शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात सहा रेशनिंग दुकानांवर फौजदारी कारवाई, परवानेही निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 00:47 IST

‘फ’ परिमंडळाचा दणका : नरेश वंजारी यांची माहिती

ठाणे : संचारबंदीच्या कालावधीत अन्नधान्य वितरणात मनमानीपणे अफरातफर केल्यामुळे जिल्ह्यातील शहरी भागांमधील सहा शिधावाटप (रेशनिंग) दुकानांवर फौजदारी गुन्ह्यांसह परवाने निलंबनाची धडक कारवाई केल्याची माहिती फ परिमंडळचे उपनियंत्रक नरेश वंजारी यांनी सांगितले.शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य सुरळीत व नियमीत मिळावे, यासाठी फ परिमंडळ उपनियंत्रक विभागाने दक्षता घेऊन जिल्ह्यात १३ भरारी पथके तैनात केली. त्यांच्याद्वारे जिल्ह्यातील सुमारे एक हजार ४४१ रेशिनंग दुकानांवर लक्ष केंद्रीत करून त्यांच्या मनमानीला आळा घातला. त्यापैकी बेजबाबदारपणा, मनमानी व अन्नधान्य वितरणात अफरातफर, धान्याचे कमी वाटप, तर काही पात्र कार्डधारकांना अन्नधान्य न दिल्याच्या कारणाखाली सहा दुकानांवर ही धडक कारवाई केली आहे. यामध्ये अंबरनामधील सर्वाधिक तीन रेशनिंग दुकानांसह ठाणे येथील दोन, भार्इंदर येथील एका रेशिनंग दुकानाचा समावेश आहे.अशी केली ग्राहकांची फसवणूकठाण्याच्या घोडबंदरचे त्रिवेंद्र चंदे यांनी शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने अन्नधान्य वितरण केले आहे. तर, ठाणे (पूर्वच्या) ओमसाई स्वयंसहायता बचत गटाने रेशनिंग दुकान ठरवून दिलेल्या वेळेपर्यंत सुरू ठेवले नाही. भार्इंदरच्या अशोक गौड यांनी शिधापत्रिकाधारकांचे १२ क्विंटल गहू त्यांना वितरित केला नाही.ते स्वत:च्या फायद्यासाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. अंबरनाथला बशीर व इस्माईल किडवईकर यांनी नियमानुसार वाटप करण्याऐवजी कमी अन्नधान्य वितरित केले आहे. तर, दामाजी गोसर यांनी चणाडाळीची मागणी करण्यास टाळाटाळ केल्यामुळे कार्डधारकांना ती मिळाली नाही. याप्रमाणेच सुनील सांगळे व जुगेशकुमार गुप्ता यांनी नियमानुसार वाटप करण्याऐवजी कमी अन्नधान्य वितरित केल्याची मनमानी केली, आदींवर भरारी पथकांच्या अहवालावरून कडक कारवाई केल्याचे वंजारी यांनी सांगितले.