शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

प्रयोगशाळा सामग्री खरेदीत भ्रष्टाचार; श्रमजीवीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 22:56 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तालुक्यात नवीन ११ जि. प. शाळांना उच्च मध्यमिक वर्गाची वाढीव मान्यता देवून त्या शाळांना प्रयोगशाळा साहित्य पुरविण्यात आले आहे. मात्र, या साहित्य खरेदीत घोळ करीत निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविण्यात आले आहे. तर

जव्हार : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तालुक्यात नवीन ११ जि. प. शाळांना उच्च मध्यमिक वर्गाची वाढीव मान्यता देवून त्या शाळांना प्रयोगशाळा साहित्य पुरविण्यात आले आहे. मात्र, या साहित्य खरेदीत घोळ करीत निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविण्यात आले आहे. तर कौलाळे ग्रामपंचयातीचे ग्रामविकास अधिकारी व तत्कालीन ग्रामसेविका यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत सोमवारी श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून अधिकाऱ्यांना वेठीस धरले.संबधित मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, गट शिक्षण अधिकारी मध्यस्ती असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या ११ मुख्याध्यापकांकडून प्रयोगशाळा साहित्याच्या खर्च वसुली करणार असल्याचे गटविकास अधिकाºयांनी सांगितले. जव्हार तालुक्यात यावर्षी इयत्ता ८ वी व ९ वीचे ११ नवीन उच्च माध्यमिकचे वर्ग जोडले आहेत. या शाळांना प्रयोगशाळा साहित्य पुरवठा करणारी कंपनी रेणुका इंटरप्राईज, परभणी या एजन्सीकडून पुरवठा केले आहे. प्रयोग शाळेसाठी प्रत्येकी रु पये २ लाख ६५ हजराचा धनादेश या कंपनीला देण्यात आले आहेत.मात्र, प्रयोगशाळेसाठीचे साहित्य हलक्या दर्जाचे असून त्यांच्या प्रत्यक्ष किमतीही कमी आहेत. मात्र, कंपनीने त्याच्या अव्वाच्या सव्वा किमती लावून त्याचे बिल काढले असल्याचा आरोप श्रमजीवीने केला आहे. या पार्श्वभूमिवर पालकांसह जव्हार पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांच्या दालनात श्रमजीवी संघटनेने आंदोलन करून संबंधित अधिकाºयांना धारेवर धरले. त्या शाळांच्या मुख्याध्यपकांना लेखी पत्र काढून त्यांच्याकडून संपूर्ण साहित्याची वसुली करण्यात येईल असे आश्वासन गटविकास अधिकारी शेखर सौंदळ यांनी दिले.तसेच, तालुक्यातील कौलाळे ग्रामपंचायत हद्दीत ग्रामविकास अधिकारी भास्कर शिंदे व तत्कालीन ग्रामसेविका यांनी शासनाच्या विविध योजनांत अफरातफर करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थ व आंदोलन कर्त्यांनी केला आहे. या बाबत शासनाकडे माहिती उपलब्ध नाही. निधीबाबत पंचवार्षिक आराखडा तयार न करता खर्च करण्यात आला असून खर्च रक्कमांचा व कॅशबुकचा ताळमेळ बसत नाही. या ग्रामसेवकांनी ग्रामसभांचे ईतीवृत्तही मोघम लिहलेले असल्याचा ठपका आंदोलकांनी ठेवला आहे.म्हणून श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गटविकास अधिकाºयांकडून लेखी मिळत नाहीत. तोपर्यंत आम्ही हटणार नाही. व तुम्हलाही कार्यलयातून निघू दणार नसल्याची भूमिका घेतली होती.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारpalgharपालघर