शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पालघरमध्ये दोन लाख लोकांच्या कोरोना चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:31 IST

CoronaVirus Palghar News: बाधितांची संख्या ३६ हजारांहून जास्त; बरे झाले ३१ हजारांपेक्षा अधिक

पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३६ हजारहून जास्त बाधित रुग्ण आढळले असून त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे ३१ हजारहून अधिक रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, जिल्ह्यात सुमारे दोन लाख लोकांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.पालघर जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता माझे कुटुंब माझी जबाबदारी ही राज्य सरकारची योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. जिल्ह्यातील शहरे, गावे तसेच पाड्यापाड्यांवर पोहोचून प्रत्येक घर, प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन नागरिकांची तपासणी करीत आहेत. यातून रुग्णांच्या निकट संपर्कातील बाधितांची, तसेच संशयित रुग्णांची माहिती प्राप्त होत आहे. या योजनेतून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात सुरू असलेला संसर्ग रोखण्यात यश मिळेल, अशी आशा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील वसई-विरार शहरे वगळता अन्य भागांत १२ हजारहून जास्त लोक कोरोनाबाधित आढळले आहेत. ग्रामीण भागांत सर्वाधिक रुग्ण पालघर तालुक्यात आढळले असून तेथील बाधितांची संख्या ६८०२ झालेली आहे. यानंतर डहाणू तालुक्यात १७३७ रुग्ण आढळलेले असून वाडा तालुक्यात १५३८ तर वसईच्या ग्रामीण भागात ११९८ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातही सुमारे अडीचशे रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. एकंदर ही वाढती रुणसंख्या लक्षात घेता प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.आतापर्यंत सुमारे दोन लाख लोकांची कोविड चाचणी करण्यात आली असून माझे कुटुंब माझी जबाबदारी योजना घरोघरी राबवली जात असल्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.सर्वाधिक रुग्ण वसई-विरार महानगरपालिका हद्दीतसध्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या वसई-विरार महापालिका क्षेत्रात आढळलेली आहे. वसई-विरारमध्ये बाधित रुग्णांची संख्या २३ हजार २२९ वर पोहोचली आहे.त्याच वेळी वसई-विरार महानगरपालिका हद्दीमध्ये २० हजार ८५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने समाधान व्यक्त होत आहे. वसई महापालिका क्षेत्रामध्ये ४५९ रुग्णांना या जीवघेण्या आजारात आपले प्राण गमवावे लागले असून अद्याप एक हजार ९१३ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या