शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ‘जबाबदारी’ पूर्ण करण्याकरिता फेरसर्वेक्षण; आरोग्य विभागाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 01:39 IST

छेडा रोड, पेंडसेनगरमध्ये घरोघरी जाऊन पुन्हा वैद्यकीय तपासणी

कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या आदेशावरुन सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत कल्याण-डोंबिवलीत घरोघरी जाऊन नागरिकांची वैद्यकीय तपासणी करताना काही भागात बंद घरांबाहेर कुटुंबांची तपासणी झाल्याचे स्टीकर्स चिकटवल्याचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्याने केडीएमसी वैद्यकीय आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. ज्या भागात असे थातूरमातूर सर्वेक्षण केले गेले तेथे पुन्हा नागरिकांची वैद्यकीय तपासणी करुन सर्वेक्षण करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत.या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन किती जणांची वैद्यकीय तपासणी केली याची नोंद करायची आहे. घरातील प्रत्येक सदस्यांची आॅक्सिजन पातळी व तापमान तपासणे गरजेचे आहे. परंतु काही ठिकाणी तपासणी न करताच केवळ नागरिकांची संख्या नोंदवली तर, बंद घरांच्या ठिकाणीही तपासणी न करताच सदस्यांची नोंद करुन तपासणी झाल्याचे स्टीकर दरवाजाबाहेर लावले गेले होते. डोंबिवली पूर्वेकडील अयोध्यानगरी तसेच छेडा रोड आणि पेंडसेनगरमध्ये हे प्रकार घडले. लोकमतच्या वृत्तानंतर सर्वेक्षण करणाऱ्या पथकांनी पुन्हा छेडा रोड आणि पेंडसेनगर भागामध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी केली. काही ठिकाणी सर्वेक्षणाला विरोध होत असला तरी ज्याला तपासणी करायची आहे त्याची तपासणी झालीच पाहिजे, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सर्वेक्षणाचा आढावाप्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी : ग्रामस्थांसह आरोग्य पथकांशीही साधला संवादलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आरोग्य सर्वेक्षणाशी संबंधित विविध प्रश्न विचारत मुरबाड तालुक्याच्या मोहोप गावातील कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतला. त्यांनी डोळखांब आणि सरळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही भेटी दिल्या.माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हाधिकाºयांनी मुरबाड व शहापूर तालुक्यामध्ये भेटी देऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते उपस्थित होत्या. जिल्हाधिकाºयांनी सरळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाºया मोहोप गावाला भेट देऊन गावोगावी मोहीम कशी सुरू आहे याचा आढावा घेतला.या दोन्ही प्रशासकीय प्रमुखांनी संयुक्त दौरा करून प्रत्यक्ष गावकºयांच्या घरी जाऊन माहिती घेतली. आरोग्य सर्वेक्षण टीमशी संवाद साधून त्यांनाही मार्गदर्शन केले. या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर या कालावधीत पूर्ण होणार आहे.६५ टक्के सर्व्हे पूर्णया मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत जिल्ह्यातील ६५ टक्के नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करून नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे, त्यांचे आरोग्य सर्वेक्षण करून संदर्भ सेवा पुरविणे, हा मुख्य उद्देश या मोहिमेचा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या