शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यातील ९९० माध्यमिक शाळांचे वर्ग भरवणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:52 IST

कोरोनाची भीती कायम; ६२६ शाळाच ऑनलाइन सुरू करता येणार, चाचपणी झाली पूर्ण

- सुरेश लोखंडेठाणे : शाळा सुरू करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र, राज्य शासन आणि शिक्षक संघटनांमध्ये मतभेद दिसत आहेत. तरीही, शासनाचा आदेश मिळताच शाळा सुरू करणे शक्य व्हावे म्हणून जिल्ह्यातील सक्षम शाळांची चाचपणी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील एक हजार ६१६ माध्यमिक शाळांपैकी केवळ ६२६ शाळांमध्ये पूर्णवेळ, अर्धवेळ आणि दिवसाआड वर्ग भरवता येणे शक्य आहे. तर, उर्वरित ९९० माध्यमिक शाळा कोरोनाच्या भीतीमुळे बंदच राहणार असल्याचे उघड झाले आहे.राज्य शासन १५ जून, तर केंद्र सरकार आॅगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यास शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधींचा विरोध दिसत आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने केलेल्या चाचपणीत ९९० शाळा या शहरात व कोरोनाच्या  कंटेनमेंट झोनमध्ये आहेत. त्यामुळे त्या सुरू करण्याचे नियोजन नसल्याचे निदर्शनात आले आहे. याला शिक्षण विभागानेही दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात सध्या सव्वाआठ लाख विद्यार्थी पाचवी ते दहावीच्या वर्गात माध्यमिक शिक्षण घेत आहेत. जिल्ह्याच्या भिवंडी, शहापूर व मुरबाड या ग्रामीण भागामधील ३७ शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करता येणार आहेत. तर ४५ शाळा या अर्धवेळ भरवता येतील आणि दिवसाआड एक वर्ग भरवता येईल, असे ८२ शाळांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, ४६२ शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग न भरवता कधी शाळा तर कधी आॅनलाइन पद्धतीने त्यात विद्यार्थ्यांना शिकवता येईल, असे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. त्यासाठी शासन निर्णयाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. अनेक शिक्षक कोविडच्या कामातजिल्ह्यातील पाच शाळा क्वारंटाइन कक्षासाठी वापरल्या जात आहेत. या पाच शाळांसह उर्वरित ९८५ शाळा सुरू करण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाकडे नसल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील २३ हजार शिक्षक सव्वाआठ लाख विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. या शिक्षकांपैकी शाळेच्या जवळपास राहणाऱ्या एक हजार शिक्षकांचा समावेश आहे. तर, ११२ शिक्षक कोविड - १९ चे काम करत आहेत. त्यामुळे अनेक शाळा सुरू करण्याबाबत नियोजन नसल्याचे उघड झाले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या