शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
2
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
3
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
4
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
6
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
7
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
8
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
9
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
11
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
12
Mumbai: देवदर्शनाहून परत येताना मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू; तब्बल १७ वर्षांनी पालकांना नुकसानभरपाई!
13
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
14
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
15
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
16
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
17
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
18
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
19
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पालघरच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:54 IST

रुग्णसंख्या दीडशेहून अधिक; नागरिकांमध्ये घबराट

विक्रमगड/वाडा : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि वाडा या दोन तालुक्यांसह ग्रामीण भागामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असून पावसाळा सुरू झाल्याने आणखीनच चिंता वाढली आहे. या दोन्ही तालुक्यांसह ग्रामीण भागातील रुग्णांनी दीडशतक पार केले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.विक्रमगड तालुक्यातील बाधितांची संख्या ४७ वर पोहोचली असून वाडामध्येही रुग्णसंख्या ६० वर, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ७० च्या पुढे गेली आहे. विक्रमगड तालुक्यात १० दिवसांपूर्वी एकही रुग्ण नव्हता, मात्र काही दिवसांपूर्वी १४ वर्षाच्या मुलाला कोरोना संसर्ग झाला होता.त्याला मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या निकट संपर्कातील ४२ जणांना शिळ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यातील त्यांचे सर्वांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. शुक्रवारी आलेल्या रिपोर्टमध्ये ३३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची एकूण रु ग्ण संख्या ४७ झाल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे.या ३३ पॉझिटिव्ह रुग्णांचा निकट संपर्क आलेल्यांची यादी बनवण्याचे काम सुरू असून त्यांना क्वॉरंटाईन केले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. या पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.वाडामध्येही रुग्णसंख्येने अर्धशतक गाठले आहे. तालुक्यात शुक्रवारी रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या ६० वर गेल्याने भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी भावेघर येथे १३, वाडा ३ असे १६ रुग्ण बाधित आढळले आहेत. या रुग्णांना पोशेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बुरपल्ले यांनी दिली.ग्रामीण भागात चिंतापालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागांतही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत ७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांची संख्या दीडशतकापार गेली असल्याने चिंंता वाढली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या