शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

"केडीएमसीत खड्डे भरण्याच्या कंत्राटात झाला भ्रष्टाचार"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:18 IST

एकूण कंत्राटाच्या रकमेपैकी केवळ ३० टक्के रकमेतून खड्डे भरले जातात, तर बाकी ७० टक्के निधीचा भ्रष्टाचार होतो, असा गंभीर आरोप कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शनिवारी केला.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचे सत्र संपता संपत नाही, पण ते भरण्यासाठी कोट्यवधी रुपयांची कंत्राटे काढली जातात. मात्र, एकूण कंत्राटाच्या रकमेपैकी केवळ ३० टक्के रकमेतून खड्डे भरले जातात, तर बाकी ७० टक्के निधीचा भ्रष्टाचार होतो, असा गंभीर आरोप कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शनिवारी केला.गायकवाड म्हणाले की, केडीएमसीत कशातूनही पैसा कमवायचा हाच उद्देश प्रशासन, सत्ताधाऱ्यांचा असतो. खड्डे कधी भरलेच गेले नाहीत. केवळ खडी टाकली जाते, पाऊस गेला की ती खडी रस्त्यावर अन्यत्र पसरते आणि त्यामुळे दुचाकीसह अन्य वाहनांचे अपघात होतात. नागरिक जखमी होऊन जायबंदी होतात, पण मनपा अधिकाऱ्यांना मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नाही, याची खंत आहे.वर्षानुवर्षे आम्ही खड्ड्यांबाबत पत्रव्यवहार केले, पण आयुक्त बदलले, पण रस्ते जैसे थे राहिले आहेत. सामान्यांचे अपघातात बळी जातात, ते जखमी होतात, खड्डे मात्र वाढतात, पण कमी होत नाहीत. काँक्रिटचे रस्ते आता कुठे केले, पण त्यातील अनेक ठिकाणी रिकास्टिंगची गरज आहे, असे ते पुढे म्हणाले. भ्रष्टाचार बोकाळला असून सर्वत्र अनागोंदी कारभार असल्याचे सांगत ते म्हणाले की, ते पाहून अस्वस्थ व्हायला होते. एकाही अधिकाºयाला काहीच पडलेली नाही, जो तो त्या भ्रष्टाचारामधला एक भाग होतो आणि नोकरीची वर्षे ढकलतो. म्हणूनच, एवढ्यात एकही प्रकल्प मार्गी लागला नाही. सगळी कामे अर्धवट, तर काही कागदावरच आहेत. तक्रारी तरी किती करायच्या, असे सांगून त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्यावर खडीकरण करूनच तात्पुरते ते बुजवण्यात येतात. आताही १० आॅक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णत: थांबला तर मात्र त्यानंतर डांबरीकरण करून रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. - सपना कोळी,शहर अभियंता, केडीएमसीखड्डे भरण्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, असा आरोप आमदार गायकवाड करत असतील तर आता स्थायी समितीचे सभापती भाजपचेच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे विचारणा करावी आणि तसे झाले असेल तर ते गंभीर आहे. आता पाऊस कमी झाल्याने खड्डे भरणे व डांबरीकरणाचे काम प्रशासन हाती घेणार आहे.- विनीता राणे, महापौर, केडीएमसी