शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

CoronaVirus News: ‘जबाबदारी’ पूर्ण करण्याकरिता फेरसर्वेक्षण; आरोग्य विभागाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 01:39 IST

छेडा रोड, पेंडसेनगरमध्ये घरोघरी जाऊन पुन्हा वैद्यकीय तपासणी

कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या आदेशावरुन सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत कल्याण-डोंबिवलीत घरोघरी जाऊन नागरिकांची वैद्यकीय तपासणी करताना काही भागात बंद घरांबाहेर कुटुंबांची तपासणी झाल्याचे स्टीकर्स चिकटवल्याचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्याने केडीएमसी वैद्यकीय आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. ज्या भागात असे थातूरमातूर सर्वेक्षण केले गेले तेथे पुन्हा नागरिकांची वैद्यकीय तपासणी करुन सर्वेक्षण करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत.या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन किती जणांची वैद्यकीय तपासणी केली याची नोंद करायची आहे. घरातील प्रत्येक सदस्यांची आॅक्सिजन पातळी व तापमान तपासणे गरजेचे आहे. परंतु काही ठिकाणी तपासणी न करताच केवळ नागरिकांची संख्या नोंदवली तर, बंद घरांच्या ठिकाणीही तपासणी न करताच सदस्यांची नोंद करुन तपासणी झाल्याचे स्टीकर दरवाजाबाहेर लावले गेले होते. डोंबिवली पूर्वेकडील अयोध्यानगरी तसेच छेडा रोड आणि पेंडसेनगरमध्ये हे प्रकार घडले. लोकमतच्या वृत्तानंतर सर्वेक्षण करणाऱ्या पथकांनी पुन्हा छेडा रोड आणि पेंडसेनगर भागामध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी केली. काही ठिकाणी सर्वेक्षणाला विरोध होत असला तरी ज्याला तपासणी करायची आहे त्याची तपासणी झालीच पाहिजे, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सर्वेक्षणाचा आढावाप्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी : ग्रामस्थांसह आरोग्य पथकांशीही साधला संवादलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आरोग्य सर्वेक्षणाशी संबंधित विविध प्रश्न विचारत मुरबाड तालुक्याच्या मोहोप गावातील कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतला. त्यांनी डोळखांब आणि सरळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही भेटी दिल्या.माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हाधिकाºयांनी मुरबाड व शहापूर तालुक्यामध्ये भेटी देऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते उपस्थित होत्या. जिल्हाधिकाºयांनी सरळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाºया मोहोप गावाला भेट देऊन गावोगावी मोहीम कशी सुरू आहे याचा आढावा घेतला.या दोन्ही प्रशासकीय प्रमुखांनी संयुक्त दौरा करून प्रत्यक्ष गावकºयांच्या घरी जाऊन माहिती घेतली. आरोग्य सर्वेक्षण टीमशी संवाद साधून त्यांनाही मार्गदर्शन केले. या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर या कालावधीत पूर्ण होणार आहे.६५ टक्के सर्व्हे पूर्णया मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत जिल्ह्यातील ६५ टक्के नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करून नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे, त्यांचे आरोग्य सर्वेक्षण करून संदर्भ सेवा पुरविणे, हा मुख्य उद्देश या मोहिमेचा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या