शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रशासन, खासदारांवर टीकेची झोड

By admin | Updated: May 22, 2017 01:53 IST

रेल्वे मंत्रालयाने ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ या त्रयस्त संस्थेकडून केलेल्या देशभरातील रेल्वे स्थानकांच्या स्वच्छता सर्वेक्षण अहवालात ठाणे स्थानकाची ३२६

लोकमत न्यूट नेटवर्क डोंबिवली : रेल्वे मंत्रालयाने ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ या त्रयस्त संस्थेकडून केलेल्या देशभरातील रेल्वे स्थानकांच्या स्वच्छता सर्वेक्षण अहवालात ठाणे स्थानकाची ३२६ व्या तर कल्याणची ३०२ क्रमांकावर घसरण झाली आहे. स्थानकांतील अस्वच्छतेबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाबरोबर ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली. खासदारांनी केवळ विविध सेवा-सुविधांच्या उद्घाटनांवरच भर दिला. पण स्वच्छता आणि प्रवाशांच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.डोंबिवली स्थानकाची डॉ. शिंदे यांनी गुरुवारी पाहणी केली. स्वच्छतागृह बंद असल्याने नाराजी व्यक्त केली. पण हे सगळे आधी केले असते तर बरे झाले असते. केवळ प्रसिद्धीचा स्टंट म्हणून त्यांनी तातडीने पाहणी केली, हे योग्य नाही. किती वेळा आणि का प्रवाशांच्या अपेक्षांवर पाणी फिरवणार?, असा सवाल नाराज प्रवाशांनी केला. कळवा ते अंबरनाथ आणि टिटवाळापर्यंतच्या स्थानकांचा अभ्यास केल्यास केवळ ठाणे आणि कल्याणच नव्हे तर सगळीच स्थानके बकाल असल्याचे स्पष्ट होईल, असेही प्रवासी म्हणाले. रेल्वे प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यानेच प्रत्येक ठिकाणी घसरण होत चालल्याची टीका वास्तूविशारद राजीव तायशेटे यांनी केली. रेल्वे स्थानक परिसरात कोणीही येतो कुठेही थुंकतो, कचरा टाकतो, लघुशंका करता, हे योग्य नाही. यामुळे केवळ रेल्वे प्रशासनाचीच नव्हे तर तेथील लोकप्रतिनिधींची किंमत केली जाते. सातत्याने रेल्वे स्थानकांचा दौरा करणे, प्रवाशांच्या अपेक्षा जाणणे हे आवश्यक आहे. पण तसे कधी होत नाही, असे तायशेटे म्हणाले. ठाणे आणि कल्याण ही दोन्ही स्थानके अत्यंत महत्त्वाची आहेत. या स्थानकात लांबपल्ल्यांच्या गाड्यांमधून हजारो प्रवासी येतात. या रेल्वे स्थानकातील अस्वच्छतेशी त्यांना सामाना करावा लागतो. त्यामुळे अस्वच्छतेबाबत ते देशभर नाराजी व्यक्त करतात. परिणामी आपल्या शहरांचीच बदनामी होते. त्याचे दुरगामी परिणाम होतात. याचा निदान यानंतर तरी गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. अशा अनेक बाबींमुळे प्रवासी नाराज असतात. निदान त्यांचे म्हणणे ऐकावे आणि बदल केल्यास परिवर्तन नक्की घडेल. पण हे कोणीही लक्षात का घेत नाही, असा सवाल प्रवाशांनी केला.आघाडी सरकारच्या काळात ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक आणि कल्याणचे माजी खासदार आनंद परांजपे हे सातत्याने ‘खासदार आपल्या दारी’ या उपक्रमातून प्रवाशांची भेट घेत. प्रवाशांकडून ते एक फॉर्म भरून घ्यायचे, त्याचा अभ्यास केला जायचा. स्थानकानुसार त्याची वर्गवारी केली जायची. संबंधित स्थानक प्रबंधकांना त्याबाबातची माहिती दिली जायची. संबंधित सुधारणा तातडीने व्हायच्या. त्या न केल्यास रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली जात असे. पण मागील दोन वर्षांत तसा कोणताही उपक्रम राबवला गेल्याचे स्मरणात नसल्याची बोचरी टीका विविध ठिकाणच्या प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.