शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कोरोनावर संक्रांत : शनिवारपासून लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 01:53 IST

आरोग्यसेवक नोंदणी ६२ हजार ७५०, अन् लस मिळाल्या ७४ हजार : ठाणे जिल्ह्याला पुरेसा साठा

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आठ महिन्यांपासून असलेली कोरोना प्रतिबंधक लसींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ठाणे जिल्ह्यासाठी तब्बल ७४ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ६२ हजार ७५० आरोग्यसेवकांनी नोंदणी केली असून, त्यानुसार जिल्ह्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध झाला असल्याचा दावा जिल्हा आरोग्य विभागाने केला आहे. १० टक्के वेस्टेज सोडूनही काही प्रमाणात साठा शिल्लक राहणार असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यातील दुसरा डोस हा २८ दिवसांनी दिला जाणार असून, त्यासाठी पुन्हा लस उपलब्ध होणार आहेत.

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. सध्याच्या स्थितीत राज्यासाठी ६० टक्के डोस उपलब्ध झाले आहेत. १७ लाख डोसची गरज असताना ९.६३ लाख डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या आरोग्यसेवकांपैकी ६० टक्के लोकांनाच ही लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, प्रत्यक्षात नोंदणी केलेल्या आरोग्यसेवकांपेक्षा आलेले डोस हे जास्तीचे असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत ६२ हजार ७५० आरोग्यसेवकांनी लसीसाठी नोंदणी केलेली असून शासनाकडून ७४ हजार डोस उपलब्ध झालेले आहेत. या ७४ हजारपैकी १० टक्के डोस वेस्टेज पकडलेले आहेत. म्हणजेच यातून ७ हजार ४०० वगळले तरी ठाणे जिल्ह्यासाठी ६६ हजार ६०० लस उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे. तर २८ दिवसांनंतर पुन्हा दुसरा डोस दिला जाणार आहे. परंतु, त्यासाठी पुन्हा लसी उपलब्ध होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यातील नोंदणीदेखील सुरू झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नोंदणी केलेले आरोग्यसेवक ठाणे जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी ६० हजार आरोग्यसेवकांनी लस घेण्यासाठी नोंदणी केली होती. त्यात वाढ होऊन हा आकडा ६२ हजार ७५० च्या आसपास गेला आहे.

उपलब्ध होणारे डोस ७४ हजार डोस उपलब्ध झाले असून, त्यातून ६२ हजार ७५० आरोग्यसेवकांना लस दिली जाणार आहे.

६२ हजार ७५० आरोग्यसेवकांची नोंदणी असून, ७४ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. त्या पुरेशा आहेत. १० टक्के लस या वेस्टेज पकडल्या आहेत.- डॉ. गौरी राठोड, उपसंचालक,आरोग्य विभाग

कल्याण-डोंबिवलीला ६ हजार डोस प्राप्त

n कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी राज्य सरकारकडून कोविड शिल्डच्या ६ हजार लसीचे डोस प्राप्त झाले असून, लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारीपासून करणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी दिली आहे. महापालिका हद्दीत चार लस केंद्रे आहेत. प्रत्येक दिवशी १०० जणांना लस दिली जाणार आहे.

n रुक्मीणीबाई रुग्णालय, कल्याणमधील शक्तीधाम केंद्र आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय, डीएनसी शाळा याठिकाणी लस दिली जाणार आहे. रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी लस न आल्याने अनेकांना जिविताची धास्ती होती. किती लोक लस घेण्यास उत्सूक आहेत हे प्रत्यक्ष लसीकरणावेळीच स्पष्ट होणार आहे. १० टक्के लोकांमध्ये लसीमुळे साईड इफेक्ट होण्याची भिती आहे.

उल्हासनगरमध्ये ४५०० जणांना देणार लस

n उल्हासनगर : शहरात कोरोना लसीकरण यशस्वीपणे राबविण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून, यासाठी खाजगी रुग्णालय पालिकेच्या मदतीला धावणार आहेत. त्यानुसार उपायुक्त मदन सोंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी मंगळवारी सेंच्युरी, क्रिटिकेअर, सर्वांनंदन हॉस्पिटलची पाहणी केली.n १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असल्याची माहिती सोंडे यांनी दिली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह अन्य अशा ४५०० पेक्षा जास्त जणांना लस देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या कामकाजाचे महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी कौतुक केले.

 

टॅग्स :thaneठाणे