शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात आणखी एक हजार ७०७ कोरोना बाधितांची वाढ: ४९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 01:19 IST

जिल्ह्यात होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी काही प्रमाणात घट झाल्याचे आढळले. गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ७०७ नविन बाधित रुग्णांची तर ४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६४ हजार १०५ तर मृतांची संख्या ही एक हजार ८२७ इतकी झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील बाधितांची संख्या ६४ हजारमृतांची संख्या एक हजार ८२७

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी काही प्रमाणात घट झाल्याचे आढळले. गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ७०७ नविन बाधित रुग्णांची तर ४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६४ हजार १०५ तर मृतांची संख्या ही एक हजार ८२७ इतकी झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क्षेत्रात सर्वाधिक ४०७ रुग्ण १७ रु ग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार ५ तर, मृतांची संख्या २३१ झाली आहे. ठाणे महानगर पालिकेच्या क्षेत्रामध्ये नव्या ३१२ बाधितांची तर १४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार १७४ तर मृतांची संख्या ५५७ वर गेली. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही २४० रुग्ण दाखल झाले असून आठ जणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आता दहा हजार ७८६ तर मृतांची संख्या ३३० वर पोहोचली आहे. मीरा भार्इंदरमध्ये १६५ रु ग्णांची तर दोघांच्या मृत्युमुळे बाधितांची संख्या सहा हजार २४० तर मृतांची संख्या २१५ वर पोहचली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रातही बाधितांची ३९ तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार सहा तर मृतांची संख्या १७३ वर पोहोचली आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातही २३७ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार २८४ तर मृतांची संख्या ही ७७ वर पोहचली आहे. अंबरनाथमध्ये ९६ रुग्ण नव्याने दाखल झाले. तर एकाचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ९६६ तसेच मृतांची संख्या ही ११२ वर पोहचली आहे. बदलापूरमध्ये ६४ रु ग्णांची नोंद झाली असून गेल्या अनेक दिवसांनी तिघांचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ७६७ तर मृतांची संख्या २६ झाली. ठाणे ग्रामीण भागात ११७ रु ग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या तीन हजार ८७७ तर, मृतांची संख्या १०६ वर गेली आहे. 

जितेंद्र आव्हाड करणार प्लाझ्मा दानकोरोनातून बरे झाल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात रु ग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :thaneठाणे