शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Coronavirus: उल्हासनगरात ऐन लॉकडाऊन काळात वाहतूक कोंडी; मार्केट गर्दीने फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 16:29 IST

शहरातील दुकानाचे शटर बाहेरून बंद तर आतून दुकाने सुरू असल्याची टीका होत आहे. यातूनच मार्केट मध्ये नागरिक गर्दी करीत असल्याचे बोलले जात आहे

सदानंद नाईक 

उल्हासनगर : ऐन कोरोना काळातील संचारबंदी व लॉकडाऊन मध्ये शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. नागरिक बिनधास्त घराबाहेर पडत असल्याने, रस्ते व मार्केट गर्दीची ठिकाणे बनली असून पोलीस दादाही गर्दीला हैराण झाले. 

उल्हासनगरात शेजारील शहरा पेक्षा कोरोनाची संख्या कमी असलीतर, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनासह पोलीस करीत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या आवाहनाकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. अत्यावश्यक दुकानाचा अपवाद वगळता इतर दुकाने बंद असताना सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान नागरिकांची मार्केट मध्ये मोठी गर्दी आहे. यामागील कारण महापालिका व पोलिसांनी वेळीच सोडविणे गरजेचे आहे. नाहीतर ही गर्दी कोरोना प्रदूर्भावाची मुख्य कारण होणार आहे. शहरातील बहुतांश मुख्य मार्केट मध्ये नागरीक गर्दी करीत असून वाहनांची संख्या मोठी आहे. वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. पोलीस व महापालिकेचे तैनात कर्मचारी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अटकाव करीत नसल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. 

शहरातील दुकानाचे शटर बाहेरून बंद तर आतून दुकाने सुरू असल्याची टीका होत आहे. यातूनच मार्केट मध्ये नागरिक गर्दी करीत असल्याचे बोलले जात आहे. कपडे, चपला, यांच्यासह इतर दुकाने सकाळी सुरू ठेवत असून पोलीस व महापालिकेने बघ्याची भूमिका न वठविता, वेळीच कारवाई करणे आवश्यक आहे. नाहीतर गेल्या वर्षी प्रमाणे कोरोना रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यात शटर बंद करून दुकाने सुरू ठेवल्या प्रकरणी महापालिकेने गुन्हे दाखल केली. कॅम्प नं-५ येथील मुख्य मार्केट, कॅम्प नं-४ येथील मुख्य मार्केटसह उल्हासनगर रेल्वे स्टेशन ते शिवाजी चॉक मार्केट परिसर, शहाड ते गोलमैदान, खेमानी आदी परिसरात नागरिकांची गर्दी असून वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

भाजी मार्केट मध्येही गर्दी महापालिका भाजी मंडईसह रस्त्यावर थाटलेल्या भाजी मार्केट मध्ये नागरिक खरेदीसाठी एकच गर्दी करीत आहेत. सोशल डिस्टन्सचा केंव्हाच फज्जा उडाला असून गर्दीचे ठिकाणे कोरोना संसर्गाची ठिकाणे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांनी अत्यावशक्य कामाशिवाय घरा बाहेर पडू नये. असे आवाहन महापालिकेला वारंवार करावी लागत असून नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस