शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

CoronaVirus News: पोषक अन्नघटक असलेल्या रानभाज्या बाजारात; कोरोना काळात नागरिकांची वाढती पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 02:29 IST

आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना मिळतोय रोजगार

- अनिरुद्ध पाटील बोर्डी : रानभाज्यांमध्ये लोह, खनिज, प्रथिने आदी पोषक गुणधर्म असल्याने आहारात त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या भाज्या खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असल्याने कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे रानभाज्यांच्या वाढीला पोषक वातावरण तयार झाले असून या भाज्यांची बाजारातील आवक वाढली आहे. नागरिकही या भाज्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत असून स्थानिक आदिवासी महिलांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.निसर्ग चक्रीवादळापासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने कमी-अधिक स्वरूपात हजेरी लावल्यानंतर येथील जंगल, शिवार आणि मोकळ्या जागांवर विविध प्रकारच्या रानभाज्यांसाठी पोषक वातावरण तयार झाले. स्थानिक पातळीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या या रानभाज्यांचा आकार रंग, फुले इत्यादींमुळे त्या वेल, शेंग आणि फळवर्गीय तसेच कंदमुळे या प्रकारानुसार ओळखण्यात स्थानिकांचा हातखंडा आहे. एवढेच नव्हे तर त्यामध्ये आढळणाºया औषधी गुणधर्मामुळे, त्या कोणत्या आजारांवर रामबाण उपाय ठरू शकतात याचीही त्यांना माहिती आहे. या त्यांच्या ज्ञानाला आहारतज्ज्ञांकडूनही दुजोरा मिळाला असून ठराविक हंगामात जरी त्यांचे सेवन केले तरी त्यामुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरते.डहाणू शहरातील बाजारात विविध तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरून आलेल्या महिला रानभाज्या विकत आहेत. त्याद्वारे त्यांना रोजगार, तर नागरिकांना पौष्टिक आहार मिळत आहे.लागवडीसाठी प्रयत्नरानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्यांचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी रानभाज्यांचे प्रदर्शन, पाककृती स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. शिवाय दुर्मिळ तसेच नामशेष होणाºया या भाज्यांच्या लागवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत.- विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ,कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या