शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

CoronaVirus News: पोषक अन्नघटक असलेल्या रानभाज्या बाजारात; कोरोना काळात नागरिकांची वाढती पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 02:29 IST

आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना मिळतोय रोजगार

- अनिरुद्ध पाटील बोर्डी : रानभाज्यांमध्ये लोह, खनिज, प्रथिने आदी पोषक गुणधर्म असल्याने आहारात त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या भाज्या खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असल्याने कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे रानभाज्यांच्या वाढीला पोषक वातावरण तयार झाले असून या भाज्यांची बाजारातील आवक वाढली आहे. नागरिकही या भाज्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत असून स्थानिक आदिवासी महिलांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.निसर्ग चक्रीवादळापासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने कमी-अधिक स्वरूपात हजेरी लावल्यानंतर येथील जंगल, शिवार आणि मोकळ्या जागांवर विविध प्रकारच्या रानभाज्यांसाठी पोषक वातावरण तयार झाले. स्थानिक पातळीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या या रानभाज्यांचा आकार रंग, फुले इत्यादींमुळे त्या वेल, शेंग आणि फळवर्गीय तसेच कंदमुळे या प्रकारानुसार ओळखण्यात स्थानिकांचा हातखंडा आहे. एवढेच नव्हे तर त्यामध्ये आढळणाºया औषधी गुणधर्मामुळे, त्या कोणत्या आजारांवर रामबाण उपाय ठरू शकतात याचीही त्यांना माहिती आहे. या त्यांच्या ज्ञानाला आहारतज्ज्ञांकडूनही दुजोरा मिळाला असून ठराविक हंगामात जरी त्यांचे सेवन केले तरी त्यामुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरते.डहाणू शहरातील बाजारात विविध तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरून आलेल्या महिला रानभाज्या विकत आहेत. त्याद्वारे त्यांना रोजगार, तर नागरिकांना पौष्टिक आहार मिळत आहे.लागवडीसाठी प्रयत्नरानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्यांचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी रानभाज्यांचे प्रदर्शन, पाककृती स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. शिवाय दुर्मिळ तसेच नामशेष होणाºया या भाज्यांच्या लागवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत.- विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ,कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या