शहरं
Join us  
Trending Stories
1
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
2
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
3
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
4
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
5
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
6
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
7
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
8
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
9
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
10
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज
11
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
12
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
13
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
14
"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं?
15
रोहित पवारांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा; पाेलिस ठाण्यात केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल
16
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
17
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
18
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घातला अडीच कोटींचा गंडा; निवृत्त उपसचिवावर पोलिसांत गुन्हा दाखल
19
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
20
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक

रेल्वे प्रशासन, खासदारांवर टीकेची झोड

By admin | Updated: May 22, 2017 01:53 IST

रेल्वे मंत्रालयाने ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ या त्रयस्त संस्थेकडून केलेल्या देशभरातील रेल्वे स्थानकांच्या स्वच्छता सर्वेक्षण अहवालात ठाणे स्थानकाची ३२६

लोकमत न्यूट नेटवर्क डोंबिवली : रेल्वे मंत्रालयाने ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ या त्रयस्त संस्थेकडून केलेल्या देशभरातील रेल्वे स्थानकांच्या स्वच्छता सर्वेक्षण अहवालात ठाणे स्थानकाची ३२६ व्या तर कल्याणची ३०२ क्रमांकावर घसरण झाली आहे. स्थानकांतील अस्वच्छतेबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाबरोबर ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली. खासदारांनी केवळ विविध सेवा-सुविधांच्या उद्घाटनांवरच भर दिला. पण स्वच्छता आणि प्रवाशांच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.डोंबिवली स्थानकाची डॉ. शिंदे यांनी गुरुवारी पाहणी केली. स्वच्छतागृह बंद असल्याने नाराजी व्यक्त केली. पण हे सगळे आधी केले असते तर बरे झाले असते. केवळ प्रसिद्धीचा स्टंट म्हणून त्यांनी तातडीने पाहणी केली, हे योग्य नाही. किती वेळा आणि का प्रवाशांच्या अपेक्षांवर पाणी फिरवणार?, असा सवाल नाराज प्रवाशांनी केला. कळवा ते अंबरनाथ आणि टिटवाळापर्यंतच्या स्थानकांचा अभ्यास केल्यास केवळ ठाणे आणि कल्याणच नव्हे तर सगळीच स्थानके बकाल असल्याचे स्पष्ट होईल, असेही प्रवासी म्हणाले. रेल्वे प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यानेच प्रत्येक ठिकाणी घसरण होत चालल्याची टीका वास्तूविशारद राजीव तायशेटे यांनी केली. रेल्वे स्थानक परिसरात कोणीही येतो कुठेही थुंकतो, कचरा टाकतो, लघुशंका करता, हे योग्य नाही. यामुळे केवळ रेल्वे प्रशासनाचीच नव्हे तर तेथील लोकप्रतिनिधींची किंमत केली जाते. सातत्याने रेल्वे स्थानकांचा दौरा करणे, प्रवाशांच्या अपेक्षा जाणणे हे आवश्यक आहे. पण तसे कधी होत नाही, असे तायशेटे म्हणाले. ठाणे आणि कल्याण ही दोन्ही स्थानके अत्यंत महत्त्वाची आहेत. या स्थानकात लांबपल्ल्यांच्या गाड्यांमधून हजारो प्रवासी येतात. या रेल्वे स्थानकातील अस्वच्छतेशी त्यांना सामाना करावा लागतो. त्यामुळे अस्वच्छतेबाबत ते देशभर नाराजी व्यक्त करतात. परिणामी आपल्या शहरांचीच बदनामी होते. त्याचे दुरगामी परिणाम होतात. याचा निदान यानंतर तरी गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. अशा अनेक बाबींमुळे प्रवासी नाराज असतात. निदान त्यांचे म्हणणे ऐकावे आणि बदल केल्यास परिवर्तन नक्की घडेल. पण हे कोणीही लक्षात का घेत नाही, असा सवाल प्रवाशांनी केला.आघाडी सरकारच्या काळात ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक आणि कल्याणचे माजी खासदार आनंद परांजपे हे सातत्याने ‘खासदार आपल्या दारी’ या उपक्रमातून प्रवाशांची भेट घेत. प्रवाशांकडून ते एक फॉर्म भरून घ्यायचे, त्याचा अभ्यास केला जायचा. स्थानकानुसार त्याची वर्गवारी केली जायची. संबंधित स्थानक प्रबंधकांना त्याबाबातची माहिती दिली जायची. संबंधित सुधारणा तातडीने व्हायच्या. त्या न केल्यास रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली जात असे. पण मागील दोन वर्षांत तसा कोणताही उपक्रम राबवला गेल्याचे स्मरणात नसल्याची बोचरी टीका विविध ठिकाणच्या प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.