शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पोलिसांच्या पाळतीवर नगरसेवकांचा आक्षेप

By admin | Updated: November 2, 2015 02:53 IST

बिल्डर सूरज परमार प्रकरणात चार नगरसेवकांच्या चुकीमुळे पोलिसांनी सरसकट सर्वच नगरसेवकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे,

अजित मांडके, ठाणेबिल्डर सूरज परमार प्रकरणात चार नगरसेवकांच्या चुकीमुळे पोलिसांनी सरसकट सर्वच नगरसेवकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, अशी भावना नगरसेवकांच्या वर्तुळात निर्माण होत आहे. चौकशीकरिता स्थायी समिती व महासभेचे इतिवृत्त पोलिसांनी मागणे आणि महापालिका आयुक्तांनी ते उपलब्ध करून देणे, यामुळे नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याची चर्चा ठाण्यात होत आहे.संसद आणि विधिमंडळाच्या सदस्यांप्रमाणे नगरसेवकांना विशेषाधिकार नसले, तरी पोलिसांनी असे इतिवृत्त मागितल्याने व पाळत ठेवण्यासारखे प्रकार झाल्यास भविष्यात कुठल्याही विषयावर बोलताना नगरसेवकांच्या मनात भीतीचे सावट राहील, अशी भीती ते बोलून दाखवत आहेत. त्यामुळेच आता स्थायी समिती आणि महासभेत नगरसेवकांनी बोलायचे की नाही, असा सवाल ते करीत आहेत. विधानसभेत सदस्य एखाद्या कंत्राटदार, पोलीस अधिकारी अथवा बिल्डर उद्योजक यांचे प्रकरण लोकशाही आयुधांच्या माध्यमाने उपस्थित करून कारवाईची मागणी करतात. भविष्यात अशा व्यक्तीने आत्महत्या केली, तर नगरसेवकांचा न्याय आमदारांनाही लागू केला जाईल, अशी भीती नगरसेवक व्यक्त करीत आहेत.ठाणे महापालिकेतील महासभा व स्थायी समितीच्या इतिवृत्ताची मागणी पोलिसांनी केल्यावर, महापालिका आयुक्तांनी नगरसेवकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याकरिता त्यास सपशेल नकार द्यायला हवा होता, असे नगरसेवकांचे मत असल्याचे समजते. याबाबत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता, पोलिसांच्या चौकशीचा तो भाग असून, ते कुणाचीही चौकशी करू शकतात. पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांकडील दस्तावेजांचीही तपासणी सुरू केली आहे. त्यांना सहकार्य करणे हे पालिकेचे काम आहे, असे ते म्हणाले.