शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय म्हणून घाबरुन जाऊ नका तर मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न करा"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 20:59 IST

कंटनेमेंट झोनमधील नागरीक बाहेर जाणे, बाहेरचा नागरीक आत येणे हे फार चुकीचे आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमांची कठोर अंमलबजावणी करा अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

ठळक मुद्दे सुरूवातीस केंद्रीय पथकाने मुंब्रा येथील अमृतनगर, इन्शानगर येथील प्रतिबंधित लोकांची पाहणी करून तेथील नागरिकांशी संवाद साधला.

ठाणे  : कोरोना बाधित रुग्णांचे संख्या वाढत आहे, यामुळे घाबरुन जाऊ नका, मृत्यूदर कसा कमी करता येईल, यासाठी प्रयत्न करा. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करा, कनंटेन्मेट झोनची प्रभावीपणे अंमलबाजवणी करा, कोरोना बाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य सेवेच्या ठिकाणी आवश्यक तो स्टाफ पुरवा, औषधोपचार वेळेत मिळावा, यासाठी प्रयत्न करा, याशिवाय रोजच्या स्क्रिनिंगचे प्रमाण वाढवा, अशा महत्वाच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लवकुमार अग्रवाल यांनी दिल्या आहेत.

शनिवारी सकाळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या उपस्थितीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांच्या अधिपत्याखालील पथकाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून त्याची कशा पद्धतीने अंमलबजावणी होते याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रलयाचे सह सचिव आणि स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर कुणाल कुमार, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, केंद्रीय संचालक(आरोग्य) डॉ. ई. रविंद्रन आदीं उपस्थित होते.

यावेळी त्यांनी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतेय म्हणून घाबरुन जाऊ नका, या उलट मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न करा, अशा महत्वाची सूचना दिली. वयोवृद्धांबरोबर ज्यांना कोरोनाची अधिकची लक्षणे दिसत असतील त्यांना आधी रुग्णालयात बेड उपलब्ध करुन द्या, रोजची जी स्क्रिनिंग केली जाते, त्याची संख्या वाढवा, तपासणीची संख्या वाढवा असेही त्यांनी सांगितले. मृत्यूदर कमी कसा करता येईल, त्यासाठी काय काय प्रयत्न करणे गरजेचे आहे, याचा विचार करा. कोरोनाशी लढा देताना नागरिकांना विश्वासात घ्या, जनजागृती करा, कनंटेन्मेट झोनमधील निबंर्ध कडक करा असेही त्यांनी सांगितले. 

कंटनेमेंट झोनमधील नागरीक बाहेर जाणे, बाहेरचा नागरीक आत येणे हे फार चुकीचे आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमांची कठोर अंमलबजावणी करा अशा सुचनाही त्यांनी दिल्या. प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचा जे काही आपण करीत आहोत, ते तुमच्यासाठी करीत आहोत, हे नागरिकांना समजावून सांगा असेही त्यांनी सांगितले. शहरातील लॅब आणि प्रशासन, किंवा आरोग्य यंत्रणोने समन्वय ठेवणो गरजेचे आहे. जेणे करुन रुग्णांची माहिती मिळून त्या रुग्णांना वेळेत उपचार मिळणे शक्य होईल यासाठी प्रयत्न करा असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सुरूवातीस केंद्रीय पथकाने मुंब्रा येथील अमृतनगर, इन्शानगर येथील प्रतिबंधित लोकांची पाहणी करून तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बाळकूम साकेत येथील 1 हजार बेडचे ठाणे कोविड हॉस्पिटलची पाहणी करून समाधान व्यक्त केले. पाहणी दौरा झाल्यानंतर केंद्रीय पथकाने महापालिका मुख्यालयामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांचा आढावा घेतला. 

सुरूवातीस ठाणे महापालिकेचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय पथकाने ठाणो जिल्हा, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर आदी महापालिकेचाही आढावा घेतला. यावेळी ठाणे  पोलिस सह आयुक्त डॉ. मेखला, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी, मीरा भायंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. राठोड, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त दयानिधी आदी उपस्थित होते.

- राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी यावेळी क्वारंटाईन सुविधा वाढविणे, मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता राखणे, मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविणे  यावर लक्ष देण्याची आवश्यकता बोलून दाखिवली.