शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रावर नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:41 IST

ठाणे : विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांना काेराेना टेस्ट (आरटीपीसीआर) बंधनकारक केल्याने त्याचे पडसाद गुरुवारी ठाण्यातील प्रत्येक केंद्रावर दिसून ...

ठाणे : विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांना काेराेना टेस्ट (आरटीपीसीआर) बंधनकारक केल्याने त्याचे पडसाद गुरुवारी ठाण्यातील प्रत्येक केंद्रावर दिसून आले. सकाळपासूनच पालिकेच्या विविध केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनी कोरोना टेस्ट सक्तीची केली आहे. त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली तरच त्यांना काम करायला दिले जाईल, असे आदेश आहेत. त्यामुळेच ही गर्दी वाढल्याचे दिसत होते. महापालिकेची काही केंद्र सकाळी ११ वाजेनंतर सुरू झाल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

राज्य सरकारतर्फे मिनी लॉकडाऊन घेण्यात आला आहे. त्यानुसार आता अत्यावश्यक सेवेत काम करणारे, दुकानात काम करणारे, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे, रिपेअरिंगचे काम करणारे आदींसह विविध आस्थापनांत काम करणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. येत्या १० एप्रिलच्या आत ही चाचणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच गुरुवारी सकाळपासून शहरातील अनेक केंद्रांवर चाचणी करून घेण्यासाठी गर्दी उसळल्याचे दिसत हाेते. त्यातही रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांनाही १० एप्रिलपर्यंत चाचणी बंधनकारक केल्याने त्यांनीही चाचणी करून घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केल्याचे दिसत होते.

ठाणे महापालिका हद्दीत काेराेना चाचणीची १२ केंद्रे विविध भागांत सुरू आहेत. त्यानुसार मानपाडा, टेंभीनाका, कळवा, वागळे, सावरकरनगर, लोकमान्यनगर आदींसह इतर केंद्रांच्या बाहेरही सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक केंद्र ११ वाजेनंतर सुरू हाेत असल्याने रांगेत उभे असलेल्या नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत होत्या. त्यातही अतिशय धिम्या गतीने अनेक केंद्रावर कामे सुरू असल्याचे चित्र दिसत होते. तर, अनेक केंद्रांवर मनुष्यबळाचा अभावही जाणवत होता. त्यातही उशिराने केंद्र सुरू झाल्याने अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. दुकाने सुरू होणार अशी आशा असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी चाचणी करून घेण्यासाठी रांग लावली होती.

काेट

ठाणे महापालिका हद्दीत १२ केंद्रांवर काेराेना चाचणी केली जात आहे. विविध आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आल्याने केंद्रावर गर्दी झाली होती.

- डॉ. राजू मुरूडकर, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा