शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

गुन्हेगारीच्या पोलिसांना बेड्या

By admin | Updated: January 9, 2016 01:59 IST

दरोडे, सोनसाखळी चोऱ्या, वाहनचोऱ्या , घरफोड्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले असून या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात कल्याण-डोंबिवलीतील पोलीस

आकाश गायकवाड, डोंबिवलीदरोडे, सोनसाखळी चोऱ्या, वाहनचोऱ्या , घरफोड्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले असून या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात कल्याण-डोंबिवलीतील पोलीस अपयशी ठरल्याचे सद्य:स्थितीवरून दिसत आहे. गुन्ह्यांच्या वाढत्या आलेखामुळे नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे.कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांची लोकसंख्या सुमारे १५ लाख आहे. या दोन्ही शहरांच्या कार्यक्षेत्रांत आठ पोलीस ठाणी आहेत. यात महात्मा फुले, बाजारपेठ, खडकपाडा, कोळसेवाडी, रामनगर, विष्णूनगर, टिळकनगर, मानपाडा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोड्या आणि सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. या क्षेत्रांत विविध ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू असूनदेखील चोर आपले ईप्सित साध्य करण्यात यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांचे प्रमाण सध्या आहे त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येनुसार काही पोलीस ठाण्यांची हद्द मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. परिस्थितीवर देखरेख किंवा येथील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडणे, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. तोकडे पोलीस दल आणि दिवसागणिक गुन्ह्यांचा वाढता आलेख याचा पोलिसांवर विलक्षण ताण पडत असल्याचे दिसते. कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस ठाणे आणि डोंबिवलीमधील मानपाडा पोलीस ठाणे ही त्याची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करताना पोलिसांनाही मनुष्यबळाबरोबरच साधनसामग्रीच्या तुटवड्यालाही तोंड द्यावे लागत आहे. वाहनांची अपुरी संख्या हेही वाढत्या गुन्ह्यांमधील एक महत्त्वाचे कारण आहे. वाढत्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर बाहेरील लोकसंख्या कल्याण-डोंबिवलीच्या आसपास राहण्यासाठी आली आहे. येथील मोठी गृहसंकुले बहुतांशी शहराच्या बाहेर किंवा एका टोकाला बांधण्यात आली आहेत. या ठिकाणी एखादा गुन्हा किंवा घटना घडल्यास घटनास्थळी पोहोचायला पोलिसांचा मोठा अवधी खर्ची पडत आहे. मुळातच अपुरे संख्याबळ आणि वाढती लोकसंख्या या दोन प्रमुख कारणांमुळे पोलीस दलासमोरील गुन्हे रोखण्याचे आव्हान अधिकच खडतर बनले आहे. अशा वेळी शहरात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, हा सवाल शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत. तर, शासन अशी एखादी मोठी दुर्घटना घडण्याचीच वाट पाहत आहे का? ठेच लागल्यानंतरच सरकारला शहाणपण येणे जरु री आहे का, असे सवाल उपस्थित होत आहेत.