते. डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि मी ठाणेकर आहे. मात्र, ३६ वर्षे मी डोंबिवलीकर होते. डोंबिवलीने मला मोठे केले. डोंबिवली साहित्य संस्कृतीची पंढरी आहे. या पंढरीत सारस्वतांचा मेळा भरणार आहे, ही बाब मला आनंददायी वाटते. डोंबिवलीतील साहित्य व संस्कार फार चांगले आहे. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नक्कीच चांगले आणि यशस्वी होणार, यात दुमत आणि शंका नाही. डोंबिवलीकरांचा सुसंस्कृतपणाचा किस्सा सांगताना त्या म्हणाल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचा एक कार्यक्रम होता. त्यावेळी लतादीदींनी गाणे गायले नाही, म्हणून प्रेक्षक चिडले होते. त्यावेळी दिवंगत शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र वाजपेयी यांनी प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. तेव्हा, संयम दाखवून डोंबिवलीकरांनी सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवले होते. असे अनेक किस्से आहेत. डोंबिवलीत गोविंद तळवलकर, विश्वास मेहेंदळे, वि.दा. करंदीकर असे अनेक दिग्गज्ज वास्तव्यास होते. डोंबिवलीला साहित्य संस्कृतीची परंपरा आहे. आगरी युथ फोरमचे अध्यक्ष वझे यांनी सांगितले, डोंबिवलीत ‘श्वास’ नसल्याने आमचा श्वास गुदमरतोय. त्यामुळे घारपुरे यांचे ठाण्याला जाणे मनाला चुकचुक लावणारे ठरले आहे. संमेलनाला त्यांनी उपस्थित राहावे. तो डोंबिवलीकरांचा सन्मानच ठरेल. (प्रतिनिधी)विद्यार्थी संमेलन २१ जानेवारीलासाहित्य संमेलनानिमित्त कल्याणला कार्यक्रम व्हावे, यासाठी साहित्यिकांसोबत आयोजकांची नुकतीच एक बैठक पार पडली होती. कल्याणमध्ये विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्याचा विचार पुढे आला होता. २१ जानेवारीला विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्याचे ठरले आहे. महिला मेळावा १२ डिसेंबरला : साहित्य संमेलनात महिलांचा सहभाग असावा. महिलांचा एक कार्यक्रम असावा. त्यासाठीही नुकतीच एक बैठक पार पडली होती. त्यानुसार, महिला मेळावा १२ डिसेंबरला घेण्याचे ठरले आहे. महिला मेळावा सकाळी १० ते ११.३० या वेळेत पीअ‍ॅण्डटी कॉलनीत, ११.३० ते १२ या वेळेत ब्राह्मण सभागृहात, ३.३० ते ४.३० यावेळेत ओंकार इंटरनॅशनल शाळेच्या परिसरात पार पडणार आहे. संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी बदलापुरात २५ व २६ डिसेंबरला कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे.