शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

भिवंडी पालिकेत स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीमध्ये भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:46 IST

शिवसेनेने केली मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

भिवंडी : महापालिका क्षेत्रात एमएमआरडीएच्या निधीतून सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधली आहेत. याच्या देखभाल दुरूस्तीसाठी पालिकेने ही स्वच्छतागृहे सामाजिक संस्थांना दिली आहेत. याबाबत या संस्थांनी पालिकेशी करार केला आहे. परंतु पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकारी व अभियंत्यांनी केवळ नगरसेवकांना खूष करण्यासाठी लाखो रूपये घेतले आहेत. त्यामुळे अशा भ्रष्ट कारभाराची नगरविकास सचिवांनी सखोल चौकशी करावी,अशी मागणी शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी केली आहे.केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिकेस ५० कोटी पैकी ३४ कोटींचा निधी मिळाला आहे. त्यातून शहर स्वच्छता व स्वच्छतागृह दुरूस्तीच्या नावावर खर्च केला जात आहे. पालिका कार्यक्षेत्रात एकूण ४०६ स्वच्छतागृह असून यामध्ये २१६ एमएमआरडीए तर पालिका प्रशासनाचे १०५ स्वच्छतागृहे आहेत. त्यापैकी ६२ बांधा,वापरा व हस्तांतरीत करा या तत्त्वावर सुरू आहेत आणि २३ पे अ‍ॅन्ड यूज या खासगी तत्त्वावर सामाजिक संस्थेला करार करून दिली आहेत.स्वच्छतागृहाची निगा व बांधकाम दुरूस्ती संबंधित संस्था व कंत्राटदाराने करायची आहेत असे करारात स्पष्ट नमूद आहे. मात्र पालिकेच्या बांधकाम व आरोग्य विभागाने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी सरकारी नियमांना तिलांजली देत सुमारे ७५ स्वच्छतागृहांवर दोन वर्षात सुमारे दोन कोटीहून अधिक खर्च केल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. प्रशासनाने ४०६ स्वच्छतागृहांपैकी १४० जणांचे करारनामे असून इतरांचे करार गहाळ झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात बांधण्यात आलेली स्वच्छतागृहे आयुक्तांच्या आदेशानुसार दुरूस्त केली जात आहेत. ही दुरूस्ती पालिकेच्या बांधकाम विभाग व आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. करारनामे सांभाळून ठेवणे आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे या बाबत अधिक माहिती देता येणार नाही. —दिलीप माळी, स्वच्छतागृह विभाग प्रमुख अधिकारी

टॅग्स :bhiwandiभिवंडीCorruptionभ्रष्टाचारShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस