शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

धामणकरनाका उड्डाणपुलावरील खड्ड्यांकडे मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:38 IST

भिवंडी : शहरातील धामणकरनाका उड्डाण पुलाच्या चढ उताराच्या दोन्ही बाजूंना खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा ...

भिवंडी : शहरातील धामणकरनाका उड्डाण पुलाच्या चढ उताराच्या दोन्ही बाजूंना खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, मनपा प्रशासनाचे या खड्ड्यांकडे पुरते दुर्लक्ष होताना दिसत आहे.

शहरातील सर्वात पहिला धामणकरनाका उड्डाण पूल मेट्रो मार्गामुळे तोडण्यात येणार असल्याचे समजते. त्यातच या उड्डाण पुलापर्यंत मेट्रोचे कामदेखील येऊन ठेपले आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे अंजुरफाटा ते धामणकरनाका रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहनचालकांना अगोदरच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. या कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी वाहनचालक आपली वाहने उड्डाण पुलावरून नेतात. मात्र, या उड्डाण पुलावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यांमध्ये अनेकवेळा दुचाकी घसरून अपघात होत आहेत. परंतु, त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. भविष्यात या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिक विचारात आहेत. दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी डांबरीकरण व रस्ते दुरुस्ती होत असतांनादेखील धामणकरनाका उड्डाण पुलावर पडलेल्या खड्ड्यांकडे मनपा प्रशासन डोळेझाक का करते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

===Photopath===

240321\20210206_113218.jpg

===Caption===

धामणकर नाका उड्डाणपुलावरील खड्ड्यांवर मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष