शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीचोरांवर गुन्हे

By admin | Updated: July 16, 2016 01:43 IST

मीरा-भार्इंदरमधील ७२ बेकायदा नळजोडण्यांची यादी तयार होऊन दोन महिने झाले तरी पाणीचोरांना अभय मिळत होते.

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमधील ७२ बेकायदा नळजोडण्यांची यादी तयार होऊन दोन महिने झाले तरी पाणीचोरांना अभय मिळत होते. हे कृत्य करणारे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याविरोधात महापौर गीता जैन यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यामुळे पालिकेने पाणीचोरांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १६ जणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत २०११ पासून नवीन नळजोडण्या बंद असताना दुसरीकडे नवीन झोपड्या, चाळी, बांधकामे, इमारती मात्र मोठ्या प्रमाणात उभ्या राहत आहेत. नवीन नळजोडण्या देणे बंद असताना या नव्या बांधकामांना पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदा नळजोडण्या घेतल्या जातात. त्याचे दरही लाखांच्या घरात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपा आ. संजय केळकर यांच्या बेकायदा नळ जोडण्यांच्या प्रश्नावर आश्वासन देताना सरकारनेही बेकायदा नळजोडण्या शोधून कायदेशीर कारवाईचे आदेश दिले होते. पण, पालिका प्रशासन मात्र ढिम्म आहे. याबाबत ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये सातत्याने बातम्या प्रसिद्ध झाल्या. २७ नोव्हेंबर २०१५ रोजी आयुक्त अच्युत हांगे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांना लेखी आदेश देत शहरातील बेकायदा नळजोडण्या शोधून काढा, कारवाई करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. वाकोडे यांनी पालिकेचे ३१ मीटरवाचक व ५ मेस्त्री यांना ३० डिसेंबर २०१५ पर्यंत सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेनुसार असलेल्या नळजोडण्यांची यादी सादर करण्यास सांगितले होते. प्रत्येक मेस्त्रीच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके तयार केली होती. अहवाल सादर न केल्याने वाकोडे यांना प्रशासनाने दोन नोटिसा बजावल्या. अखेर, मेमध्ये पथकांनुसार बेकायदा नळजोडण्यांचा अहवाल सादर केला. शहरात केवळ ७२ बेकायदा नळजोडण्या सापडल्याने या अहवालाबाबतच संशय निर्माण झाला आहे. मे महिन्यात ७२ बेकायदा नळजोडण्यांची यादी आल्यानंतरही वाकोडे यांनी पाणीचोरांना पाठीशी घातले. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास टोलवाटोलवी केली. इतकेच नव्हे तरअनेक वर्षे चोरीचे व तेही फुकटात पाणी वापरणाऱ्यांकडून दंडही वसूल केला नाही. शिवाय, त्यात्या भागातील जबाबदार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कुठलीच कारवाई केलेली नाही. पाणीचोरीची गंभीर दखल घेऊन जोपर्यंत गुन्हे दाखल करत नाही, तोपर्यंत दालनातच बसून राहणार, अशी आक्रमक भूमिका मंगळवारी महापौर गीता जैन यांनी घेतली. यामुळे वाकोडे यांची चांगलीच पंचाईत झाली. पाणीचोरांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांकडे लेखी तक्रार केल्याचे पत्र दाखवल्यानंतर मंगळवारी सायंकाळी महापौरांनी दालन सोडले.