शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

नगरसेवकांच्या भूमिकेवर संघर्ष समितीची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 01:28 IST

केडीएमसीतून २७ गावे वगळण्याचा मुद्दा : चार वर्षांत प्रभागांमध्ये किती विकासकामे केली?

कल्याण : केडीएमसीतून २७ गावे वगळू नका. स्वतंत्र नगरपालिकेची गरज नाही, अशी भूमिका २७ गावांतील नगरसेवकांनी घेतल्याने त्यांच्या या भूमिकेविषयी सर्वपक्षीय संघर्ष समितीने तीव्र शब्दांत आगपाखड केली आहे. नगरसेवकांनी चार वर्षांत त्यांच्या प्रभागांत किती विकासकामे केली, असा खोचक सवाल समितीचे सचिव नरेश पाटील यांनी केला आहे.

केडीएमसीच्या २०१५ च्या निवडणुकीत नगरसेवक हे संघर्ष समितीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावे महापालिकेतून वगळणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावेळी भाजप, संघर्ष समिती, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एका व्यासपीठावर होते. शिवसेना सोडून सगळ्यांचा स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीस पाठिंबा होता. आजही आहे. आजच्या घडीला महाविकास आघाडीच्या सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी गावे वगळण्याच्या मागणीला विरोध असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. तरीदेखील काही नगरसेवक २०१७ मध्ये फडवणीस यांना दिलेल्या पत्राचा आधार घेत सर्वच नगरसेवकांचा गावे वगळण्यास विरोध असल्याचे सांगत आहेत. मात्र, हे पत्र जुने असल्याने गावे वगळण्यास आमचा विरोध नाही, असे काही नगरसेवकांनी संघर्ष समितीशी संपर्क करून सांगितले.प्रत्यक्षात, यासंदर्भात पुन्हा नगरसेवकांकडे विचारणा केली की, जुन्या पत्राचा संदर्भ दिला जात आहे. त्यावेळी त्यांनी नव्या पत्राचा दाखला दिला. मात्र, नव्या पत्राच्या शेवटच्या पानावर सात सदस्यांचीच स्वाक्षरी असल्याचे पाहावयास मिळाले.त्याचबरोबर विरोध करणारे भाजप नगरसेवक हे सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि माजी राज्यमंत्री व डोंबिवलीचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात आहेत का, असा सवाल केला आहे. तसेच शिवसेनेचे सदस्य त्यांच्या नेतृत्वाविरोधात ही मागणी करीत आहे का, असा दुहेरी प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.विरोध करणाऱ्या काही सदस्यांनी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सगळेच सदस्य हे स्वतंत्र नगरपालिकेच्या विरोधात आहेत. मात्र, त्यांच्यावर काही लोक दबाब टाकत असल्याने त्यांच्याकडून स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीचा नकार दर्शविला जात आहे.यासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील म्हणाले, ‘स्वतंत्र नगरपालिकेच्या मुद्यावर मनसे पूर्वीपासून ठाम होती. शिवसेना आता या मागणीसंदर्भात राजकारण खेळत आहे. त्यामुळेच काही सदस्य स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीस विरोध करीत आहेत.’स्वतंत्र नगरपालिकाच हिताची-पाटीलसंघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ‘स्वतंत्र नगरपालिकेची मागणी ही २७ गावांच्या हिताची आहे. तिला जनसमर्थन मिळत असताना जनहिताच्या विरोधात बरळणे म्हणजे हा कोडगेपणा आहे. या सगळ्या मुद्यावरून स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीवरून नगरसेवक व संघर्ष समिती तसेच विविध राजकीय पक्ष यांच्यात दोन गट पडले असल्याचे दिसून येत आहेत.’

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका