शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

भिवंडीतील आदिवासी वस्तीचे पाणी बंद करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 02:09 IST

लॉकडाऊनमुळे थकबाकी न भरणाऱ्या पाणी कमिटीवर कारवाई

भिवंडी : खांबाळा ग्रामपंचायत क्षेत्रातील कुशिवली कातकरी पाडा येथील आदिवासी कुटुंबीयांनी खासगी व्यक्तीकडून केल्या जाणाऱ्या वाढीव पाणीपट्टी वसुलीस विरोध केल्याने आदिवासी पाड्यातील नागरिकांचा व परिसरातील पाणीपुरवठा बंद केल्याने संबंधितांवर सोमवारी रात्री पडघा पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.खांबाळा ग्रामपंचायत हद्दीतील नळपाणीपुरवठा योजनेसाठी तानसा पाइपलाइनवरून नळजोडणी करण्यात आली आहे. या पाणीवापराची पाणीपट्टी ग्रामपंचायत खात्यातून भरणे अभिप्रेत असताना गावातील गावदेवी पाणी कमिटीच्या महिलांकडून मासिक शंभर रुपये प्रत्येक घरातून वसूल करून ती पाणीपट्टी परस्पर मुंबई महापालिकेस भरली जात असे. लॉकडाऊन काळात पाणीपट्टी थकल्याने मुंबई महापालिका प्रशासनानें पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस खंबाळा ग्रामपंचायतीस दिली असता गावातील गावदेवी पाणी कमिटीच्या सदस्य महिलांनी गावातून अतिरिक्त पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. आदिवासी कातकरी कुटुंबीयांच्या प्रत्येक घरातून ५०० रुपये अधिक जमा करण्याबाबत तगादा लावला असता आदिवासी कुटुंबीयांनी नकार दिला. त्यामुळे या वस्तीचे पाणी तीन दिवस बंद ठेवण्यात आले. याबाबत शुभांगी विश्वास बगले यांनी आम्ही दरमहा मासिक पाणीपट्टी देत असतानाही पाणीपुरवठा खंडित केल्याची तक्रार दिली. पडघा पोलिसांनी गावदेवी पाणी कमिटीच्या महिला जयश्री गजानन ठाकरे, जयश्री पाटील, आशा विठ्ठल मांजे, सविता मांजे, चिऊ पाटील या महिलांविरोधात अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ नुसार ३ (१) नुसार गुन्हा दाखल केला आहे.करभरणा नाहीअंबाडी परिसरात ग्रामपंचायतमार्फत पाणीपट्टी वसूल न करता स्थानिक महिला मंडळ दरमहा रक्कम वसूल करून ती मुंबई महापालिकेकडे पाणीबिलापोटी भरणा करते. काही खासगी व्यक्ती वसुली करूनही मुंबई पालिकेची पाणीपट्टी थकीत ठेवत असल्याने आदिवासी वस्त्यांना पाणी न मिळण्याची वेळ आली.