शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

CoronaVirus News: पालघरच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:54 IST

रुग्णसंख्या दीडशेहून अधिक; नागरिकांमध्ये घबराट

विक्रमगड/वाडा : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि वाडा या दोन तालुक्यांसह ग्रामीण भागामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असून पावसाळा सुरू झाल्याने आणखीनच चिंता वाढली आहे. या दोन्ही तालुक्यांसह ग्रामीण भागातील रुग्णांनी दीडशतक पार केले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.विक्रमगड तालुक्यातील बाधितांची संख्या ४७ वर पोहोचली असून वाडामध्येही रुग्णसंख्या ६० वर, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ७० च्या पुढे गेली आहे. विक्रमगड तालुक्यात १० दिवसांपूर्वी एकही रुग्ण नव्हता, मात्र काही दिवसांपूर्वी १४ वर्षाच्या मुलाला कोरोना संसर्ग झाला होता.त्याला मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या निकट संपर्कातील ४२ जणांना शिळ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यातील त्यांचे सर्वांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. शुक्रवारी आलेल्या रिपोर्टमध्ये ३३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची एकूण रु ग्ण संख्या ४७ झाल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे.या ३३ पॉझिटिव्ह रुग्णांचा निकट संपर्क आलेल्यांची यादी बनवण्याचे काम सुरू असून त्यांना क्वॉरंटाईन केले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. या पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.वाडामध्येही रुग्णसंख्येने अर्धशतक गाठले आहे. तालुक्यात शुक्रवारी रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या ६० वर गेल्याने भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी भावेघर येथे १३, वाडा ३ असे १६ रुग्ण बाधित आढळले आहेत. या रुग्णांना पोशेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बुरपल्ले यांनी दिली.ग्रामीण भागात चिंतापालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागांतही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत ७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांची संख्या दीडशतकापार गेली असल्याने चिंंता वाढली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या