शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

नगरसेवकांची कामे मार्गी लावण्यासाठी पालिका घेणार १ हजार कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST

ठाणे : सार्वत्रिक निवडणुका वर्षभरावर आल्या असतानाही अद्यापही महासभेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसार कामे झालेली नाहीत. नगरसेवक, मागासवर्गीय निधी, प्रभाग ...

ठाणे : सार्वत्रिक निवडणुका वर्षभरावर आल्या असतानाही अद्यापही महासभेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसार कामे झालेली नाहीत. नगरसेवक, मागासवर्गीय निधी, प्रभाग सुधारणा निधीची कामे रखडली आहेत. ठेकेदारांची अद्यापही दोन ते तीन वर्षांची बिले निघालेली नाहीत. त्यामुळे एकूणच शहराची विकासकामे ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याचा मुद्दा शुक्रवारी भाजपच्या नगरसेवकांनी महासभेत उपस्थित केला. आधीच्या कामांपोटी ३५०० कोटींचे दायित्वदेखील पालिकेच्या डोक्यावर आहे. असे असताना आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नगरसेवकांची कामे मार्गी लावण्यासाठी तब्बल १ हजार कोटींचे कर्ज काढण्याची तयारी पालिकेने केली आहे. त्यानुसार, यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. हे कर्ज म्हाडा, एमएमआरडीए किंवा सिडकोकडून घेण्याचा विचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ठाणे महापालिकेने यापूर्वी मोठ्या प्रकल्पांवर कोट्यवधींचा खर्च केला असल्याने पालिकेवर ३५०० कोटींचे दायित्व आले आहे. हा निधी पालिकेला द्यावाच लागणार आहे. महासभेत भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर म्हणाले की, महासभेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानंतर त्याचे ठराव अद्यापही अंतिम झालेले नाहीत. मागासवर्गीय प्रस्तावांच्या फायलींवर अद्यापही निधी दिला जात नाही. अर्थसंकल्पाचे ठराव मंजूर होत नसल्याचेही त्यांनी सांगितले, त्यामुळे किमान नगरसेवक निधीच्या कामांना तरी निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक राऊळ यांनीदेखील नगरसेवक निधी, मागासवर्गीय निधी मिळत नसल्याने प्रभागातील कामे थांबली असल्याचे सांगितले. ठेकेदारांची बिले मिळत नसल्याने त्यांनी सुरू असलेली कामेदेखील थांबवली आहेत. गटारांची सफाई होत नाही, रस्त्यांची सफाई थांबली आहे, अशी अनेक कामे थांबली असल्याने त्यावर तोडगा काढून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

यावर स्पष्टीकरण देताना महापौर म्हणाले की, कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. शहर विकास विभागाकडूनदेखील उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे ठराव अंतिम केले तरीदेखील निधी नसल्याने त्यांची अंमलबजावणी होईल का, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. स्थायी समितीने अर्थसंकल्पात ५०० कोटींची वाढ केली आहे. महासभेत त्यात आणखी १ हजार कोटींची वाढ केली आहे. त्यामुळे अर्थसंकल्प दीड हजार कोटींनी वाढला आहे. सध्याच्या कामांचा तसेच नवीन कामांचा विचार केल्यास त्यासाठीदेखील १२०० कोटी लागणार आहेत. परंतु, पालिकेची आर्थिक स्थिती पाहता, हा निधी उपलब्ध कसा होणार, असा प्रश्न आहे. सध्या पालिकेच्या तिजोरीत अवघे ९५ कोटी शिल्लक आहेत. त्यातील ७५ कोटी हे पगारापोटी जाणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत मोजकीच रक्कम शिल्लक राहणार आहे. त्यातून विकासकामे कशी करायची, असा प्रश्न आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा सुरू असून कर्ज घेण्याचा विचार केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यातून मार्ग काढायचा असेल, तर ५०० ते १ हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे कर्ज सिडको, म्हाडा किंवा एमएमआरडीएकडून घेण्यासंदर्भातही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.