शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

जिल्ह्यात सहा रेशनिंग दुकानांवर फौजदारी कारवाई, परवानेही निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 00:47 IST

‘फ’ परिमंडळाचा दणका : नरेश वंजारी यांची माहिती

ठाणे : संचारबंदीच्या कालावधीत अन्नधान्य वितरणात मनमानीपणे अफरातफर केल्यामुळे जिल्ह्यातील शहरी भागांमधील सहा शिधावाटप (रेशनिंग) दुकानांवर फौजदारी गुन्ह्यांसह परवाने निलंबनाची धडक कारवाई केल्याची माहिती फ परिमंडळचे उपनियंत्रक नरेश वंजारी यांनी सांगितले.शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य सुरळीत व नियमीत मिळावे, यासाठी फ परिमंडळ उपनियंत्रक विभागाने दक्षता घेऊन जिल्ह्यात १३ भरारी पथके तैनात केली. त्यांच्याद्वारे जिल्ह्यातील सुमारे एक हजार ४४१ रेशिनंग दुकानांवर लक्ष केंद्रीत करून त्यांच्या मनमानीला आळा घातला. त्यापैकी बेजबाबदारपणा, मनमानी व अन्नधान्य वितरणात अफरातफर, धान्याचे कमी वाटप, तर काही पात्र कार्डधारकांना अन्नधान्य न दिल्याच्या कारणाखाली सहा दुकानांवर ही धडक कारवाई केली आहे. यामध्ये अंबरनामधील सर्वाधिक तीन रेशनिंग दुकानांसह ठाणे येथील दोन, भार्इंदर येथील एका रेशिनंग दुकानाचा समावेश आहे.अशी केली ग्राहकांची फसवणूकठाण्याच्या घोडबंदरचे त्रिवेंद्र चंदे यांनी शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने अन्नधान्य वितरण केले आहे. तर, ठाणे (पूर्वच्या) ओमसाई स्वयंसहायता बचत गटाने रेशनिंग दुकान ठरवून दिलेल्या वेळेपर्यंत सुरू ठेवले नाही. भार्इंदरच्या अशोक गौड यांनी शिधापत्रिकाधारकांचे १२ क्विंटल गहू त्यांना वितरित केला नाही.ते स्वत:च्या फायद्यासाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. अंबरनाथला बशीर व इस्माईल किडवईकर यांनी नियमानुसार वाटप करण्याऐवजी कमी अन्नधान्य वितरित केले आहे. तर, दामाजी गोसर यांनी चणाडाळीची मागणी करण्यास टाळाटाळ केल्यामुळे कार्डधारकांना ती मिळाली नाही. याप्रमाणेच सुनील सांगळे व जुगेशकुमार गुप्ता यांनी नियमानुसार वाटप करण्याऐवजी कमी अन्नधान्य वितरित केल्याची मनमानी केली, आदींवर भरारी पथकांच्या अहवालावरून कडक कारवाई केल्याचे वंजारी यांनी सांगितले.