शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

CoronaVirus News: पालघरच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:54 IST

रुग्णसंख्या दीडशेहून अधिक; नागरिकांमध्ये घबराट

विक्रमगड/वाडा : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि वाडा या दोन तालुक्यांसह ग्रामीण भागामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असून पावसाळा सुरू झाल्याने आणखीनच चिंता वाढली आहे. या दोन्ही तालुक्यांसह ग्रामीण भागातील रुग्णांनी दीडशतक पार केले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.विक्रमगड तालुक्यातील बाधितांची संख्या ४७ वर पोहोचली असून वाडामध्येही रुग्णसंख्या ६० वर, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ७० च्या पुढे गेली आहे. विक्रमगड तालुक्यात १० दिवसांपूर्वी एकही रुग्ण नव्हता, मात्र काही दिवसांपूर्वी १४ वर्षाच्या मुलाला कोरोना संसर्ग झाला होता.त्याला मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या निकट संपर्कातील ४२ जणांना शिळ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यातील त्यांचे सर्वांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. शुक्रवारी आलेल्या रिपोर्टमध्ये ३३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची एकूण रु ग्ण संख्या ४७ झाल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे.या ३३ पॉझिटिव्ह रुग्णांचा निकट संपर्क आलेल्यांची यादी बनवण्याचे काम सुरू असून त्यांना क्वॉरंटाईन केले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली. या पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.वाडामध्येही रुग्णसंख्येने अर्धशतक गाठले आहे. तालुक्यात शुक्रवारी रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या ६० वर गेल्याने भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी भावेघर येथे १३, वाडा ३ असे १६ रुग्ण बाधित आढळले आहेत. या रुग्णांना पोशेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बुरपल्ले यांनी दिली.ग्रामीण भागात चिंतापालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागांतही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत ७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांची संख्या दीडशतकापार गेली असल्याने चिंंता वाढली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या