शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
6
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
7
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
8
बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
9
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
11
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
12
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
13
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
14
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
15
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
16
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
17
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
18
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
19
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
20
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...

उल्हासनगरात अतिधोकादायक इमारतींवर महानगरपालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 23:58 IST

भिवंडीच्या दुर्घटनेतून बोध : १५0 धोकादायक इमारतींची यादी तयार, ३0 इमारती केल्या खाली, पाडकामाला सुरुवात केल्याने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेने १५० धोकादायक इमारतींची यादी पावसाळ्यापूर्वीच जाहीर केली असून भिवंडीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याचे ठरवले आहे. अतिधोकादायक ३० इमारती रिकाम्या केल्या आहेत. त्यापैकी हमलोग, शांती पॅलेस, ओम शिवगंगा इमारतींवर अतिक्रमण विभागाने गुरुवारपासून पाडकाम सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.उल्हासनगरमध्ये दरवर्षी इमारती कोसळून अनेकांचे बळी गेले आहेत. भिवंडी येथील धोकादायक इमारत कोसळून ४० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून असंख्य जखमी झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर उपायुक्त मदन सोंडे यांनी कॅम्प नं-१ मधील हमलोग, कॅम्प नं-२ मधील शांती पॅलेस व कॅम्प नं-४ मधील ओम शिवगंगा या अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पथकाने तिन्ही इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. धोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या अन्य इमारतींचे सर्वेक्षण करणार असल्याचे सोंडे यांनी सांगितले.शहरातील अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली. तर, दुसरीकडे १३० धोकादायक इमारतींना पावसाळ्यापूर्वी नोटिसा देऊन नागरिकांना इमारती रिकाम्या करण्यास सांगितले होते. मात्र, रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे.धोकादायक इमारतींची संख्या वाढणारशहरात १९९० ते ९५ दरम्यान रेतीपुरवठा बंद असल्याने, त्यावेळी बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतींमध्ये रेतीऐवजी दगडांचा चुरा व वाळवा रेती यांचा वापर करीत होते. त्याकाळातील बहुतांश इमारती धोकादायक होत असल्याने त्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.