शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

पाणीचोरांवर गुन्हे

By admin | Updated: July 16, 2016 01:43 IST

मीरा-भार्इंदरमधील ७२ बेकायदा नळजोडण्यांची यादी तयार होऊन दोन महिने झाले तरी पाणीचोरांना अभय मिळत होते.

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमधील ७२ बेकायदा नळजोडण्यांची यादी तयार होऊन दोन महिने झाले तरी पाणीचोरांना अभय मिळत होते. हे कृत्य करणारे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याविरोधात महापौर गीता जैन यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यामुळे पालिकेने पाणीचोरांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १६ जणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत २०११ पासून नवीन नळजोडण्या बंद असताना दुसरीकडे नवीन झोपड्या, चाळी, बांधकामे, इमारती मात्र मोठ्या प्रमाणात उभ्या राहत आहेत. नवीन नळजोडण्या देणे बंद असताना या नव्या बांधकामांना पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदा नळजोडण्या घेतल्या जातात. त्याचे दरही लाखांच्या घरात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपा आ. संजय केळकर यांच्या बेकायदा नळ जोडण्यांच्या प्रश्नावर आश्वासन देताना सरकारनेही बेकायदा नळजोडण्या शोधून कायदेशीर कारवाईचे आदेश दिले होते. पण, पालिका प्रशासन मात्र ढिम्म आहे. याबाबत ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये सातत्याने बातम्या प्रसिद्ध झाल्या. २७ नोव्हेंबर २०१५ रोजी आयुक्त अच्युत हांगे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांना लेखी आदेश देत शहरातील बेकायदा नळजोडण्या शोधून काढा, कारवाई करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. वाकोडे यांनी पालिकेचे ३१ मीटरवाचक व ५ मेस्त्री यांना ३० डिसेंबर २०१५ पर्यंत सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेनुसार असलेल्या नळजोडण्यांची यादी सादर करण्यास सांगितले होते. प्रत्येक मेस्त्रीच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके तयार केली होती. अहवाल सादर न केल्याने वाकोडे यांना प्रशासनाने दोन नोटिसा बजावल्या. अखेर, मेमध्ये पथकांनुसार बेकायदा नळजोडण्यांचा अहवाल सादर केला. शहरात केवळ ७२ बेकायदा नळजोडण्या सापडल्याने या अहवालाबाबतच संशय निर्माण झाला आहे. मे महिन्यात ७२ बेकायदा नळजोडण्यांची यादी आल्यानंतरही वाकोडे यांनी पाणीचोरांना पाठीशी घातले. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास टोलवाटोलवी केली. इतकेच नव्हे तरअनेक वर्षे चोरीचे व तेही फुकटात पाणी वापरणाऱ्यांकडून दंडही वसूल केला नाही. शिवाय, त्यात्या भागातील जबाबदार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कुठलीच कारवाई केलेली नाही. पाणीचोरीची गंभीर दखल घेऊन जोपर्यंत गुन्हे दाखल करत नाही, तोपर्यंत दालनातच बसून राहणार, अशी आक्रमक भूमिका मंगळवारी महापौर गीता जैन यांनी घेतली. यामुळे वाकोडे यांची चांगलीच पंचाईत झाली. पाणीचोरांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांकडे लेखी तक्रार केल्याचे पत्र दाखवल्यानंतर मंगळवारी सायंकाळी महापौरांनी दालन सोडले.