शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

उल्हासनगरात अतिधोकादायक इमारतींवर महानगरपालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 23:58 IST

भिवंडीच्या दुर्घटनेतून बोध : १५0 धोकादायक इमारतींची यादी तयार, ३0 इमारती केल्या खाली, पाडकामाला सुरुवात केल्याने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेने १५० धोकादायक इमारतींची यादी पावसाळ्यापूर्वीच जाहीर केली असून भिवंडीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याचे ठरवले आहे. अतिधोकादायक ३० इमारती रिकाम्या केल्या आहेत. त्यापैकी हमलोग, शांती पॅलेस, ओम शिवगंगा इमारतींवर अतिक्रमण विभागाने गुरुवारपासून पाडकाम सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.उल्हासनगरमध्ये दरवर्षी इमारती कोसळून अनेकांचे बळी गेले आहेत. भिवंडी येथील धोकादायक इमारत कोसळून ४० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून असंख्य जखमी झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर उपायुक्त मदन सोंडे यांनी कॅम्प नं-१ मधील हमलोग, कॅम्प नं-२ मधील शांती पॅलेस व कॅम्प नं-४ मधील ओम शिवगंगा या अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पथकाने तिन्ही इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. धोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या अन्य इमारतींचे सर्वेक्षण करणार असल्याचे सोंडे यांनी सांगितले.शहरातील अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली. तर, दुसरीकडे १३० धोकादायक इमारतींना पावसाळ्यापूर्वी नोटिसा देऊन नागरिकांना इमारती रिकाम्या करण्यास सांगितले होते. मात्र, रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे.धोकादायक इमारतींची संख्या वाढणारशहरात १९९० ते ९५ दरम्यान रेतीपुरवठा बंद असल्याने, त्यावेळी बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतींमध्ये रेतीऐवजी दगडांचा चुरा व वाळवा रेती यांचा वापर करीत होते. त्याकाळातील बहुतांश इमारती धोकादायक होत असल्याने त्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.