शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Coronavirus: उल्हासनगरात ऐन लॉकडाऊन काळात वाहतूक कोंडी; मार्केट गर्दीने फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 16:29 IST

शहरातील दुकानाचे शटर बाहेरून बंद तर आतून दुकाने सुरू असल्याची टीका होत आहे. यातूनच मार्केट मध्ये नागरिक गर्दी करीत असल्याचे बोलले जात आहे

सदानंद नाईक 

उल्हासनगर : ऐन कोरोना काळातील संचारबंदी व लॉकडाऊन मध्ये शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. नागरिक बिनधास्त घराबाहेर पडत असल्याने, रस्ते व मार्केट गर्दीची ठिकाणे बनली असून पोलीस दादाही गर्दीला हैराण झाले. 

उल्हासनगरात शेजारील शहरा पेक्षा कोरोनाची संख्या कमी असलीतर, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनासह पोलीस करीत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या आवाहनाकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. अत्यावश्यक दुकानाचा अपवाद वगळता इतर दुकाने बंद असताना सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान नागरिकांची मार्केट मध्ये मोठी गर्दी आहे. यामागील कारण महापालिका व पोलिसांनी वेळीच सोडविणे गरजेचे आहे. नाहीतर ही गर्दी कोरोना प्रदूर्भावाची मुख्य कारण होणार आहे. शहरातील बहुतांश मुख्य मार्केट मध्ये नागरीक गर्दी करीत असून वाहनांची संख्या मोठी आहे. वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. पोलीस व महापालिकेचे तैनात कर्मचारी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अटकाव करीत नसल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. 

शहरातील दुकानाचे शटर बाहेरून बंद तर आतून दुकाने सुरू असल्याची टीका होत आहे. यातूनच मार्केट मध्ये नागरिक गर्दी करीत असल्याचे बोलले जात आहे. कपडे, चपला, यांच्यासह इतर दुकाने सकाळी सुरू ठेवत असून पोलीस व महापालिकेने बघ्याची भूमिका न वठविता, वेळीच कारवाई करणे आवश्यक आहे. नाहीतर गेल्या वर्षी प्रमाणे कोरोना रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यात शटर बंद करून दुकाने सुरू ठेवल्या प्रकरणी महापालिकेने गुन्हे दाखल केली. कॅम्प नं-५ येथील मुख्य मार्केट, कॅम्प नं-४ येथील मुख्य मार्केटसह उल्हासनगर रेल्वे स्टेशन ते शिवाजी चॉक मार्केट परिसर, शहाड ते गोलमैदान, खेमानी आदी परिसरात नागरिकांची गर्दी असून वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

भाजी मार्केट मध्येही गर्दी महापालिका भाजी मंडईसह रस्त्यावर थाटलेल्या भाजी मार्केट मध्ये नागरिक खरेदीसाठी एकच गर्दी करीत आहेत. सोशल डिस्टन्सचा केंव्हाच फज्जा उडाला असून गर्दीचे ठिकाणे कोरोना संसर्गाची ठिकाणे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांनी अत्यावशक्य कामाशिवाय घरा बाहेर पडू नये. असे आवाहन महापालिकेला वारंवार करावी लागत असून नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस