शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

कोट्यवधींच्या उत्पन्नावर पाणी, कर्मचाऱ्यांचा अभाव उल्हासनगरात बांधकाम नियमित करण्याचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:00 IST

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने, ऑनलाईन हजारो अर्ज आले असून ऑफलाईन मध्ये आलेले अर्ज स्वीकारावे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ठप्प पडून कोट्यवधींचे उत्पन्न बुडीत निघाले आहे. बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी शासनाने, अनेक वर्षे रिक्त असलेल्या पालिका नगररचनाकार पदी अरुण गुडगुडे यांची नियुक्ती केली. मात्र महापालिकेला जाग कधी येणार याकडे सर्वांचें लक्ष लागले आहे.

 उल्हासनगरातील अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने शहरातील अवैध बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश सन २००५ साली काढण्यात आला. बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने सरसगट सव्वा लाख मालमत्ताधारकाना नोटिसा पाठविल्यावर, ३२ हजारा पेक्षा जास्त प्रस्ताव आले. मात्र महापालिकेचा दुर्लक्षामुळे फक्त ९९ बांधकामे नियमित होऊन, दंडात्मक स्वरूपात महापालिकेला ८ कोटीचे उत्पन्न मिळाले. दरम्यान महापालिकेच्या दुर्लक्षामुळे बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया ठप्प पडली असून कोट्यवधीच्या उत्पन्नावर पाणी फेरले गेले. तसेच हजारो अवैध बांधकामे नियमित करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे राज्य शासनाने सुचवून आयुक्तांना सर्वाधिकार दिले आहे.

 महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने, ऑनलाईन हजारो अर्ज आले असून ऑफलाईन मध्ये आलेले अर्ज स्वीकारावे. तसेच जुन्या प्रस्तावाचा विचार करण्याचे सुचविण्यात आले. मात्र कोरोना महामारीमुळे बांधकाम नियमित करण्याचे काम ठप्प पडले. आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी बांधकाम नियमित करण्याची प्रक्रियाकडे दुर्लक्ष केल्याने शेकडो बांधकामे नियमित करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तसेच महापालिकेचा कोट्यवधीचा महसूल बुडीत निघाला आहे. नगररचनाकार विभागात कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने, बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली नसल्याची प्रतिक्रिया नगररचनाकार अरुण गुडगुडे यांनी दिली.

 महापालिकेला मिळणार ५०० कोटी? 

अवैध बांधकाम नियमित प्रक्रिया सुरू झाल्यास, शेकडो बांधकामे नियमित होऊन, ५०० कोटी पेक्षा जास्त दंडात्मक कारवाई स्वरूपात महापालिकेला उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण झाली. तसेच नागरिकांत समाधान निर्माण होणार आहे. यापूर्वी ९९ बांधकामे नियमित झाले असून त्यापासून महापालिकेला ८ कोटीचे दंडात्मक कारवाईच्या स्वरूपात उत्पन्न मिळाले होते. व तंज्ञ समितीची स्थापना प्रभाग समिती निहाय केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर